नवी दिल्ली : पुलवामा हल्ला (Pulwama Attack) शेतकरी आंदोलन (Farmer Protest) शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचा मृत्यू आदी मुद्यांवरून मोदी सरकावर सातत्याने 'सर्जिकल स्ट्राईक' केलेल्या जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Rahul Gandhi Interviewed Satyapal Malik) यांची आज काँगेस नेते राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर तुमच्यावरही आक्रमण करतील, असा उपरोधिक टोला सत्यपाल मलिक यांनी लगावला. राहुल गांधी यांनी घेतलेली मुलाखत त्यांच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते

राहुल गांधी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, जेव्हा मला कळले की आमचे शहीद (शहीदांचे पार्थिव) विमानतळावर येत आहेत, तेव्हा मी थेट विमानतळावर गेलो. आमचे सुरक्षा रक्षक म्हणाले जाऊ नका, पण मी जातो म्हणालो. विमानतळावर गेल्यावर मला खोलीत कोंडून ठेवले गेले, मला सांगण्यात आले की तुम्ही खोली सोडू शकत नाही. दुसरीकडे शहीद जवानांच्या शवपेट्या आल्या होत्या, पंतप्रधान येत होते आणि मला चावीने खोलीत कोंडले होते. मी सुरक्षा रक्षकांना विचारले की हे कसं काय करु शकतात? मी लढलो आणि तिथून बाहेर पडलो. मला असे वाटले की तिथे एक शो तयार झाला आहे, असा खुलासा राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांच्याशी झालेल्या चर्चेत केला. 

Continues below advertisement

मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला

राहुल गांधी म्हणाले की, त्यादिवशी मला विमानतळावर मोठी घटना घडत असल्याचा भास झाला. जसे पंतप्रधान देशाला दाखवत आहेत. सत्यपाल मलिक पुढे म्हणाले की, 'ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी ते (पीएम) कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते. मी 3-4 वेळा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाहीत. पाच सहा वाजता त्यांचा फोन आला, सत्यपाल भाई, काय झालं? मी म्हणालो की, आमच्यामुळे अनेक लोक वारले. ते म्हणाले की, नाही-नाही, गप्प बसा, आत्ता काही बोलू नका. एका तासानंतर मला माझा वर्गमित्र अजित डोभाल यांचा फोन आला. तोपर्यंत मी हे दोन वाहिन्यांना सांगितले होते. ते म्हणाला नाही, नाही, यावर काही बोलू नका. पुलवामाच्या प्रश्नावर मलिक म्हणाले की, मी असे म्हणत नाही की त्यांनी हे केले आहे परंतु त्यांनी पुलवामाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा राजकीय वापर केला. ही त्यांची त्यावेळची भाषणे आहेत जेव्हा ते म्हणतात की, तुम्ही मतदानाला जाल तेव्हा पुलवामाच्या हौतात्म्याची आठवण करा.

पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले

राहुल यांच्याशी संवाद साधताना मलिक म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर राजकारण हे कर्तव्य होते. लोक तसे करायचे आणि मग तो एक व्यवसाय बनला. आता हा व्यवसाय झाला आहे. काश्मीरच्या समस्येवर उपाय काय, या राहुल यांच्या प्रश्नावर जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल म्हणाले की, आधी राज्याचा दर्जा परत केला पाहिजे आणि नंतर निवडणुका घ्याव्यात. कलम 370 मुळे त्यांना राज्याचा दर्जा काढून केंद्रशासित प्रदेश बनवण्याइतका त्रास झालेला नाही. मला वाटते की UT ची स्थापना झाली कारण पोलीस बंड करतील अशी भीती त्यांना वाटत होती. पोलीस पूर्ण प्रामाणिकपणे सरकारच्या पाठीशी राहिले. ईदचे निमित्त होते पण पोलिसांनी सुटीही मागितली नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या