स्वत:च्या जीवाची बाजी, अंगणवाडी सेविकेच्या पराक्रमानं मिळालं 20 मुलांना जीवदान
एका अंगणवाडी सेविकेने स्वत:च्या जीवाची बाजी लावत गावातील 20 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडस आणि प्रेमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
Anganwadi worker News : एका अंगणवाडी सेविकेने स्वत:च्या जीवाची बाजी लावत गावातील 20 मुलांचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. या महिलेच्या धाडस आणि प्रेमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील कांचनबाई मेघवाल (40) असं या अंगणवाडी सेविकेचं नाव आहे. अचानक मधमाशांचा थवा 20 मुलांवर अंगावर कोसळला होता. या महिलेने स्वत: च्या जीवाची पर्वा न करता या मुलांचे प्राण वाचवले. मात्र, दुसऱ्या बाजूल मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात या अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. मात्र, अंगणवाडी सेवेकेच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
नेमकी कशी घडली घटना?
मध्य प्रदेशातील मडवडा पंचायतीतील अंगणवाडी केंद्रात ही घटना घडली आहे. मधमाशांचा एक मोठा थवा अचानक अंगणात खेळणाऱ्या मुलांवर कोसळला होता. त्याच क्षणी, केंद्रातील स्वयंपाकी कांचनबाई मेघवाल यांनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता जवळच पडलेले ताडपत्री आणि चटई घेतली. एक एक करुन, तिने मुलांना गुंडाळले, स्वतःच्या शरीराने त्यांचे रक्षण केले आणि त्यांना केंद्रात नेले. ती मधमाश्या आणि मुलांच्या मध्ये उभी असतानाच, मधमाशांनी तिच्यावर हल्ला केला. शेकडो मधमाश्यांनी तिला चावल्या. तरीही, शेवटचे मूल सुरक्षित होईपर्यंत ती मागे हटली नाही. गावकरी मदतीसाठी धावले तोपर्यंत कांचनबाई कोसळल्या होत्या होत्या. तिला तातडीने रुग्णालयात नेत्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या शरीरावर असंख्य मधमाशांनी डंक केले होते.
कांचनबाई यांच्या कुटुंबाला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी
कांचनबाई फक्त अंगणवाडी सेविका नव्हत्या. त्या गावातील मुलांसाठी मध्यान्ह जेवण बनवत होत्या, जय माता दी स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांच्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ होत्या. त्यांचे पती शिवलाल हे आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या मागे एक मुलगा आणि दोन मुली आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह रानपूर गावात पोहोचल, तेव्हा गावकरी शांतपणे उभे राहिले आणि ज्या महिलेचे धाडस शब्दांत आवरता येत नाही तिला सलाम केला. गावात अजूनही भीतीचे वातावरण आहे. अंगणवाडी केंद्राजवळ एका झाडावर एक मोठा मधमाशांचा पोळा लटकलेला आहे, जिथे गावाचा एकमेव हातपंप आहे. पुन्हा एकदा हल्ला होण्याची भीती असल्याने रहिवाशांनी पाणी आणणे बंद केले आहे. गावकरी मधमाशांचा पोळा त्वरित काढून टाकण्याची आणि कांचनबाईंच्या शोकाकुल कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत.
























