मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणतीही गडबड नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शिवाय, लवकरच मुंबईतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांची यादी जाहीर करु, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.


संबंधित बातमी : मुंबईतील 813 शेतकऱ्यांसह राज्यातील कर्जमाफी लाभार्थ्यांची आकडेवारी जाहीर

मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यलयाने प्रकाशित केलेल्या आकडेवारीत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.


कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफी?

मुंबई शहर – 694

मुंबई उपनगरे – 119

अहमदनगर – 2 लाख 869

औरंगाबाद – 1 लाख 48 हजार 322

बुलडाणा – 2 लाख 49 हजार 818

गडचिरोली – 29 हजार 128

जळगाव – 1 लाख 94 हजार 320

लातूर – 80 हजार 473

नागपूर – 84 हजार 645

नाशिक – 1 लाख 36 हजार 569

परभणी – 1 लाख 63 हजार 760

रत्नागिरी – 41 हजार 261

सिंधुदुर्ग – 24 हजार 447

वाशिम – 45 हजार 417

अकोला – 1 लाख 11 हजार 625

बीड – 2 लाख 8 हजार 480

चंद्रपूर – 99 हजार 742

गोंदिया – 68 हजार 290

जालना – 1 लाख 96 हजार 463

नांदेड – 1 लाख 56 हजार 849

उस्मानाबाद – 74 हजार 420

पुणे – 1 लाख 83 हजार 209

सांगली – 89 हजार 575

सोलापूर – 1 लाख 8 हजार 533

यवतमाळ – 2 लाख 42 हजार 471

अमरावती – 1 लाख 72 हजार 760

भंडारा – 42 हजार 872

धुळे – 75 हजार 174

हिंगोली – 55 हजार 165

कोल्हापूर – 80 हजार 944

नंदुरबार – 33 हजार 556

पालघर – 918

रायगड – 10 हजार 809

सातारा – 76 हजार 18

ठाणे – 23 हजार 505