PM Narendra Modi on Bihar Election Result 2025 : फिर एक बार एनजडीए सरकार हे बिहारच्या जनतेने दाखवून दिल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी व्यक्त केले. बिहारच्या जनतेने समृद्ध भारतासाठी मतदान केले आहे. बिहारच्या जनतेने सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. बिहारच्या जनतेने विकासाला मतदान दिले आहे. मी एनडीच्या सर्व दलांकडून बिहारच्या महान जनतेचे आभार मानतो असे नरेंद्र मोदी म्हणाले. लोहा लोहे को काटता है, बिहारमध्ये काही दलांनी माय फॉम्युला तयार केला होता. मात्र, आजच्या विजयाने नवीन सकारात्मक महिला आणि युश हा फॉर्म्युला दिला आहे. 

Continues below advertisement

बिहारच्या जनतेने महिला आणि युथ हा फॉर्म्युला दिला

जयप्रकाश नारायण, करपूरी ठाकूरजी यांना प्रणाम करतो. करपूरी ठाकूरजी यांच्या गावापासून मी बिहारमधील प्रचाराला सुरुवात केली होती. बिहारच्या विकासाला नवीन उंचीवर आम्ही घेऊन जाणार आहोत. लोहा लोहे को काटता है, बिहारमध्ये काही दलांनी माय फॉम्युला तयार केला होता. मात्र आजच्या विजयाने नवीन सकारात्मक महिला आणि युथ हा फॉर्म्युला दिला आहे. आज बिहार देशातील या राज्यात आहे की, सगळ्यात जास्त युवकांची संख्या आहे. यामध्ये प्रत्येक धर्म जातीचे युवक आहेत. त्यांनी जंगलारजला पूर्णपणे संपवलं आहे. युवकांचे आभा. शेतकरी सर्व व्यवसायिकांचे आभार, एनडीएच्या सर्व दलांचे आभार, नितीश कुमार शानदार नेतृत्व दिले. आजची विजय हा लोकशीहीचा विजय आहे. 

या निकालाने निवडणूक आयोगावर असणाऱ्या विश्वासाला मजबूत केले

एनडीएच्या नेतृत्वात बिहार पुढे जात आहे. बिहारच्या महान भूमीवर पुन्हा जंगलराज येणार नाही. हा विजय त्या युवकांची आहे, ज्यांना काँग्रेस आणि लााल झेड्यांच्या लोकांनी बरबाद केले होते. बिहार विकासाच्या रस्त्याने पुढे जात आहे. आजचे निकाल हे विकासविरोधकांसाठी उत्तर आहे. या निकालाने निवडणूक आयोगावर असणाऱ्या विश्वासाला मजबूत केले आहे. देशातील जनतेला एनडीएकडून अपेक्षा आहेत. प्रत्येक जाती धर्मातील लोक. समुदाय आशिर्वाद देत आहेत. बिहारला आणि देशाला विकसीत आम्ही करणार असल्याचे मोदी म्हणाले. 

Continues below advertisement

संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. एनडीए आघाडीचे उमेदवार 207 जागांवर आघाडीवर आहेत. तर महागठबंधनचे (Mahagathbandhan) उमेदवार अवघ्या 29 जागांवर आघाडीवर आहे. तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजप आणि संयुक्त जनता दल बिहारमध्ये (Bihar Election Result 2025) सहजपणे सत्ता स्थापन करेल, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधला.