आज इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं उड्डाण होणार, जवळपास 650 फ्लाईट्स आणखी रद्दच , सेवा पूर्वपदावर करण्याचे प्रयत्न सुरु
गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सची मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांन बसला आहे. आता हळूहळू इंडिगोची सेवा पूर्वपदावर येत आहे.
IndiGo Airlines : गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या (IndiGo Airlines) नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. त्यानंतर कालपासून हळूहळू इंडिगो एअरलाइन्सची सेवा पुर्वपदावर येत आहे. काल 1500 पेक्षा अधिक उड्डाणे सुरु झाली आहेत. अशातच आज देखील इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं नियोजन करण्यात आलं आहे.
15 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी रद्दीकरण/पुनर्नियोजनावर पूर्ण शुल्क माफी करण्यात आली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आज इंडिगोच्या 1 हजार 650 फ्लाईट्सचं नियोजन करण्यात आलं आहे. पण दुसरीकडे इंडिगोच्या जवळपास 650 फ्लाईट्स आणखी देखील रद्दच आहेत. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. काल इंडिगोच्या 1500 फ्लाईट्सनं उड्डाण केले होते. दररोज इंडिगोच्या जवळपास 2300 फ्लाईट्स उड्डाण घेतात. आज वेळेवर उड्डाणांची कामगिरी 75 टक्के, काल फक्त 30 टक्के विमानं इंडिगोची वेळेनुसार उड्डाणं केली होती. 138 पैकी 137 ठिकाणी फ्लाईट्स ऑपरेशन्स कार्यरत आहेत. 15 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी रद्दीकरण/पुनर्नियोजनावर पूर्ण शुल्क माफी करण्यात आली आहे.
इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात वाढ
इंडिगो एअरलाईन्सच्या (Indigo Airlines) बिघडलेल्या वेळापत्रकाचा देशातील हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत असून, इतर विमान कंपन्यांनी तिकीट दरात (Ticket Price) मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गावरील भाडे प्रचंड वाढले असून, एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीट दर तब्बल एक लाख रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानासाठी देखील 30 हजार रुपयांहून अधिक भाडे आकारले जात असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून पुणे विमानतळावर त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. शुक्रवारी इंडिगोची 46 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची तसेच महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश आहे. बाहेरील राज्यांतून पुण्यात येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली होती. काही उड्डाणांचे वेळापत्रक दिवसभरात अनेकदा बदलण्यात आले, त्यामुळे प्रवासी पूर्णपणे गोंधळून गेल्याचे पाहायला मिळाले. इंडिगोने शुक्रवारी देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर सलग चौथ्या दिवशी देशातील विमानतळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत (11:59 वाजेपर्यंत) रद्द केल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने 'एक्स'वर जाहीर केले. यामुळे हजारो प्रवासी ताटकळले, काहींना रात्रभर विमानतळावरच थांबावे लागले.
महत्वाच्या बातम्या:
























