Nitin Gadkari on Hindu Temples: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी देशातील हिंदू मंदिरांबाबत मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हिंदू मंदिरांमध्ये (Hindu Temples) स्वच्छतेचं पालन (Cleanliness) केलं जात नाही, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे. 


नितीन गडकरी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "मला वाटतंय आपला देश असा आहे की, जिथे हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. तिथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च यांचं वातावरण पाहून मला वाटलं की, आपली प्रार्थनास्थळं चांगली असावीत. मला जेव्हा याबाबात काहीतरी करण्याची संधी मिळाली त्यावेळी मी, महाराष्ट्रात (Maharashtra News) 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला."


मीडिया रिपोर्ट्सनुसार, गडकरी यांनी सांगितलं की, उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून निघणाऱ्या कैलास मानसरोवरच्या मार्गाचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झालं आहे. पूर्वी नेपाळमधून (Nepal) जावं लागायचं आणि या दरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा. 






नितीन गडकरी काय म्हणाले? 


नितीन गडकरी म्हणाले की, प्रकल्पांना होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि बांधकामाचा खर्च कमी करण्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) अचूक बनवण्याची गरज आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेबाबत दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांनी बुधवारी (31 मे) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाच्या विविध पैलूंवर विस्तृत चर्चा केली.


"कार्यक्षमता वाढवण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या मार्गांवर बैठकीत चर्चा झाली", असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. गडकरींनी राष्ट्रीय महामार्गांवर कार्यक्षमता वाढवणं आणि 'प्रवास सुलभता' यांवर लक्ष केंद्रित करणारे दोन मोबाईल अॅप्सही लॉन्च केले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम