नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यात्यांच्यानियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात सहभागी झाल्याहोत्या. मात्र, राज्य सरकारने या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कोणताही मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते, ज्यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्यानेहिवागणूकखटकणारीआणिदेशाच्या राष्ट्रपतींचअवमानअसल्याचीभावनाआतासर्वस्थरातूनव्यक्तकेलीजातआहे. याबाबतआता स्वत: द्रौपदी मुर्मू (Draupadi murmu) यांनी खंत बोलून दाखवली आहे. (Draupadi Murmu on Mamata Banerjee)
राष्ट्रपतींनी याबाबत निराशा व्यक्त केली आणि म्हटले की, "कदाचित त्या (ममता बॅनर्जी) माझ्यावर नाराज आहेत," वादाची पार्श्वभूमी आणि घटनाकार्यक्रमाचे ठिकाण बदलणे: मूलतः हे सम्मेलन गोसाईनपूर येथे आयोजित करण्यात आले होते, पण राज्य सरकारने ते बिधाननगर येथे हलवले. राष्ट्रपतींना अतिरिक्त 30 किलोमीटर प्रवास करावा लागला, अव्यवस्था झाली. यामुळे कमी लोक उपस्थित राहिले आणि राष्ट्रपतींनी याबाबत दुःख व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही. याबाबत राष्ट्रपतींनी स्वतः भाषणात उल्लेख केला आणि राज्य सरकारच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला.
Draupadi Murmu on Mamata Banerjee : मी ममता बॅनर्जींना माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण
यावेळीबोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, "मी ममता बॅनर्जींना माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण कदाचित त्या माझ्यावर रागावल्या आहेत." हे वक्तव्य उत्तर बंगालमधील आदिवासी समाजासाठी आयोजित कार्यक्रमात केले गेले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर सडकून टीका केली आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारने "सर्व मर्यादा ओलांडल्या" असा आरोप केला. तर गृहमंत्री अमित शाह यांनी टीएमसीने "पातळी सोडली" असे म्हटले आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या प्रोटोकॉल उल्लंघनाची टीका केली आणि म्हणाले की, राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान दिला गेला नाही. तरदुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी, "भाजपने राष्ट्रपतीपदाचे राजकारण करू नये", असा पलटवार केला आहे.
Devendra Fadnavis : राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह
दुसरीकडेयाचमुद्द्यावरबोटठेवत मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीहीटीकाकरतनाराजीव्यक्तकेलीआहे. ममता बॅनर्जी सरकारचे वर्तन म्हणजे लोकशाही आणि प्रत्येक भारतीयाचा अपमान करणारे आहे. राष्ट्रपतींच्या संदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह. अशाशब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर टीका केलीआहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मुंसोबत झालेल्या व्यवहारावरून बॅनर्जींवर चौफेर टीका होतआहे.
Devendra Fadnavis : नेमकंकायम्हणालेदेवेंद्र फडणवीस?
भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्याशी ममता बॅनर्जी यांच्या राज्य सरकारचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि अत्यंत लज्जास्पद आहे. माननीय राष्ट्रपती हे आपल्या राष्ट्राचे सर्वोच्च संवैधानिक अधिकारी आहेत आणि अशा प्रकारचा उघड अनादर ममता बॅनर्जी ज्या अहंकाराला आणि धोकादायक राजकीय संस्कृतीला प्रोत्साहन देतात, त्याचे प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींचा अपमान करणे हे संविधानाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. असेहीमुख्यमंत्रीम्हणाले.
इतरमहत्वाच्याबातम्या.
