Mumbai Local Train Accident: मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ 9 जून रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आता बंद दरवाज्याच्या नॉन एसी लोकल चालवल्या जाणार, असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. पण याआधी देखील हा प्रयत्न झालाय, जो फेल गेला होता. मग आता पुन्हा तोच  करण्यात येत असलेला प्रयत्न कसा फायदेशीर ठरेल हे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शिवाय यात कोणते बदल आताच्या लोकलमध्ये करण्यात येतील हे देखील मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले आहे. याप्रमाणेच जो अपघात घडला तो कशामुळे घडला असावा यासंदर्भात अनेक थिअरी मांडल्या जात आहेत, मात्र रेल्वे प्रवासी संघटना यांनी केलेला, दोन लोकल एकमेकांना घासल्या, हा दावा मध्य रेल्वेने खोडून काढला आहे. 

अपघात झाला त्या ठिकाणी नियमानुसारच ट्रॅक आणि वळण 

दरम्यान, अपघात झाला त्या ठिकाणी नियमानुसार ट्रॅक आणि वळण असल्याचे म्हणणे मध्य रेल्वेचे आहे. आनंदा पाटील यांनी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या तक्रारीनंतर सर्व बाबी तपासण्यात आल्याचे देखील मध्य रेल्वेचे म्हणणे आहे. मात्र या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक टीम रवाना करण्यात आली असून ही टीम सर्व बाबींचा अभ्यास करून चौकशी अहवाल सादर करणार असल्याचे देखील मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी सांगितले आहे. 

रेल्वेला मोठा स्क्रॅच पडल्याचा व्हिडीओ, रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

दोन लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून वळणावरून जात असताना त्या एकमेकांना घासल्या गेल्याने हा अपघात झाल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे. रेल्वेला मोठा स्क्रॅच पडल्याचा व्हिडीओ देखील रेल्वे प्रवासी संघटनेने समोर आणला आहे. लोकल एका बाजूला झुकल्यामुळे दुसऱ्या लोकांना ती घासली गेली असल्याचं रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणं आहे. त्यामुळे एका लोकलवर तशा प्रकारचे स्क्रॅच पाहायला मिळाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.  मात्र या व्हिडीओची पुष्टी एबीपी माझा करत नाही. 

दरम्यान, दोन लोकल गाड्या मुंबई स्टेशन वर  जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध बाजूने धावत होत्या. तेव्हा त्यातील एका लोकलवर काहीतरी घासल्याचे स्क्रॅच पाहिला मिळाले. नेमकं या लोकलच्या रॅकला काय घासलं गेलं? यासाठी समिती नेमून याची सखोल चौकशी रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. रॅकमधील अंतर पाहता रॅक घासले गेले नाही असं रेल्वे प्रशासनाचे म्हणणं आहे. प्रथमदर्शनी प्रवासी बॅग घासली गेल्याने हे स्क्रॅच आल्याचं निदर्शनास आलं. ही लोकल कळवा कारशेड इथे नेण्यात आली असून या सगळ्या प्रकाराची आणि कारणांची माहिती घेतली जातीये आणि चौकशी रेल्वेकडून केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या