एक्स्प्लोर

Supreme Court on Maharashtra Politics : 'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले; आमदार अपात्रता मुद्यावर बोलताना सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील नेत्यांचीही खरडपट्टी

खंडपीठाने म्हटले की, राजकीय पक्षांतर रोखण्याचे उद्दिष्ट असलेली संविधानाची 10वी अनुसूची निरर्थक ठरत आहे कारण पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

Supreme Court on Maharashtra Politics : तेलंगणातील दलबदलू नेत्यांच्या अपात्रतेशी संबंधित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (25 मार्च) महाराष्ट्रातील नेत्यांचीही (Supreme Court on Maharashtra Politics) खरडपट्टी काढली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीकडे लक्ष वेधत न्यायालयाने म्हटले की, 'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले आहे. न्यायमूर्ती भूषण आर. गवई आणि एजी मसिह यांच्या खंडपीठासमोर तेलंगणातील काँग्रेसमध्ये सामील झालेल्या तीन भारत राष्ट्र समिती (BRS) आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित खटल्याची सुनावणी सुरू होती. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने म्हटले की, राजकीय पक्षांतर रोखण्याचे उद्दिष्ट असलेली संविधानाची 10वी अनुसूची निरर्थक ठरत आहे कारण पक्षांतर करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही.

'आया राम, गया राम'मध्ये महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकले

खंडपीठ म्हणाले, माझ्या भावाच्या (न्यायमूर्ती मसिह) राज्यातून (पंजाब आणि हरियाणा) 'आया राम गया राम' सुरू झाला, पण अलीकडील वर्षांत महाराष्ट्राने (Supreme Court on Maharashtra Politics ) या बाबतीत सर्व राज्यांना मागे टाकल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. 'आया राम, गया राम' थांबवणे हा 10व्या अनुसूचीचा उद्देश असल्याचेही खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयांनी या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप केला नाही, तर ही 10 व्या अनुसूचीची थट्टा ठरेल.

'आया राम गया राम' हे वाक्य कुठून आले?

'आया राम, गया राम' हे भारतीय राजकारणातील लोकप्रिय वाक्प्रचार आहे. हरियाणाचे आमदार गया लाल यांच्यावर आधारित आहे. गयालाल यांनी 1967 मध्ये एकाच दिवसात तीनदा पक्ष बदलले. त्यानंतरच्या काही वर्षांत अनेक आमदारांच्या पक्षांतरामुळे राज्य सरकारे पडू लागली. त्यामुळेच ही परंपरा बंद करण्यासाठी संसदेला कायदा करावा लागला. 1985 मध्ये, घटनेत दुरुस्ती करण्यात आली आणि पक्षांतराच्या कारणास्तव आमदार आणि खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी 10 व्या अनुसूची जोडण्यात आली. याला सामान्यतः पक्षांतरविरोधी कायदा म्हणतात.

कोणत्या खटल्याची सुनावणी सुरू होती?

तेलंगणातील तीन बीआरएस आमदार तेलम वेंकट राव, कादियम श्रीहरी आणि दानम नागेंद्र यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यापैकी एकाने बीआरएस आमदार असताना काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूकही लढवली होती. या तिन्ही आमदारांना अपात्र ठरवून त्यांच्या जागेवर नव्याने विधानसभा निवडणूक घेण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

महाराष्ट्रात गेली तीन वर्षात राजकारणाचा चिखल 

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे होऊन आता दोन पक्षांचे चार पक्ष झाले आहेत. हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि फक्त तारीख पे तारीख सुरु आहे. विशेष म्हणजे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे मराठी असूनही या प्रकरणावर उचित निर्णय न घेतल्याने सातत्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मे 2022 मध्ये शिवसेनेला फुटीचा सामना करावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 38 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वापासून वेगळे होऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि सरकार स्थापन केले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही तेच केले आणि सरकारमध्ये सहभागी झाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report
Sayaji Shinde :सयाजींची भूमिका सत्ताधाऱ्यांना पटेना, वृक्षतोडीला सयाजी शिंदेंचा विरोध Special Report
Nitesh Rane : झाडांचा गेम, बकऱ्यांवरून नेम; पर्यावरणप्रेम आणि बकऱ्यांचा संबंध तरी काय? Special Report
Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News: दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
दिवंगत्वाचे युडीआयडी कार्ड सादर न करणे अंगलट, बीडमध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शिक्षकांचं थेट निलंबन; नेमकं काय घडलं?
Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात
Vishal Patil: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Video: सांगलीच्या शाळकरी शौर्यने दिल्लीत जीव दिला, एफआयआर होऊनही अटकेची कारवाई नाही; खासदार विशाल पाटलांचा संसदेत रुद्रावतार
Jobs in germany Maharashtra: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Jobs in germany: महायुती सरकारच्या दुर्लक्षामुळे मोठं नुकसान, 10 हजार विद्यार्थ्यांची जर्मनीत नोकरीची संधी हुकली
Pune Land Scam:  'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
'मला भावाच्या लग्नाला जायचंय, वेळ वाढवून द्या'; दिग्विजय पाटलांनी चौकशीत काय म्हटलं?
Pune Land Scam: 300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
300 कोटी कोणाच्या बँक अकाउंटला गेले? शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद
Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Gold price hike dollar rate: अबब! सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
सोने दरात मोठी उसळी, एका आठवड्यात 5000 रुपयांनी भाव वाढला, एक तोळा सोन्याची किंमत किती?
Embed widget