Agriculture Budget 2025 PM Dhan Dhanya Krishi Yojana : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या आज देशाचा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये आज त्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामधील महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान धन धान्य कृषी योजना (Prime Ministers Dhan Dhana Krishi Yojana). राज्यांच्या सहकार्यानं पंतप्रधान धन धान्य कृषी योजना (PM Dhan Dhanya Krishi Yojana) राबवण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा केली आहे. ही नेमकी योजना काय आहे याबाबतची माहिती पाहुयात. राज्यांच्या सहाय्यानं पंतप्रधान धन धान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत 100 जिल्ह्यांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. या योजनेचा देशातील 1.7 कोटी शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्री सीतारान यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये पंतप्रधान धन धान्य कृषी योजना ही एक महत्वाची योजना मानली जात आहे. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. ही मर्यादा 3 लाखावरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. याचा मोठ्या प्रमाणात फायदा देशातील शेतकऱ्यांना होमार आहे.
कृषी क्षेत्रासाठी विविध तरतुदी
दरम्यान, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेबरोबरच अर्थमंत्री सीतारामाण यांनी अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 च्या भाषणात डाळींमध्ये 'आत्मनिर्भरता' साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा केली आहे. तसेच कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणारफळ भाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे. तसेच कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी 5 वर्षाचे मिशन राबवण्यात येणार आहे. कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर किसान क्रेडीट कार्डसाठी शेतकऱ्यांना 3 लाखावरुन 5 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच देशात 3 नवीन युरिया प्लॅंट उभारण्यात येणार आहेत. यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी नवीन प्लॅंट उभारण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या: