'हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अनेक आले आणि अनेक गेले, हे सुद्धा निघून जातील, पण आम्ही कुठे गेलो नाही' अकबरुद्दीन ओवैसींची पीएम मोदींवर टीका
Akbaruddin Owaisi on PM Modi: ओवैसी म्हणाले की, भीती आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत. अनेक आले आणि अनेक गेले, हा सुद्धा निघून जाईल, पण आम्ही कुठेही गेलो नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Akbaruddin Owaisi on PM Modi: चहावाला आम्हाला घाबरवू शकत नाही, हा देश कोणाच्या बापाची जहागीर नाही, अशी टीका एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी पीएम मोदी यांच्यावर केली आहे. ओवैसी म्हणाले की, भीती आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत. अनेक आले आणि अनेक गेले, हा सुद्धा निघून जाईल, पण आम्ही कुठेही गेलो नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
अकबरुद्दीन ओवैसी कोण आहेत?
अकबरुद्दीन ओवैसी हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे एक प्रमुख नेते आहेत. ते एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन यांचे भाऊ आहेत. ओवैसी सध्या आमदार आहेत आणि त्यांनी हैदराबादमधील चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. त्यांना 2023 मध्ये तेलंगणा विधानसभेचे प्रो-टेम स्पीकर म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचे 15 मिनिटांचे विधान वादग्रस्त ठरले आहे. 2012 मध्ये, आदिलाबादमधील एका सभेत ते म्हणाले होते, जर पोलिसांना 15 मिनिटांसाठी काढून टाकले तर 25 कोटी मुस्लिम हे दाखवून देतील की ते 1 अब्ज हिंदूंच्या तुलनेत किती शक्तिशाली आहेत.
ओवेसींच्या एमआयएमला महाराष्ट्रात मोठं यश
दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणूक निकालात असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमनं महापालिका निवडणुकीत मोठी मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत एमआयएमचे 95 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एमआयएमनं मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील एमआयएमनं दमदार विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम दुसऱ्या स्थानावर राहिला. 9 पैकी 13 महापालिकांत एमआयएमचे 95 नगरसेवक विजयी झाले आहेत. छत्रपती संभाजनगरमध्ये उमदेवार निवडीत मोठा राडा पाहायला मिळाला होता. त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं 24 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये प्रत्येकी 8 याप्रमाणं एमआयएमचे 24 उमेदवार या तीन महानगरपालिकांमधून विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एमआयएमचे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झाले आहेत. चंद्रपूरमध्ये देखील एमआयएमनं विजयाचं खातं उघडलं आहे. एमआयएमसाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दीनं ओवेसी यांनी राज्यभरात सभा घेतल्या होत्या.
इतर महत्वाच्या बातम्या
























