एक्स्प्लोर

Iran Isreal Conflict : रमजानच्या पवित्र महिन्यात इराण-इस्त्रायल युद्ध भडकणं दुर्दैवी, भारताकडून भूमिका स्पष्ट, एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

India On Iran Isreal War : इराण-खाडी संघर्ष तीव्र होत असताना आखातातील एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. 

Iran Isreal War Update : इराण आणि आखाती भागातील संघर्ष तीव्र होत असताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचं भारताने स्पष्ट केलं. या संघर्षात अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्याबद्दल भारताने तीव्र शोक व्यक्त केला. भारत सरकार बदलत्या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेत राहील, असेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Indian Citizens Safety : एक कोटी भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न

आखाती भागात सुमारे एक कोटी भारतीय नागरिक वास्तव्यास असून तेथे काम करतात. त्यांच्या सुरक्षेला आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. या प्रदेशातील कोणत्याही नकारात्मक घडामोडींचा परिणाम भारतावर होऊ शकतो, याचीही चिंता सरकारने व्यक्त केली.

संघर्षग्रस्त देशांतील भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास नागरिकांशी सातत्याने संपर्कात असून आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचना (Advisories) जारी करत आहेत. अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्रालयाने सांगितलं.

Energy Supply Impact : व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम

भारताची व्यापार आणि ऊर्जा पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणात याच भौगोलिक क्षेत्रातून जाते. त्यामुळे कोणताही मोठा व्यत्यय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गंभीर परिणाम घडवू शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

व्यावसायिक जहाजांवरील (Merchant Shipping) हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला आहे. गेल्या काही दिवसांत अशा हल्ल्यांमध्ये काही भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Diplomatic Appeal : संयम आणि संवादाचे आवाहन

28 फेब्रुवारी रोजी इराण आणि इस्त्रायल-अमेरिका संघर्ष सुरू झाल्यानंतर भारताने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे, तणाव वाढवू नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असं आवाहन केलं होतं. मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात परिस्थिती अधिकच बिघडल्याचे मंत्रालयाने नमूद केलं.

भारताने पुन्हा एकदा संवाद आणि कूटनीतीचा मार्ग स्वीकारण्यावर भर दिला आहे. लढाई लवकरात लवकर थांबावी, अशी स्पष्ट भूमिका भारताने मांडली आहे.

Prime Minister & External Affairs : उच्चस्तरीय चर्चा सुरू

पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या समकक्ष नेत्यांशी चर्चा केली असून भारत या क्षेत्रातील सरकारांशी आणि प्रमुख भागीदार देशांशी सतत संपर्कात आहे. बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून देशहितासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
युद्धाचा परिणाम थेट उद्योगांवर, पाच दिवसांपासून बीडमध्ये ठिबक सिंचनच्या पाईपचे उत्पादन बंद, पुरवठ्याची साखळी विस्कळीत
Farooq Abdullah Firing : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी
माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
LPG गॅसची कमतरता भासणार नाही, मध्य पूर्वेतील युद्धाच्या भारतावर परिणाम नाही, केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
LPG गॅसची कमतरता भासणार नाही, मध्य पूर्वेतील युद्धाच्या भारतावर परिणाम नाही, केंद्र सरकारनं उचललं मोठं पाऊल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
Embed widget