शहिदांना श्रद्धांजली वाहताना लष्करप्रमुख म्हणाले, "शहीद जवानांना सलाम, ज्यांनी आपलं बलिदान दिलं. जवानांच्या बलिदानामुळेच आपण सर्व सुखरुप आहोत. जवान आणि त्यांच्या कुटुंबाचे कायम ऋणी राहू."
"काही जवान आपल्या समस्या मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. याचा परिणाम शूर जवानांवर पडेल", असे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी म्हटले.
सैन्य दिनाचं औचित्य साधून लष्करप्रमुखांनी 15 सैनिकांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. यामध्ये 5 जवानांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात आला.