मुंबई : मिरत शहरातील मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसह,  पती सौरभची हत्या करून त्याच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. ते तुकडे निळ्या ड्रममध्ये ठेवले आणि वर सिमेंट ओतले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पकडून तुरुंगात टाकले. दोघेही तुरुंगात असल्यापासून त्यांनी प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. साहिल आणि मुस्कान यांनी जेलच्या बॅरेकमध्ये एकत्र राहण्याची मागणी केली होती. पण ती प्रशासनाने फेटाळून लावली. अशा परिस्थितीत पती-पत्नी जेलच्या बॅरेकमध्ये एकत्र राहू शकतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागे नियम काय सांगतात?

तुरुंगात पती-पत्नी एकाच बराकीत राहतात का?

एका हिंदी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, झाशी जिल्हा कारागृह अधीक्षक विनोद कुमार म्हणतात की, तुरुंगात पुरुष आणि महिला कैद्यांना एकत्र ठेवले जात नाही. दोघांसाठी स्वतंत्र बॅरेक करण्यात आले असून ते वेगळे ठेवण्यात आले आहेत. पती-पत्नी तुरुंगात असले तरी त्यांना स्वतंत्र बराकीत ठेवले जाते. यासाठी वेगळा नियम नसला तरी सुरक्षेच्या कारणास्तव महिला आणि पुरुष कैद्यांना वेगळे ठेवले जाते.

पती-पत्नी एकत्र कधी भेटू शकतात?

कारागृह अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, करवा चौथ किंवा इतर कोणत्याही विशेष प्रसंगी पती-पत्नीची भेट घडवून आणली जाते. अशा स्थितीत दोघेही सामाईक क्षेत्रात मिसळून जातात. भारतातील अनेक पती-पत्नी तुरुंगात कैद आहेत. यावेळी त्यांना स्वतंत्र बराकीमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना कोणतीही विशेष सुविधा दिली जात नाही. त्यांना सामान्य माणसाप्रमाणेच सुविधा दिल्या जातात.

पती-पत्नीला विशिष्ट क्षणी भेटण्याची परवानगी

पती-पत्नीला केवळ ठराविक वेळी आणि विशिष्ट राज्यांमध्ये तुरुंगात एकत्र राहण्याची परवानगी आहे आणि याला वैवाहिक भेट असे म्हणतात. येथे कैद्याला त्याच्या जोडीदारासोबत तुरुंगाच्या आवारात वेळ घालवण्याची संधी दिली जाते किंवा दुसऱ्या शब्दांत नाते निर्माण करण्यासाठी संधी दिली जाते. मात्र ही सुविधा विशेष परिस्थितीत दिली जाते आणि ज्या कैद्यांची वर्तणूक चांगली आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.

ही बातमी वाचा: