<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर </title><atom:link href="https://marathi.abplive.com/ahmednagar/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Thu, 6 Aug 2026 08:48:29 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA['एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-shevgaon-abp-majha-impact-leopard-and-cubs-spotted-forest-officials-visit-the-farm-cages-deployed-to-capture-the-leopards-1434522</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-shevgaon-abp-majha-impact-leopard-and-cubs-spotted-forest-officials-visit-the-farm-cages-deployed-to-capture-the-leopards-1434522#respond</comments><pubDate>Wed, 5 Aug 2026 20:44:25 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुरेश काटे ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-shevgaon-abp-majha-impact-leopard-and-cubs-spotted-forest-officials-visit-the-farm-cages-deployed-to-capture-the-leopards-1434522</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ahilyanagar&quot;&gt;जिल्ह्यातील (Ahilyanagar)&lt;/a&gt; शेवगाव तालुक्यात&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/leopard&quot;&gt; बिबट्याच्या (leopard)&lt;/a&gt; वाढत्या आणि जीवघेण्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रश्नावर 'एबीपी माझा' डिजिटल वेबसाईटने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या बातमीचा मोठा 'इम्पॅक्ट' पाहायला मिळाला असून, बातमी प्रसिद्ध होताच वनविभाग खडबडून जागे झाले. वनधिकाऱ्यांनी थेट &amp;nbsp;गावांमध्ये धाव घेत शेतकऱ्यांच्या बांदावर प्रत्यक्ष पाहणी केली असून, बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आता तातडीने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;strong&gt;नेमकी बातमी काय होती आणि 'माझा'चा इम्पॅक्ट ?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेवगाव तालुक्यातील अमरापूर, शहाजापूर, सुलतानपूर आणि आव्हाने या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात होता. हा बिबट्या काही शेतकऱ्यांच्या थेट नजरेस पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, या भागात एक नर, एक मादी आणि त्यांचे दोन छोटे बछडे असा पूर्ण परिवारच वास्तव्य करत असल्याचे समोर आले होते. शेतात काम करताना शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्यांचे दर्शन होत असल्याने भीतीपोटी अनेकांचे शेतीचे कामकाज ठप्प झाले होते. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत समस्येला एबीपी माझाने वाचा फोडत बातमी वेबसाईटवर प्रसिद्ध केली. या वृत्ताची दखल घेत वरिष्ठ पातळीवरून तातडीने चक्रे हलली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अमरापूरच्या शेतकऱ्यांकडून 'एबीपी माझा'चे आभार&lt;/h2&gt;
&lt;p&gt;'एबीपी माझा'च्या बातमीमुळे प्रशासनाला जाग आल्याने अमरापूरचे शेतकरी नामदेव गरड यांनी 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी सुरेश काटे यांचे विशेष आभार मानले आहेत. &quot;एबीपी माझामुळेच वनाधिकारी थेट आमच्या बांदावर आले आणि त्यांनी बिबट्याची पाहणी करून तातडीने हालचाली सुरू केल्या,&quot; अशी भावना यावेळी शेतकरी नामदेव गरड यांनी व्यक्त केली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;वनधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांदावर&lt;/h2&gt;
&lt;p&gt;'एबीपी माझा'च्या बातमीनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत थेट शेवगाव तालुक्यातील अमरापूर, शहाजापूर, सुलतानपूर आणि आव्हाने परिसराचा दौरा केला. यावेळी वनविभागाचे अधिकारी संदीप एकशिंगे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांचे पथक उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे न नाचवता थेट शेतकऱ्यांना सोबत घेऊन ज्याठिकाणी बिबट्या आणि त्याचे बछडे वावरत आहेत, त्या शेतांच्या बांदावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांकडून बिबट्या कोणत्या वेळी आणि कुठे प्रकर्षाने दिसतो, याची सविस्तर माहिती जाणून घेतली.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात&lt;/h2&gt;
&lt;p&gt;नागरिकांमधील वाढती भीती आणि सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता, वनविभागाने तातडीने पावले उचलली आहेत. बिबट्यांचा वावर असलेल्या संभाव्य मार्गांवर आणि शेतांच्या परिसरात पिंजरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे बिबटे लवकरच जेरबंद केले जातील, असा विश्वास वनविभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. तसेच परिसरामध्ये वनकर्मचाऱ्यांची गस्त देखील वाढवण्यात आली आहे.&lt;br /&gt;वनविभागाचे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन वनविभागाचे अधिकारी संदीप एकशिंगे यांनी या भागातील सर्व शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले, तरी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&amp;nbsp;शेतात जाताना शक्यतो एकट्याने जाणे टाळावे&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी शेतात जाणे पूर्णपणे टाळावे. जनावरांच्या गोठ्यांच्या परिसरात सुरक्षेची खबरदारी बाळगावी. शेतात काम करताना आवाज करत काम करावे, जेणेकरून बिबट्या जवळ येणार नाही, असे आवाहन वन विभागाने केलं आहे. 'एबीपी माझा'च्या दणक्यामुळे प्रशासनाने तातडीने दाखवलेल्या तत्परतेमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून, आता लवकरात लवकर हे बिबटे जेरबंद होऊन परिसरातील दहशत संपेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/gadchiroli/gadchiroli-bridge-inaugurated-by-the-cm-devendra-fadnavis-three-years-ago-washed-away-demand-for-case-against-contractor-rohit-pawar-takes-a-dig-1434516&quot;&gt;मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/05/216b295e9836c09158bad59a3c8c1b0c17859414782941002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-leopard-scare-in-shevgaon-presence-leopard-how-can-farmers-go-to-their-fields-villagers-are-worried-1434436</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-leopard-scare-in-shevgaon-presence-leopard-how-can-farmers-go-to-their-fields-villagers-are-worried-1434436#respond</comments><pubDate>Tue, 4 Aug 2026 21:51:37 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुरेश काटे ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-leopard-scare-in-shevgaon-presence-leopard-how-can-farmers-go-to-their-fields-villagers-are-worried-1434436</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/leopard&quot;&gt;बिबट्याच्या (Leopard)&lt;/a&gt; हल्ल्यात जीव गमावल्याच्या किंवा चिमुकल्यांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना पुणे जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यानंतर, ग्रामस्थांनी सातत्याने या मुद्द्यावरुन प्रशासन आणि सरकारपुढे आपली व्यथा मांडल्याचं दिसून आलं. मात्र, अद्यापही काही गावांत बिबट्याची दहशत पाहायला मिळत असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीती जाणवते. &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/ahilyanagar&quot;&gt;अहिल्यानगर (Ahilyanagar)&lt;/a&gt; जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, तालुक्यातील अमरापूर, शहाजापूर आणि आव्हाने या परिसतात बिबट्याचा वावर पुन्हा वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे, या भागात बिबट्याचा नर-मादीसह पिल्लांचा वावर असल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये &amp;nbsp;भीतीचे वातावरण पसरले आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;शेतकरी आणि ग्रामस्थांसमोर बिबट्याचे मोठे संकट असून सध्या खरीप हंगामातील पिकांची देखभाल करण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. मात्र, परिसरात बिबट्याचा आणि त्याच्या पिल्लांचा वावर असल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. जनावरांच्या सुरक्षेचा आणि स्वतःच्या जीवाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे मुश्कील झाले असून, शेतीची कामे रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्यासाठी मागणी&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमधून संताप आणि भीती व्यक्त होत आहे. अनुचित घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने दखल घेऊन या भागात पिंजरा लावावा आणि या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी &amp;nbsp;मागणी संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थांकडून वनविभाग प्रशासनाकडे केली जात आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने आमच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने पावले उचलून या परिसरातील बिबट्याला जेरबंद करावे अन्यथा आंदोलन करावे लागेल.असे अमरापूर आव्हाने शहाजापूर मधील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.&amp;nbsp;दरम्यान, गेल्या काही महिन्यात &lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातही बिबट्याने धुमाकूळ घातला होता, तर गत महिन्यात एका 5 वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे, वन विभागाने तातडीने कारवाई करत येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.&amp;nbsp; &amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/crime-patrol-actor-satish-naikode-alleges-25-lakh-housing-scam-says-he-tried-to-end-life-1434423&quot;&gt;Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न&lt;/a&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/04/d49b021374aaab102d665f117d6ab52c17858590104641002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Lokshahir Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/lokshahir-annabhau-sathe-106th-birth-anniversary-demand-to-confer-bharat-ratna-posthumously-ahilyanagar-news-1434035</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/lokshahir-annabhau-sathe-106th-birth-anniversary-demand-to-confer-bharat-ratna-posthumously-ahilyanagar-news-1434035#respond</comments><pubDate>Sat, 1 Aug 2026 18:21:16 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुरेश काटे ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/lokshahir-annabhau-sathe-106th-birth-anniversary-demand-to-confer-bharat-ratna-posthumously-ahilyanagar-news-1434035</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; शेवगाव तालुक्यातील शहाजापूर,सुलतानपूर खुर्द येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत अण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर आणि विचारभांडारावर प्रकाश टाकला. या विशेष कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सात समुद्रपार महाराष्ट्राचे नाव अजरामर केले&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जयंती कार्यक्रमात बोलताना देवराम सरोदे सरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय प्रवासाचा आणि साहित्याचा गौरव केला. &quot;समाजात अनेक थोर व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्याच्या जोरावर सात समुद्रपार &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ाचे नाव अजरामर केले आहे. असे असतानाही त्यांना अद्याप भारतरत्न का देण्यात आला नाही?