Vande Mataram : आता 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम' गायन बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नियमावली काय सांगते?
Vande Mataram Song : जन गण मन या राष्ट्रगीताच्या आधी वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं असून त्यासाठी केंद्र सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे.

मुंबई : देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन (Jana Gana Mana) या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन (Vande Mataram Song) बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत.
सरकारच्या या नव्या नियमावलीनुसार सर्व नागरिकांना राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरम् सुरू असेपर्यंत सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक आहे. याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी हा यामागता हेतू असल्याचं सांगण्यात येतं. यावरून आता सत्ताधारी खासदारांनी निर्णयाचं समर्थन केलंय. विरोधकांनी मात्र यावरून सवाल उपस्थित केले आहेत.
Vande Mataram Rules : वंदे मातरम् कुठे-कुठे अनिवार्य?
- तिरंगा फडकावतानाच्या कार्यक्रमांमध्ये
- राष्ट्रपतींच्या औपचारिक आगमन-निर्गमनावेळी
- राज्यपाल/लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात
- नागरी सन्मान कार्यक्रमात
- राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करताना (AIR आणि दूरदर्शनवर)
- परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज आणताना.
Vande Mataram National Song Mandatory : सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक
याशिवाय, सरकारने विशेष आदेश दिलेल्या इतर कार्यक्रमांमध्येही हे राष्ट्रगान वाजवलं जाणार आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे जर ‘वंदे मातरम’ आणि ‘जन गण मन’ दोन्ही वाजवले जाणार असतील, तर सर्वप्रथम ‘वंदे मातरम’ वाजवलं जाईल. त्यानंतर ‘जन गण मन’ वाजवलं जाईल. या दोन्ही प्रसंगी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभं राहणं बंधनकारक असेल. मात्र, एखाद्या माहितीपट किंवा न्यूज फिल्ममध्ये राष्ट्रगीताचा भाग म्हणून वाजवलं गेलं, तर उभे राहण्याची सक्ती नसेल.
याशिवाय शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक ‘वंदे मातरम’ गायनाने करावी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदराची भावना रुजवावी हा यामागता हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.
खरंतर, 1875 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींकडून 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहिमेचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
ही बातमी वाचा:
























