Rahul Gandhi : राहुल गांधींकडून महाराष्ट्र निवडणुकीचा थेट डेटा सादर करत गंभीर आरोप अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली! एका क्षणात प्रतिक्रिया देत म्हणाले...
Rahul Gandhi : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताच निवडणूक आयोगाने सुद्धा पत्रकार परिषद संपण्याची वाट न पाहता उत्तर दिलं आहे.

Rahul Gandhi on Maharashtra Election : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र निवडणुकीवर आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निकालाची चिरफाड केली आहे. आज राहुल गांधी यांनी डेटाच सादर करत आयोगावर प्रश्नांची सरबत्ती करत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात आमची मते कमी झाली नाहीत, उलट भाजपची मते वाढली आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 32 लाख मतदार जोडले गेले, पण 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये 39 लाख मतदार कसे जोडले गेले, असा आरोप राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी इतके मतदार आले कुठून? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताच निवडणूक आयोगाने सुद्धा पत्रकार परिषद संपण्याची वाट न पाहता उत्तर दिलं आहे. आयोगाने ट्विट करत म्हटले आहे की, निवडणूक आयोग राजकीय पक्षांना प्राधान्य भागधारक मानते, अर्थातच मतदार हे प्रमुख असतात आणि राजकीय पक्षांकडून येणारे विचार, सूचना आणि प्रश्न यांना मनापासून महत्त्व देते. आयोग देशभरात एकसमानपणे स्वीकारल्या जाणाऱ्या संपूर्ण तथ्यात्मक आणि प्रक्रियात्मक मॅट्रिक्ससह लेखी स्वरूपात प्रतिसाद देईल. आगोयाच्या तत्काळ प्रतिक्रियेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक टोला लगावताना आम्ही 17 ऑक्टोबरपासून आम्ही वाट पाहत असून प्रतिक्रियेचे स्वागत करते, असे सांगितले.
ECI considers political parties,as priority stakeholders,of course the voters being the prime & deeply values views, suggestions, questions coming from political parties. Commission would respond in writing with full factual & procedural matrix uniformly adopted across the… pic.twitter.com/OwIsoIqOF9
— ANI (@ANI) February 7, 2025
महाराष्ट्रात प्रौढांपेक्षा जास्त मतदार: राहुल गांधी
दरम्यान, राहुल गांधी यांनी दिल्लीत संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंसह पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यात 9.54 कोटी प्रौढ आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात 9.7 कोटी मतदार आहेत. याचा अर्थ आयोग जनतेला सांगत आहे की महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत. हे कसे होऊ शकते?"
#WATCH | Delhi | On Election Commission tweet, NCP-SCP MP Supriya Sule says, "We have been waiting for it since 17th October. I welcome it." https://t.co/xH0VaMmnUY pic.twitter.com/qoPE5ZY2l8
— ANI (@ANI) February 7, 2025
कामठी विधानसभा जागेचा उल्लेख केला
कामठी विधानसभा जागेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसला लोकसभेत 1.36 लाख आणि विधानसभेत 1.34 लाख मते मिळाली, पण भाजपची मते 1.19 लाखांवरून 1.75 लाख झाली. म्हणजे नवीन मतदारांनी भाजपला मतदान केले. दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार यादीचा तपशील हवा आहे. मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर हटवण्यात आली असून, त्यापैकी बहुतांश दलित आहेत. निवडणूक आयोग प्रश्नांची उत्तरे देत नाही. निवडणुकीतील पारदर्शकतेची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मतदार यादी मागवली
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्राची मतदार यादी मागवली. निवडणूक आयोग आम्हाला यादी का देत नाही, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला मतदार यादीची संपूर्ण माहिती हवी आहे. यानंतर, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत राहुल म्हणाले की, निवडणूक आयुक्त नियुक्त करण्याच्या समितीतून CJI यांना काढून टाकण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली.
संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाचा विवेक असेल तर...
पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाची सद्सद्विवेकबुद्धी जिवंत असेल तर त्यांनी राहुल गांधींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, मात्र निवडणूक आयोग गुलामगिरी करत आहे. आता हे 39 लाख मतदार बिहारमध्ये जाणार आहेत. हे तरंगणारे मतदार आहेत. आधी बिहार आणि नंतर यूपीला जातील. महाराष्ट्रात आमचा पराभव झाला, मी निवडणूक आयोगाला आवाहन करणार आहे की, उठा, स्वतःहून कफन काढून उत्तर द्या.
सुप्रिया सुळे यांनी 11 जागांवर फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली
राष्ट्रवादीचे शरद पवार नेत्या सुप्रिया सुळे यांनी काही जागांवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, "ज्या मतदारसंघात आमचे उमेदवार विजयी झाले आहेत त्या मतदारसंघातही आम्हाला मतपत्रिकेवर फेरनिवडणूक हवी आहे. अशा 11 जागा आहेत जिथे चिन्हांमधील गोंधळामुळे आम्ही निवडणूक हरलो. सत्तेत असलेल्या पक्षानेही हे मान्य केले आहे. 'तुतारी' चिन्ह बदलण्यासाठी आम्ही अनेक विनंती केली, पण त्या विनंतीचा विचार झाला नाही. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व्हावे, अशी आमची मागणी आहे."