&quot; असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;उपवर्गीकरणावर आणि शिक्षणावर मत&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शेवगाव तालुक्यातील चळवळीचे खंदे शिलेदार चंद्रकांत कर्डक यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली. यावेळी समाजात सुरू असलेल्या प्रवर्गीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी मातंग समाजातील तरुणांच्या शिक्षणाच्या कमी आकडेवारीवर चिंता व्यक्त केली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ते म्हणाले की, &quot;भविष्यातील समस्या ओळखून राज्य सरकारने सर्वच जातींतील नेत्यांना एकत्र आणले पाहिजे. वर्गीकरणाविषयी जनजागृती करून ते कसे करता येईल, याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. समाजात जर कोणी या वर्गीकरणाला विरोध करत असेल, तर तो त्यांच्या बुद्धीचा दोष आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महापुरुष कोणत्याही एका जातीचे नसतात- सुरेश काटे&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या जयंती सोहळ्यासाठी 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी सुरेश काटे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून समाजातील एका ज्वलंत प्रवृत्तीवर बोट ठेवले. सर्वच जातीधर्माच्या तरुणाईला आवाहन करताना ते म्हणाले की, आज समाजातील प्रत्येक घटकाने महापुरुष वाटून घेतले आहेत. जो तो आपल्या परीने आणि आपल्याच जातीपुरती जयंती साजरी करतो. मात्र, ही संकुचित वृत्ती आता थांबली पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन सर्वच महापुरुषांच्या जयंत्या उत्साहात आणि संयुक्तपणे साजरी केली पाहिजे. सगळ्याच महापुरुषांचे विचार आणि त्यांच्या विचारांची जयंती साजरी केली पाहिजे असे प्रतिपादन काटे यांनी केले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;मान्यवरांची उपस्थिती आणि यशस्वी आयोजन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या कार्यक्रमास गावचे पोलीस पाटील शिवराम फलके, डॉ. विजय फलके सह दादा डोईफोडे हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. हा जयंती सोहळा &amp;nbsp;संयोजकांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमामुळे सुलतानपूर खुर्द येथे एकोप्याचा आणि अण्णाभाऊंच्या विचारांचा नवा संदेश संपूर्ण तालुक्याला मिळाला.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा :&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/india/jaish-e-mohammed-jem-operative-arpita-sarkar-arrested-honey-trap-plot-west-bengal-stf-news-1434032&quot;&gt;&lt;strong&gt;Honey Trap : नेत्यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवण्याचा डाव उघड, 'जैश ए मोहम्मद'च्या दहशतवाद्याची गर्लफ्रेंड अर्पिता सरकारला अटक&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/08/02/f33b25236180562c52a0fa4a0c07cbb3178566995420693_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Ahilyanagar Crime News : संतापजनक! खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकानं चक्क तिसरीतल्या चिमुकल्याच्या हाताचा चावा घेतला, अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-private-school-principal-bit-young-student-from-the-third-grade-case-registered-in-ahilyanagar-marathi-news-1433832</link><comments>https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-private-school-principal-bit-young-student-from-the-third-grade-case-registered-in-ahilyanagar-marathi-news-1433832#respond</comments><pubDate>Fri, 31 Jul 2026 09:57:36 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील भोंगळ ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-crime-news-private-school-principal-bit-young-student-from-the-third-grade-case-registered-in-ahilyanagar-marathi-news-1433832</guid><description><![CDATA[&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News:&lt;/strong&gt; अहिल्यानगर शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगरच्या एका खाजगी इंग्रजी माध्यम शाळेच्या प्रिन्सिपलने इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलाचा हाताचा चावा (Ahilyanagar Crime) घेतल्याची घटना समोर आलीये. त्यानंतर गळा दाबून जवळपास 20 सेकंद उचलून धरल्याचाही आरोप होतोय. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय शालेय विद्यार्थ्याचे वडील सोनल शेळके यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ वर्षीय विद्यार्थी शाळेत गेले असताना त्याच्या वर्गातील वर्ग मित्रांचे आपसात भांडण सुरू होते. याबाबत त्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांने आपल्या क्लास टीचर ज्योती यांना सांगितले. त्यावर शिक्षिकेने शाळेचे मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना बोलवून घेतले.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, मुख्याध्यापक आल्यानंतर त्यांनी जे विद्यार्थी आपसात भांडण करत होते त्यांचे कान पीळले आणि भांडणे कसे करतात हे मी तुम्हाला दाखवतो, असे म्हणून त्या आठ वर्षीय मुलाचा गळा धरून वर उचलले आणि तोंडाने एक ते वीसपर्यंत आकडे मोजले त्यानंतर खाली उतरवून त्या मुलाच्या हाताचा चावा घेतला.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar Crime News: माझ्याकडून चुकीने ही घटना घडली, पत्ता द्या, मी लेखी पत्र पाठवून माफी मागतो&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दरम्यान, ही घटना घरी गेल्यानंतर घरच्यांच्या लक्षात आली त्यावर त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक गौतम बहादुर्गे यांना फोन करून या घटनेबाबत विचारले असता मुख्याध्यापकने माझ्याकडून चुकीने ही घटना झाली, मी लेखी पत्र पाठवून माफी मागतो. मला तुमचा पत्ता द्या, असेही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर सांगितले. मात्र अशा प्रिन्सिपलला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी त्या आठ वर्षीय विद्यार्थ्यांचे पालक सोनल शेळके यांनी केली आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Pune News: पुण्यात वाहनांची तोडफोड सुरूच, उत्तमनगरात CCTV समोर अज्ञाताचा धुमाकूळ&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. उत्तमनगर परिसरात अज्ञात व्यक्तीने 4 ते 5 चारचाकी वाहनांची तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून संशयित अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून CCTVच्या आधारे संशयिताचा शोध सुरू आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;इतर महत्वाच्या बातम्या&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/thane/bhiwandi-building-collapses-four-floor-building-collapses-in-bhiwandi-5-to-6-people-feared-trapped-1433808&quot;&gt;Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/31/8d0ef44ec1534e45243157dc4849bb8c1785471813777892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/shirdi-sai-devotee-makes-an-anonymous-donation-on-guru-purnima-throngs-of-devotees-gather-in-shirdi-a-gold-necklace-how-much-was-donated-1433632</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/shirdi-sai-devotee-makes-an-anonymous-donation-on-guru-purnima-throngs-of-devotees-gather-in-shirdi-a-gold-necklace-how-much-was-donated-1433632#respond</comments><pubDate>Wed, 29 Jul 2026 16:19:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नितीन ओझा, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/shirdi-sai-devotee-makes-an-anonymous-donation-on-guru-purnima-throngs-of-devotees-gather-in-shirdi-a-gold-necklace-how-much-was-donated-1433632</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;मुंबई :&lt;/strong&gt; देशभरात आज &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/guru-purnima&quot;&gt;गुरु पौर्णिमेचा (Guru purnima)&lt;/a&gt; उत्साह आणि उत्सव सुरू असून देशभरातील देवस्थानमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने देशभरातून पालख्या साईनगरी शिर्डीत दाखल झाल्या असून गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या भक्तांनी &lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/topic/shirdi&quot;&gt;शिर्डी (Shirdi)&lt;/a&gt; नगरी फुलली आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साईंची शिर्डी भक्तांनी गजबजुन गेली असून गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भक्तांनी शिर्डीत साई समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. तर, गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात साईभक्तांकडून सुवर्णदानाचा ओघ कायम आहे. मुंबई येथील एका साईभक्ताने गुप्तदानाच्या माध्यमातून तब्बल 47 लाख रुपये किंमतीचा, 300 ग्रॅम वजनाचा आकर्षक सोन्याचा हार साईचरणी अर्पण केला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;गुरुपौर्णिमा अर्थातच गुरुला नमन करण्याचा दिवस. श्री साईबाबांना गुरु स्वरूप मानणाऱ्या लाखो साई भक्तांनी शिर्डीत गर्दी केली आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने देखील भक्तांच्या देणगीतून साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली असून मंदिर व परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर, भाविकांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेलीय. भाविकांकडून साईचरणी दान अर्पण केलं जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;दोन दिवसांत 1 कोटी 70 लाखांचे दान&lt;/h2&gt;
&lt;p&gt;साईंच्या चरणी गेल्या दोन दिवसांपासून भरभरुन दान अर्पण करण्यात येत आहे. साईबाबांना जवळपास 1 कोटी 70 लाख रुपयांचे सुवर्णदान प्राप्त झाले आहे. &lt;a title=&quot;मुंबई&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/mumbai&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;मुंबई&lt;/a&gt; येथील एका साईभक्ताने आपली ओळख गुप्त ठेवत सुमारे 47 लाख रुपये किंमतीचा 300 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आज साईचरणी अर्पण केला. अत्यंत आकर्षक रचना आणि सुंदर नक्षीकाम असलेला हा सुवर्णहार संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात आल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. गुरुपौर्णिमेच्या दोन दिवसांत साईभक्तांकडून सुवर्णदानाचा विक्रमी ओघ पाहायला मिळत आहे. काल 642 ग्रॅम वजनाचा एक कोटी तीन लाख रुपये किंमतीचा सोन्याचा मुकूटही साईचरणी अर्पण करण्यात आला होता. त्यानंतर, आता या 300 ग्रॅमच्या सुवर्णहाराची भर पडल्याने अवघ्या दोन दिवसांत सुमारे 1 कोटी 70 लाख रुपयांचे सुवर्णदान साईबाबांच्या चरणी अर्पण झाले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;सोनू सूदनेही घेतले दर्शन&lt;/h2&gt;
&lt;p&gt;गुरु पौर्णिमेला माझे गुरू असलेल्या शिर्डी साईबाबांचे दर्शन करता आले हे माझं भाग्य आहे. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी साईंचे दर्शन घेतले याचा आनंद जास्त असल्याचे अभिनेता सोनू सूदने म्हटले. साईबाबांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न मी केलाय, व यापुढे देखील चालेल. &lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt;मध्ये शिक्षण घेताना रेल्वेचे तिकीट नसायचे तेव्हापासून मी शिर्डीला येत असल्याची आठवणही सोनू सूदने सांगितली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पंढरीतही गुरु पौर्णिमेचा उत्साह&lt;/h2&gt;
&lt;p&gt;आषाढी यात्रेसाठी शेकडो मैलाचे अंतर चालत आलेल्या पालखी सोहळ्यातील पादुकांची आज देवाच्या समचरणाशी भेट झाली. गुरु पौर्णिमेनिमित्ताने देव आणि संत भेटीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी पालखी सोहळ्यातील शेकडो भाविकांनी आज मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आषाढीसाठी आलेल्या संतांच्या पादुका विठ्ठल मंदिरात जातात का याची उत्कंठा जगभरातील विठ्ठल भक्तांना असते.. आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या संतांच्या पादुकांची थेट भेट विठुरायाच्या चरणाशी आज होत असते.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हेही वाचा&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/politics/msrtc-deadline-for-st-ncmc-smart-card-extended-to-september-1-mandatory-for-availing-bus-scheme-benefits-1433615&quot;&gt;ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य&lt;/a&gt;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/29/36c9a3e1c46a96562e2044b77c02b6fc17853217844081002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Water Storage Of All Maharashtra Dam: राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली, मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली; राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची A टू Z माहिती]]></title><link>https://marathi.abplive.com/news/maharashtra/water-storage-of-all-maharashtra-pune-nagpur-konkan-amravati-nashik-dam-information-1433466</link><comments>https://marathi.abplive.com/news/maharashtra/water-storage-of-all-maharashtra-pune-nagpur-konkan-amravati-nashik-dam-information-1433466#respond</comments><pubDate>Tue, 28 Jul 2026 14:28:49 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/maharashtra/water-storage-of-all-maharashtra-pune-nagpur-konkan-amravati-nashik-dam-information-1433466</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Water Storage Of All Maharashtra Dam:&lt;/strong&gt; 'एल निनो' (El Nino) प्रभावामुळे यावर्षी कमी पावसाचा (Maharashtra Rain Updates) अंदाज वर्तवण्यात आला होता. जून महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील बहुतांश धरणांनी तळ गाठल्यामुळं राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली होती. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने जोर धरला आणि एका महिन्याच्या आत राज्यातील सर्व प्रमुख धरणं तुडुंब भरली आहेत. राज्यातील सर्व मोठ्या शहरांची वर्षभराची पाण्याची चिंता (Water Storage Of All Maharashtra Dam) मिटली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांची आज काय परिस्थिती आहे आणि त्याचा काय परिणाम होणार आहे, जाणून घ्या...&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li&gt;117 टीएमसी क्षमता असलेलं महाराष्ट्रातील सर्वात उजनी धरण 100 टक्के भरलं असून त्यामुळं पुणे, सोलापूर आणि आहिल्यानगर या जिल्ह्यांची चिंता मिटणार आहे . &lt;a title=&quot;सोलापूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/solapur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सोलापूर&lt;/a&gt; जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला असताना देखील पुणे जिल्ह्यातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं उजनी धरण भरलंय.&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;राज्यातील दुसरं मोठं धरण असलेलं 106 टीएमसी क्षमतेचं कोयना धरण 75 टक्के भरलं आहे. त्यामुळं &lt;a title=&quot;सातारा&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/satara&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सातारा&lt;/a&gt; आणि &lt;a title=&quot;सांगली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/sangli&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;सांगली&lt;/a&gt; जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे.&lt;/li&gt;
&lt;li&gt;मराठवाड्यासाठी महत्वाचं असलेलं धरण 62 टक्के भरलंय. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम म्हणून 27 दिवसांमध्ये 25 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. यामुळं छत्रपती संभाजी नगर आणि जालना या दोन जिल्ह्यांच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे.&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;कोकण विभागातील 11 धरणांमध्ये 85.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; विभागातील 35 धरणांमध्ये 82.87 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a title=&quot;नाशिक&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/nashik&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नाशिक&lt;/a&gt; विभागातील 22 धरणांमध्ये मिळून 73.24 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.&lt;/li&gt;
&lt;li&gt;छत्रपती संभाजी नगर विभागातील 44 धारांमध्ये 45.66 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a title=&quot;अमरावती&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/https://marathi.abplive.com/news/amravati&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;अमरावती&lt;/a&gt; विभागातील 10 धरणामध्ये मिळून 43.99 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.&amp;nbsp;&lt;/li&gt;
&lt;li&gt;&lt;a title=&quot;नागपूर&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/nagpur&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नागपूर&lt;/a&gt; विभागातील 16 धारांमध्ये 53.92 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2&gt;राज्यातील एकूण धरणांमध्ये मिळून सध्यास्थितीला 69.43 इतका पाणीसाठा जमा- (Water Storage Of All Maharashtra Dam)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;राज्यातील एकूण धरणांमध्ये मिळून सध्यास्थितीला 69.43 इतका पाणीसाठा जमा असून मागीलवर्षी हाच पाणीसाठा 76.14 इतका होता. मात्र एल-नीनोच्या प्रभावाची शक्यता वर्तवली जात असताना &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt;ात झालेल्या या पावसामुळे बऱ्याच मोठ्या भागाला दिलासा मिळाला आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=kz5pVsg09QTXESUf&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;ही बातमीही वाचा:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra/jayakwadi-dam-water-supply-25-tmc-water-inflow-in-27-days-check-latest-water-storage-update-1433449&quot;&gt;Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर?&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/28/b67a06148bb9a339b66505404b9c35e61785231803237987_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[E20 ला विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, पाशा पटेल यांच्याकडून इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या निर्णयाचं जोरदार समर्थन]]></title><link>https://marathi.abplive.com/news/politics/pasha-patel-support-20-percent-ethanol-blending-in-petrol-and-slam-who-oppose-e20-decision-marathi-news-1433375</link><comments>https://marathi.abplive.com/news/politics/pasha-patel-support-20-percent-ethanol-blending-in-petrol-and-slam-who-oppose-e20-decision-marathi-news-1433375#respond</comments><pubDate>Mon, 27 Jul 2026 19:31:14 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील भोंगळ ]]></dc:creator><category><![CDATA[ राजकारण ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/politics/pasha-patel-support-20-percent-ethanol-blending-in-petrol-and-slam-who-oppose-e20-decision-marathi-news-1433375</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;अहिल्यानगर :&lt;/strong&gt; नीट पेपरफुटीच्या मुद्यावर कॉकरोच जनता पार्टी, डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांकडून &lt;a title=&quot;नवी दिल्ली&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/topic/new-delhi&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;नवी दिल्ली&lt;/a&gt;तील जंतर मंतरवर आंदोलन करण्यात आलं. सीजेपीच्या आंदोलनाला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर केंद्र सरकारला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. सीजेपीचं आंदोलन संपताच दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर E20 जनता पार्टी स्थापन करण्यात आली आहे. इथेनॉल मिश्रीत पेट्रोलचा विरोध वाढू लागला आहे. सध्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जाते. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी आक्रमक भूमिका घेत E20 ला विरोध करणे म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, E20 ला विरोध करण्यामागे फारमोठे षडयंत्र आहे, असं पाशा पटेल म्हणाले आहेत.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;E20 ला विरोध म्हणजे पुढची पिढी संपवणे: पाशा पटेल&lt;/h2&gt;
&lt;p&gt;आता उसाची मळी,मका, तांदूळ आणि बांबूपासून इथेनॉल बनवतो, त्याचा वापर वाहनात केला तर आपली पुढची पिढी जगणार आहे नाही तर जगणार नाही. आता E20 विरोध करणं म्हणजे आपली पुढची पिढी संपवणे, असं म्हणत &lt;a title=&quot;महाराष्ट्र&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/maharashtra&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;महाराष्ट्र&lt;/a&gt; राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी E20 चे जोरदार समर्थन केले आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;E20 ला विरोध करण्यामागे फरमोठे षडयंत्र आहे, या देशात मागच्या 70 वर्षात इथेनॉल येऊ दिले नाही कारण परदेशातून डिझेल पेट्रोल-कोळसा आणताना त्यात पैसे खायला मिळत होते. म्हणून या विशिष्ट लॉबीने शेतकऱ्यांच्या इथेनॉलला विरोध केला, असं पाशा पटेल म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ब्राझील सारख्या देशात 100 टक्के इथेनॉलवर वाहने चालतात याचा तर आपल्या देशातील नागरिकांनी विचार करायला हवा. E20 ला विरोध करताना आल्या मुलाचा चेहरा बघावा, आपला मुलगा जिवंत राहणार आहे की नाही याचा विचार करावा, असं पाशा पटेल यांनी म्हटलं.&lt;/p&gt;
&lt;p&gt;इथेनॉलमुळे वाहनांचे मायलेज कमी होते ही खरी गोष्ट आहे, त्याबाबत दरासंदर्भात दिलासा देता येऊ शकतो. &amp;nbsp;मात्र गाडीचे इंजिन खराब होते हा दावा चुकीचा आहे. आता फ्लॅक्स इंजिन येत आहेत, त्यात 85 टक्के इथेनॉलवर गाड्या चालवू शकतो. भविष्यात असंच करावं लागेल तरचं मानव जातं वाचेल अन्यथा नाही, असं पाशा पटेल यांनी म्हटले आहे.&lt;/p&gt;
&lt;h3&gt;E20 पेट्रोलचं सरकारकडून समर्थन&lt;/h3&gt;
&lt;p&gt;केंद्र सरकारकडून E20 पेट्रोलमुळं भारताच्या स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेकडे पाऊल टाकलं जात असल्याचं सांगितलं जातंय. या निर्णयामुळं 1 लाख कोटींच्या परकीय चलन वाचले आहे. 1.18 लाख कोटी रुपयांची उलाढाल इथेनॉल उद्योगात झाली.याचा फायदा शेतकऱ्यांना देखील झाला, असं सरकारकडून सांगण्यात आला. कार्बन उत्सर्जन कमी झालं, असंही सरकारनं म्हटलंय.&amp;nbsp;&lt;br /&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=F3UQhrSin_dQMJK1&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/27/dc5d50f17e0dabb17e031122de6cbde51785160825694989_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?]]></title><link>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/ahmednagar-shirdi-saibaba-a-devotee-five-year-old-wish-fulfilled-a-silver-idol-offered-at-the-feet-of-saibaba-in-shirdi-1433343</link><comments>https://marathi.abplive.com/photo-gallery/news/ahmednagar-shirdi-saibaba-a-devotee-five-year-old-wish-fulfilled-a-silver-idol-offered-at-the-feet-of-saibaba-in-shirdi-1433343#respond</comments><pubDate>Mon, 27 Jul 2026 14:50:10 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नितीन ओझा, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/photo-gallery/news/ahmednagar-shirdi-saibaba-a-devotee-five-year-old-wish-fulfilled-a-silver-idol-offered-at-the-feet-of-saibaba-in-shirdi-1433343</guid><description><![CDATA[भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/27/d855c0d0b1f54c15de8702b063c7273317851433731461002_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!]]></title><link>https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-neet-student-ends-her-life-after-neet-exam-result-2026-crime-news-1433309</link><comments>https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-neet-student-ends-her-life-after-neet-exam-result-2026-crime-news-1433309#respond</comments><pubDate>Mon, 27 Jul 2026 11:25:59 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनिल भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर ]]></dc:creator><category><![CDATA[ क्राईम ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/crime/ahilyanagar-neet-student-ends-her-life-after-neet-exam-result-2026-crime-news-1433309</guid><description><![CDATA[&lt;p&gt;&lt;strong&gt;Ahilyanagar NEET Student Crime News:&lt;/strong&gt; अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे नीट परीक्षेतील (NEET Exam Result 2026) अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. अंकिता सांगळे (Ahilyanagar NEET Student Ankita Sangle) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अंकिताला NEET परीक्षेत 166 गुण मिळाले होते. अंकिताच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे ही विद्यार्थिनी नीट परीक्षेची तयारी करत होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. अंकिताच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील ड्रायव्हर आहेत, तर आई शिवणकाम करते, अशा परिस्थितीतही तिच्या अभ्यासासाठी घरच्यांनी स्वतंत्र खोली तिला दिली होती, 25 जुलैला अंकिता तिच्या खोलीत अभ्यास करत असताना बराच वेळ होऊनही तिचा आवाज न आल्याने घरच्यांनी खोलीचे दार उघडले असता अंकिताने खोलीत गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. (Ahilyanagar NEET Student Crime News)&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अंकिताने ज्या खोलीत अभ्यास केला, मेहनत घेतली त्याच खोलीत जीवन संपवलं- (Ahilyanagar NEET Student Ankita Sangle)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा तिचे वडील पंढरपूरला गेले होते. त्यांना ही घटना समजाच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. डोळ्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहात अंकिताने ज्या खोलीत अभ्यास केला, मेहनत घेतली त्याच खोलीत तिने आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतोय तो कमी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने संवेदनशीलपणे साथ देण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;अंकिताने सुसाईड नोट लिहीत घरच्यांची मागितली माफी- (Ankita Sangle Student News)&lt;/h2&gt;
&lt;p&gt;तुम्ही मला एवढा जीव लावला, पण मी तुमची एकपण इच्छा पूर्ण करू शकले नाही...मम्मी तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून साथ दिली... दादा तू पण मला खूप साथ दिली... मम्मी, पापा पेक्षा तू जास्त जीव लावला...माझ्या आत्महत्येला तुम्ही जबाब&amp;zwnj;दार नाही आहात... तुम्ही मला जे सुख दिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही... दादा तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्या गोष्टीची कमी पडू देऊ नको...तू ही आनंदी रहा..तुम्ही आनंदी राहा... माझं काही चुकलं असेल तर माफ करा... तुम्हाला मी कोणतच सुख देऊ शकले नाही...आधीच मी NEET चा अभ्यास करत होते, तेव्हा पण सगळं काही त्याग केला तुम्ही... आणि मी काय केलं? तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकले...आता कसला त्रास करून घेऊ नका...आनंदी राहा...तुमची दिदी, अंकिता, असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:&lt;/h2&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=Kb01odI-98p5IV6N&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;संबंधित बातमी:&lt;/h2&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/news/ahmednagar/ahilyanagar-daughter-scores-only-200-marks-in-the-second-neet-result-father-suffers-a-heart-attack-daughter-questions-the-government-delhi-agitation-1433001&quot;&gt;नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/27/3ddd6931f723d309ec748ae696543ad51785131622571987_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया समोर ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/anna-hazare-on-dharmendra-pradhan-resignation-anna-hazare-first-reaction-following-union-education-minister-dharmendra-pradhan-resignation-has-emerged-1433133</link><comments>https://marathi.abplive.com/news/ahmednagar/anna-hazare-on-dharmendra-pradhan-resignation-anna-hazare-first-reaction-following-union-education-minister-dharmendra-pradhan-resignation-has-emerged-1433133#respond</comments><pubDate>Sat, 25 Jul 2026 19:39:35 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ सुनील भोंगळ ]]></dc:creator><category><![CDATA[ अहिल्यानगर ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/ahmednagar/anna-hazare-on-dharmendra-pradhan-resignation-anna-hazare-first-reaction-following-union-education-minister-dharmendra-pradhan-resignation-has-emerged-1433133</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Anna Hazare on Dharmendra Pradhan resignation :&lt;/strong&gt; गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरु असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. NEET पेपर फुटीप्रकरणी देशभरातून तीव्र लाट उसळल्यानंतर अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत महत्त्वाचे आणि पॉवरफुल मंत्री मानले जात होते. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही अशी प्रतिक्रिया अण्णा हजारेंनी दिली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठलेही प्रश्न संवादाने सुटतात, चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत असे अण्णा हजारे म्हणाले. राजीनाम्यानंतर कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही असेही हजारे म्हणाले. मात्र, समाजाच्या भलाईसाठी जे जे करता येईल ते करत रहा असेही ते म्हणाले.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;&lt;strong&gt;Dharmendra Pradhan Resign: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्यात नेमकं काय म्हटलंय?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;माझ्या तरुण सहकाऱ्यांनो,&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी गेल्या ४ दशकांपेक्षा जास्त काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण व्यवस्थाच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील तरुण पिढीची स्वप्ने साकार करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.&lt;/p&gt;
&lt;p&gt;परंतु, ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG च्या परीक्षेत अनियमितता आढळून आली. भारत सरकारने याची तत्काळ दखल घेत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनरुपरीक्षेची तारीख घोषित केली. यासोबतच पुढच्या वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.&lt;/p&gt;
&lt;p&gt;या कालावधीत २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी 'संपूर्ण सरकार दृष्टिकोन' (whole of government approach) ठेवून काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकारे, विशेषतः जिल्हा प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पित्यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;&lt;iframe title=&quot;YouTube video player&quot; src=&quot;https://www.youtube.com/embed/a5B0FhXuLoY?si=LppZijSOvENiXLEq&quot; width=&quot;560&quot; height=&quot;315&quot; frameborder=&quot;0&quot; allowfullscreen=&quot;allowfullscreen&quot;&gt;&lt;/iframe&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/07/25/6fdc66b59d4f945b40e31ce6341fd09d1784986562986339_original.JPG" width="220"/></item></channel></rss>