एक्स्प्लोर

CJI BR Gavai : मी तुमच्या कारवाया पाहिल्यात, पण त्यावर बोलू इच्छित नाही, नाहीतर...; तामिळनाडू प्रकरणावर ED ला 'सर्वोच्च' फटकार

CJI BR Gavai On ED Action : तामिळनाडूतील पोलीस तपास करत असताना या प्रकरणा ईडीने हस्तक्षेप करायची काय गरज होती असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने ईडीला विचारला.

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये राज्य मार्केटिंग कॉर्पोरेशनमध्ये (TASMAC) कथित घोटाळ्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने वर्तन संचालनालयाला (ED) चांगलंच फटकारलं आहे. राज्य पोलिसांकडे तपासाची जबाबदारी असताना ED च्या हस्तक्षेपाची काय गरज होती? राज्याच्या पोलिसांमध्ये तपासाची क्षमता नाही का? असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारले. तसेच गेल्या सहा वर्षांमध्ये आम्ही तुमच्या अनेक कारवाया पाहिल्या आहेत, त्यावर बोललो तर सोशल मीडियामध्ये व्हायरल होईलं अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीला फटकारलं आहे.

न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी (14 ऑक्टोबर) रोजी तामिळनाडूतील TASMAC प्रकरणावर सुनावणी झाली. ED ने मार्च महिन्यात TASMAC च्या चेन्नई मुख्यालयावर छापेमारी करून संगणक आणि अनेक कागदपत्रे जप्त केली होती. या छाप्यांमागे दारूच्या बाटल्यांच्या किमती वाढवणे, टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार आणि लाचखोरीचे आरोप होते.

CJI BR Gavai On Tamil Nadu Case : राज्यांच्या अधिकारावर हस्तक्षेप नाही का?

सुनावणीदरम्यान न्यायालयाने ईडीला फटकारत विचारले. राज्य पोलिसांकडे तपास करण्याची क्षमता नाही का? ED चा असा हस्तक्षेप म्हणजे राज्यांच्या अधिकारात अतिक्रमण नाही का? यामुळे संघीय रचनेवर काय परिणाम होईल? अशा प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने ईडीवर केली.

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, “गेल्या सहा वर्षांत आम्ही अनेक प्रकरणांत ED ची तपास पद्धत पाहिली आहे. पण यावर आम्ही काही बोलू इच्छित नाही. अन्यथा सोशल मीडियावर हाच विषय चर्चेचा मुद्दा बनेल.”

या वक्तव्यावर अॅडिशनल सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू म्हणाले की, सोशल मीडियावर आमच्या बाजूने कोणी बोलत नाही, हेच आमचं दुःख आहे.

Tamil Nadu TASMAC Scam : कपिल सिब्बल यांचा ईडीवर सवाल

TASMAC च्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, “सरकारी संस्थेवर छापेमारी कशी केली जाऊ शकते? कारवाईचा आदेश स्वतः TASMAC नेच दिला होता. ईडीने व्यवस्थापकीय संचालकांच्या घरावर छापे टाकले आणि संगणक जप्त केले. हे अतिशय धक्कादायक आहे.”

त्यावर एएसजी राजू यांनी सांगितले की, TASMAC मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याने 47 एफआयआर दाखल झाले आहेत. त्यावर प्रतिवाद करताना कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, या प्रकरणांपैकी बहुतांश आधीच बंद झाले आहेत.

न्यायालयाने सुनावणीअखेर नमूद केले की, राज्यांच्या तपास अधिकारात केंद्र सरकारच्या संस्थांनी हस्तक्षेप करू नये, अन्यथा संघीय रचनेवर परिणाम होऊ शकतो.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget