पूँछ (जम्मू आणि काश्मीर) : अग्निवीर अमृतपाल सिंग (Agniveer Amritpal Singh) यांनी  जम्मू-काश्मीरमध्ये पूँछमध्ये कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिले. ड्युटीवर असताना गोळी लागल्याने अग्निवीर अमृतपाल सिंग शहीद झाले. त्याचवेळी लष्कराने त्यांना सलामी न दिल्याने उत्तर प्रदेशात संतापाची लाट पसरली आहे. पंजाबचा रहिवासी अमृतपाल सिंग हा त्यांच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, जो डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात दाखल झाला होता. भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले की, अमृतपाल सिंगचा11 ऑक्टोबर रोजी स्वत: ला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला. विद्यमान धोरणानुसार त्याला गार्ड ऑफ ऑनर किंवा लष्करी अंत्यसंस्कार प्रदान केले गेले नाहीत.


मिळालेल्या माहितीनुसार, 10 ऑक्टोबर रोजी गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. अग्निवीर अमृतपाल सिंगच्या निधनाचे वृत्त समजताच पंजाबमध्ये शोककळा पसरली. भारतीय लष्कराकडून शहीद जवानाच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली नाही. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि राष्ट्रीय लोकदलाने केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.


नवीन धोरणानुसार अग्निवीरला शहीदाचा दर्जा देण्यात आलेला नाही


माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ट्विट करून केद्र सरकारवर चौफेर हल्ला चढवला. त्यांनी म्हटले आहे की, अग्नीवीर अमृतपाल सिंगचे पार्थिव त्याच्या गावी आणण्यात आले. त्याचे पार्थिव दोन सैनिक खासगी रुग्णवाहिकेनं सोडून निघून गेले. ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार अग्निवीरला शहीदाचा दर्जा देण्यात आलेला नाही, त्यामुळे सलामी दिली जाणार नाही! त्यांनी त्यांच्या पुढच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मग गावकऱ्यांनी एसएसपीशी बोलून त्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना सलाम करायला लावले. या घटनेने हे सिद्ध होते की, अग्निवीरला हुतात्मा दर्जा मिळू नये आणि फौज संपुष्टात यावी म्हणून निर्माण करण्यात आले. केंद्र सरकारला शहीद दर्जा देत नाही याची लाज वाटली पाहिजे.






त्याचवेळी आरएलडीने अग्निवीर अमृतपाल सिंग यांना शहीद दर्जा न देणे आणि लष्कराच्या वतीने सलामी न देणे हा शहीदांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ट्विट करून म्हटले आहे की, अग्निवीर भरती झाल्यावर देशासाठी बलिदान देण्याचे कर्तव्य सांगून शहीद जवानाला मिळणारा सन्मान हिरावून घेतला, ही विडंबना आहे. शहीद अमृतपाल सिंग यांना लष्करी सन्मानाने अंतिम निरोपही देण्यात आला नाही. त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनाऐवजी एका खासगी रुग्णवाहिकेतून लष्करातील हवालदार आणि दोन जवानांनी आणले. हा देशाच्या हुतात्म्यांचा अपमान नाही तर काय आहे?






इतर महत्वाच्या बातम्या