या सर्व अधिकाऱ्यांना डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड अडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सच्या नियम 56 अंतर्गत कामावरुन कमी करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अर्थ मंत्रालय या अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाखुष होतं. यातील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता, तसंच लैंगिक शोषणाचे आरोपही होते.
मोदी सरकारने घरी पाठवलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अशोक अग्रवाल, एसके श्रीवास्तव, होमी राजवंश, बीबी राजेंद्र प्रसाद, अजॉय कुमार सिंह, बी अरुलप्पा, आलोक कुमार मित्रा, चांदर सेन भारती, अंडासू रवींद्र, विवेक बत्रा, स्वेताभ सुमन आणि राम कुमार भार्गव यांचा समावेश आहे.