पटनामधील एका कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्या वेळी बोलताना लालूंनी मोदींवर टीका केली. 'नोटाबंदीनंतर पंतप्रधान म्हणाले होते की, 50 दिवसानंतर परिस्थिती सुधारली नाही तर तुम्ही म्हणाल तिथं मला द्याल ती शिक्षा मी स्वीकारेल.'
त्यामुळे आता मोदींनीच सांगावं की, कोणत्या चौकात त्यांना शिक्षा देण्यात यावी.' असा सवाल लालूंनी मोदींना केला होता. उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपला अपयश पाहावं लागेल. असंही लालू म्हणाले
दरम्यान, 13 नोव्हेंबरला गोव्यातील एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शिक्षा देण्याचं वक्तव्य केलं होतं.