एक्स्प्लोर

सूर्य आग ओकणार, देशातील अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. देशातील बहुतांश रपाज्यातील तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

India Weather : हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. देशातील बहुतांश रपाज्यातील तापमानाचा पारा 35 ते 40 अंशाच्या आसपास गेला आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. दिल्लीत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसह अनेक राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.  

'या' भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढणार 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 6 किंवा 7 एप्रिलपर्यंत दिल्ली-एनसीआरचे तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. पुढील सहा दिवस उन्हाचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्येही तापमानाचा पारा चांगलाच वाढणार आहे. या भागात तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

एप्रिल-जूनमध्ये कसं असेल हवामान?

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून दरम्यान भारतात सामान्यपेक्षा जास्त उष्णता राहण्याची शक्यता आहे. या काळात सहसा खूप उष्णता असते. यंदा उष्णतेने आणखी धोकादायक रुप धारण केले आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल रोजी कमाल तापमान 39 अंश आणि किमान तापमान 19 अंश राहण्याचा अंदाज आहे. लोकांना दिवसा सोसाट्याच्या वाऱ्याचाही सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पुढील तीन महिने तापानाचा पारा वाढणार असल्यानं नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका बसत आहे. कधी उन्हाचा तडाका तर कधी ढगाळ वातावरण होत आहे.

6 एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढणार

6 एप्रिलपासून तापमानाचा पारा वाढण्यास सुरुवात होणार आहे. कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 20 अंशांवर पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे 7 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 21 अंशांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 एप्रिल रोजी कमाल तापमान 41 अंश तर किमान तापमान 22 अंशांवर पोहोचेल. 9 एप्रिल ते 11 एप्रिल या कालावधीत कमाल तापमान 40 अंश आणि किमान तापमान 22 अंश राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दोन्ही दिवशी नागरिकांना कमालीची आर्द्रता आणि उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. दिवसा जोराचा वारा आणि उष्णतेची लाट यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

सावधान! पुढील 3 महिने सूर्य ओकणार आग, 'या' राज्यांना सतर्कतेचा इशारा, उष्णतेच्या लाटेबाबत IMD ने दिली महत्वाची माहिती

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
Embed widget