Chandrayaan-3 Mission : भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आता इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) ने 14 जुलै रोजी सोडलेल्या ‘चांद्रयान-3’ने (Chandrayaan-3) आतापर्यंत चंद्राच्या दिशेने दोन तृतीयांश अंतर पार केलं आहे. त्यानुसार, आज (5 ऑगस्ट) रोजी संध्याकाळी 7 वाजता हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे अशी माहिती इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 






प्रक्षेपण झाल्यापासून, चांद्रयान-3 ची कक्षा वाढवण्याच्या ऑपरेशनमध्ये पाच वेळा यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे. आज हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तर, 23 ऑगस्ट रोजी हे वाहन चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान -3 ने पृथ्वीच्या कक्षेतील सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करत 1 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला. 


इस्रोच्या म्हणण्यानुसार, 5 ऑगस्ट रोजी आणखी एका महत्त्वाच्या प्रयत्नात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. हे यान आज संध्याकाळी 7 वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या सर्वात जवळ असेल तेव्हा हा प्रयत्न केला जाईल, असं इस्रोने म्हटलं आहे. 


5 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता लुनार ऑर्बिट इंजेक्शन निर्धारित केले आहे." यापूर्वी, अंतराळ संस्थेने म्हटले होते की, ते 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजता अंतराळयान LVM-3 वर 35 तास यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. चांद्रयान-3 ला प्रक्षेपण झाल्यापासून चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी सुमारे 33 दिवस लागतील असे इस्रोकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.


14 जुलैला यशस्वीरित्या प्रक्षेपण झालं 


भारताचे चांद्रयान-3 हे यान शुक्रवार (14 जुलै) रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान-3 अवकाशात झेपावले आणि देशाच्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला. भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरेल. 


महत्त्वाच्या बातम्या : 


PM मोदींच्या हस्ते एकाच वेळी 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांचे भूमीपूजन; राज्यातील 44 स्थानकांचा समावेश