India vs Pakistan War: भारताशी वाकड्यात जाऊन, पाकिस्तानने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. एकीकडे भारत पाकिस्तानात (India vs Pakistan War) घुसून कारवाई करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याला बलोच लिबरेशन आर्मीने घेरलं आहे. बलोच आर्मीने (Balochistan) जवळपास पाकिस्तानच्या एक तृतीयांश भागावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला. केच, मस्टंग आणि कच्छीमधून बलोच आर्मीने पाकिस्तानला पळवलं. तसेच बहुतांश भागात पाकचे झेंडे काढून बलोच आर्मीने त्यांचे झेंडे फडकावले आहेत. कालच सकाळी बलोच आर्मीने आयईडी ब्लास्ट करून, पाकिस्तानच्या 14 सैनिकांना यमसदनी पाठवल्याचं समोर आलं होतं. याआधी याचवर्षी मार्च महिन्यात याच बलोच आर्मीने जाफर एक्स्प्रेसचं अपहरण करून पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले होते.

बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केले-

बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेट्टावरीलही नियंत्रण पाकिस्तानने गमावल्याची माहिती आहे. बलोच लिबरेशन आर्मीने क्वेट्टामधील पाकिस्तानी लष्कराच्या छावण्यांवर मोठे हल्ले केले आहे. पाकिस्तान सैनिकांवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करत बीएलएने क्वेटा ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय बलोचांनी पाकिस्ताने अनेक कॅम्पदेखील नेस्तनाबूत केलेत.  पाकिस्तान आता सर्व बाजूंनी वेढला गेल्याचं पाहायला मिळत आहे.

बलुचिस्तानमध्ये 1948 पासून स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू-

बलुचिस्तानचा भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये महत्त्वाचा स्थान आहे. तथापि, येथील अस्थिरता आणि विकासाच्या अभावामुळे प्रांताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. बलुचिस्तानमध्ये 1948 पासून स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू आहेत. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) सारख्या संघटना पाकिस्तान सरकारविरोधात सशस्त्र संघर्ष करतात. या संघटनांचे आरोप आहेत की, पाकिस्तान सरकार प्रांताच्या नैसर्गिक संसाधनांचा शोषण करते आणि स्थानिक लोकांना त्यांच्या विकासात सहभागी करत नाही. या संघर्षामुळे प्रांतात अनेक वेळा हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत, ज्यात सुरक्षा दलांवर हल्ले, अपहरण आणि बॉम्बस्फोट यांचा समावेश आहे.

बलुचिस्तान पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतो-

बलुचिस्तान (Balochistan) हे पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम भागातील सर्वात मोठे, पण तुलनेने कमी लोकसंख्या असलेले प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ सुमारे 347,190 चौ.किमी असून, ते पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या सुमारे 44% आहे. बलुचिस्तानमध्ये बलुच लिबरेशन आर्मी (BLA) सारख्या गटांनी पाकिस्तानपासून स्वतंत्रतेसाठी सशस्त्र संघर्ष सुरू केला आहे. या संघर्षात अनेकदा सुरक्षा दलांवर आणि परदेशी नागरिकांवर हल्ले होतात. 6 मे 2025 रोजी कच्छी जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॉम्बस्फोटात 7 सैनिक ठार झाले, ज्याचा आरोप BLA वर ठेवण्यात आला. बलुचिस्तानचा भौगोलिक, आर्थिक आणि राजकीय महत्त्वामुळे तो पाकिस्तानसाठी अत्यंत संवेदनशील प्रांत मानला जातो. येथील अस्थिरता आणि स्वतंत्रतेच्या मागण्या भविष्यातही पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान ठरू शकतात. बलुचिस्तान हे नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असून, येथे कोळसा, तांबे, सोने आणि नैसर्गिक वायू यांचे मोठे साठे आहेत . तरीही, हा प्रांत आर्थिकदृष्ट्या मागासलेला मानला जातो, आणि स्थानिक लोकसंख्येमध्ये विकासाच्या अभावामुळे असंतोष आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

India Pakistan War: स्वागत नहीं करोगे हमारा! भारताच्या INS विक्रांतची एन्ट्री, पहिल्याच हल्ल्यात कराची बंदर उडवलं, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं!

India vs Pakistan War: बाप बाप होता है! गेल्या 24 तासांत पाकिस्तानचं काय काय नुकसान झालं?; भारतीय सैन्याने पाकची केली पळता भुई थोडी!