Tata Punch : टाटा पंचची अवघ्या चार वर्षात 6 लाखांहून अधिक युनिटची विक्री; महाराष्ट्राचे 12 टक्के योगदान
Tata Punch : टाटा पंचने चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत 6 लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार केलाय. एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राने 12 टक्क्यांचे योगदान दिले आहे.

Tata Punch : टाटा पंचने चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत 6 लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार करत भारतातील लोकप्रिय एसयूव्ही म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. या यशामधून देशभरातील ग्राहकांमध्ये या कारची लोकप्रियता दिसून येते. टाटा पंचच्या एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राने 12 टक्क्यांचे योगदान दिले आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा पंच लाँच करण्यात आले होती. टाटा पंच पूर्णत: नवीन विभाग ‘सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही'मध्ये आघाडीवर आहे. तेव्हापासून या कारने देशभरातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गजबजलेल्या महानगरांपासून महत्त्वाकांक्षी दुर्गम भागांपर्यंत पंचची निवड ही विश्वसनीयता आणि स्टाइलची प्रतीक ठरली आहे. तसेच भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राची रूपरेषा बदलली आहे. या कारने २०२४ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनत इतिहास रचला.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स याबाबत म्हणाले की, पंचमधून आधुनिक भारतीयांचा उत्साह, तसेच साहसीपणा, स्वावलंबीपणा आणि कोणत्याही मार्गाकडे वाटचाल करण्याची सुसज्जता दिसून येते. 6 लाख युनिट्सचा टप्पा पार करणे उत्पादन यशापेक्षा अधिक आहे, यामधून 6 लाखांहून अधिक भारतीयांनी या कारवर दाखवलेला दृढ विश्वास दिसून येतो.पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी पंच पहिली निवड बनली असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. पंच फक्त कार नाही तर उल्लेखनीय ब्रँड आहे, ज्याने सांस्कृतिक परिवर्तनाला चालना दिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
टाटा पंचची वैशिष्ट्ये
- पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पंच अव्वल निवड बनली आहे. वापरकर्त्यांपैकी सुमारे 70 टक्के ग्राहक कार पहिल्यांदाच घेणारे आहेत.
- पंच महिला ड्रायव्हर्समध्ये अधिक लोकप्रिय ठरली आहे. या गाडीच्या 25 टक्के महिला मालक आहेत.
- शहरांमध्ये 24 टक्के, द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये 42 टक्के आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये 34 टक्के पंच विक्रीचे प्रमाण आहे.
- ICE (इंटरनल कंबशन इंजिन) आणि EV (इलेक्ट्रिक व्हेरिएंट) या दोन्ही प्रकारांमध्ये टाटा पंचने अनुक्रमे ग्लोबल NCAP आणि भारत NCAP यामधून ५-स्टार सुरक्षितता रेटिंग प्राप्त केली आहे.
- पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा तिन्ही पॉवरट्रेन पर्यायांमध्ये ही कार ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, त्यामुळे पर्यावरणस्नेही आणि किफायतशीर निवडीसाठी ही आदर्श ठरते.
- टाटा मोटर्सच्या एकूण प्रवासी वाहन विक्रीत पंचचे योगदान तब्बल 36 टक्के असून, हा ब्रँडचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला आहे.
- सब-कॉम्पॅक्ट SUV विभागात पंचचा 38 टक्के बाजार हिस्सा असून, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ती या विभागातील आघाडीची ठरली आहे.
- दरवर्षी 15 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवणाऱ्या या मॉडेलने आपल्या स्थिर आणि विश्वासार्ह कामगिरीची चुणूक दाखवली आहे.
- 20 हून अधिक प्रतिष्ठित ऑटोमोटिव्ह पुरस्कारांनी सन्मानित पंचने गुणवत्तेचा उच्च दर्जा कायम राखला आहे.
- 'इंडिया की एसयूव्ही' मोहीम
टाटा मोटर्सने देशभरात ‘इंडिया की एसयूव्ही’ ही नवीन मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम लाखो भारतीयांना प्रशंसित करते, ज्यांनी टाटा पंचला त्यांच्या जीवनाचा भाग बनवले आहे आणि सक्षमीकरण, शोध व दैनंदिन साहसाच्या गाथा दाखवल्या आहेत. यामधून निदर्शनास येते की, टाटा पंच कारपेक्षा अधिक विकसित झाली आहे. ही कार आधुनिक भारतासाठी महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वासाची प्रतीक बनली आहे. सुरक्षिततेबाबत काळजी करणारे कुटुंबं असो किंवा शहरामध्ये साहसी ड्राइव्हचा आनंद घेणारे असो, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील उत्साहित तरूण असो किंवा नवीन साहसी ड्राइव्हचा आनंद घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेले पहिल्यांदा कार खरेदी करणारे ग्राहक असो पंच प्रांतांमध्ये आणि पिढ्यांमध्ये संलग्न झाली आहे. ‘इंडिया की एसयूव्ही' मोहिम देशाच्या उत्साहाला मानवंदना आहे, जी साहसीपणे व एकत्रित पुढे जात आहे.
आणखी वाचा
Tata Punch CAMO : टाटा पंचची स्पेशल कॅमो एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
















