एक्स्प्लोर

अहमदाबाद विमान दुर्घटना ते इंद्रायणी पूल दुर्घटना, 4 दिवसात देशात 4 मोठे अपघात 

गेल्या 4 दिवसात देशात 4 मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनांमुळं देशवासियांवर शोककळा पसरली आहे.

Big Accidents in india : गेल्या 4 दिवसात देशात 4 मोठे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनांमुळं देशवासियांवर शोककळा पसरली आहे. 12 जूनला गुजगारतमीधल अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला होता. यामध्ये 270 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशात इतर ठिकाणी देखील अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

आज म्हणजेच 15 जून 2025 रोजी केदारनाथजवळ एका हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना घडली. तसेच आजच मथुरा येथे आणखी एक मोठा अपघात झाला, जिथे अनेक लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती आहे. त्याच वेळी महाराष्ट्रातील पुण्यात इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

महाराष्ट्रातील पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू  

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे.  यामध्ये 20 ते 25 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण झखमी झाले आहेत. यामध्ये 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ही घटना दुपारी 3 वाजून 40 मिनीटांच्या सुमारास घडल्याची माहिती देण्यात आली आहे. कोसळलेल्या पुलाच्या भागात दगड होते. दगडांवर पडलेल्या लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच वेळी अनेक लोक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघात

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आज (15 जून) सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथून यात्रेकरूंना गुप्तकाशी तळावर परत आणत होते. या हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रौढ व्यक्ती आणि एक बाळ होते. खोऱ्यातील हवामान अचानक बिघडल्यानं हेलिकॉप्टर अपघात झाला. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये 2 वर्षाच्या चिमकल्याचा देखील समावेश आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाला. राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, दोन वर्षांची मुलगी काशी जयस्वाल अशी मृतांची नावं आहेत.

मथुरा येथे मोठी दुर्घटना

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील गोविंद नगर पोलीस स्टेशन परिसरातील माया टीला शाहगंज येथे उत्खननादरम्यान मोठी दुर्घटना घडली. खोदकामावेळी 5 ते 6 घरे कोसळली असून, किमान 12 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी तातडीने पोहोचले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानचा मोठा अपघात

गुरुवार (12 जून 2025) रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान कोसळले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. या अपघातात आतापर्यंत 270 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विमान अपघातात अडकलेल्यांचाही समावेश आहे. एअर इंडियाचे विमान निवासी भागात कोसळले.

महत्वाच्या बातम्या:

Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी पूल दुर्घटनेचा नवा व्हिडिओ समोर, चार ते पाच पर्यटक वाहून जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद Video

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget