Accident News : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या एसयूव्हीने पुलाचे रेलिंग तोडले आणि ती ३० फूट खोल कोरड्या नदीत पडली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गाडीत असलेला बोकड अपघातात बचावला आहे. पूजेनंतर कुटुंब बोकड बळीसाठी घेऊन जात होते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या चारगव्हाण-जबलपूर रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा अपघात झाला. या गाडीत पटेल कुटुंबातील सहा सदस्य होते, जे नरसिंहपूर येथील दादा दरबारात प्रतीकात्मकपणे बोकड आणि कोंबडी अर्पण केल्यानंतर जबलपूरला परतत होते. घरी आल्यानंतर, कुटुंब चिकन आणि मटण शिजवून एक कार्यक्रम आयोजित करणार होते.
चार जणांचा मृत्यू, दोन गंभीर
वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर एसयूव्ही रेलिंग तोडून नदीच्या कोरड्या पाण्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच, चारगव्हाण पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी आणि मृतदेह बाहेर काढले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. किशन पटेल (35), महेंद्र पटेल (35), सागर पटेल (17) आणि राजेंद्र पटेल (36) यांचा जागीच मृत्यू झाला. जितेंद्र पटेल (36) आणि मनोज प्रताप (35) हे दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बोकड अपघातातून बचावला
दरम्यान, गाडीत एक कोंबडी आणि एक बोकड देखील होती. पटेल कुटुंब पूजेनंतर बळी देण्यासाठी त्यांना घेऊन जात होते. अपघातात कोंबडीचा मृत्यू झाला, तर बोकडाचा कान कापला गेला, पण बोकड अपघातातून बचावला आहे. या अपघाताबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या