वैष्णोदेवी भूस्खलन : मृतांचा आकडा 34 वर, 58 गाड्या रद्द, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
माता वैष्णो देवीच्या मंदिरात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

Vaishnodevi landslide : माता वैष्णो देवीच्या (Vaishnodevi) मंदिरात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. दररोजप्रमाणे, भाविक माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी चढत होते आणि ज्यांनी आधीच दर्शन घेतले होते ते परतत होते. जम्मूमध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. यामुळं भूस्खलन (landslide )होण्याच्या घटना घडत आहेत.
मंगळवारी दुपारी 3 वाजता दगड पडू लागले
प्रत्यक्षदर्शींच्या मते, मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अर्धकुंभवारी मंदिरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या टेकडीवरून अचानक मोठे दगड पडू लागले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ना धावण्याची संधीच मिळाली नाही. काल संध्याकाळपर्यंत 5 ते 7 ते जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती, परंतु आज सूर्योदयापर्यंत हा आकडा 34 पर्यंत पोहोचला. कटरा ते जम्मूपर्यंत गोंधळ आहे.
दररोज 25 ते 30 हजार भाविक मंदिरात येतात
दररोज 25 ते 30 हजार भाविक मंदिरात येतात. कटरा येथून चढाई सुरू झाल्यावर मंदिरात पोहोचण्यासाठी 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो, तर 7 किलोमीटर नंतर भाविक अर्धकुंभरी गुहेचे दर्शन घेण्यासाठी थांबतात. बऱ्याचदा भाविक परतताना गुहेला भेट देतात. दुपारी 3 वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस पडत होता आणि 14 किलोमीटर लांबीच्या तीर्थयात्रेच्या मार्गावर हजारो भाविक चढत होते किंवा परत येत होते.
आकडेवारीवरून असे दिसून येते की दररोज 25 ते 30 हजार भाविक माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येतात आणि देशातील असा कोणताही भाग नाही जिथे देवीचे भक्त नसतील. दरम्यान, या पार्श्वभूमीवर 58 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसानंतर परिस्थिती इतकी बिकट झाली की जम्मू, कटरा, पठाणकोट, अमृतसर ते दिल्ली किंवा त्याहून पुढे हळू जाणाऱ्या गाड्या धावत नाहीत. रेल्वेने जम्मू प्रदेशात 58 गाड्या रद्द केल्या आहेत. दिल्ली ते कटरा, दिल्ली-जम्मू तवी, अमृतसर ते कटरा यासारख्या महत्त्वाच्या गाड्या प्रभावित झाल्या आहेत. आजही 64 गाड्यांचा मार्ग लहान करण्यात आला आहे. यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
शाळा आणि महाविद्यालये बंद
पूरसदृश परिस्थिती लक्षात घेता जम्मू आणि काश्मीरमधील शैक्षणिक संस्था गुरुवारी (28 ऑगस्ट) बंद राहतील. ही माहिती शिक्षण मंत्री सकिना इटू यांनी दिली. इटू यांनी बुधवारी 'एक्स' वर पोस्ट केले की, "खराब हवामानामुळे जम्मू आणि काश्मीरमधील शाळा आणि महाविद्यालये उद्या बंद राहतील.
महत्वाच्या बातम्या:























