अखेर कतरीनासोबतच्या ब्रेकअपवर रणबीरने मौन सोडलं
कतरीनापासून वेगळे झाल्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने आपले दु:ख व्यक्त केलं आहे.
एका मुलाखतीवेळी करीना कपूर-खाननेही कतरीनाला वहीनी म्हणून संबोधलं होतं.
जानेवारीत कतरीना आणि रणबीरचे ब्रेकअप झाल्यानंतर, रणबीरने पहिल्यांदाच आपलं दु:ख शेअर केलं आहे.
सहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूडची ही जोडी वेगळी झाली.
दरम्यान, रणबीर आणि कतरीना 'जग्गा जासूस' या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
एका रिपोर्टनुसार, कतरीना आणि रणबीरच्या ब्रेकअपमुळे या चित्रपटाच्या शूटिंगला वेळ झाला.
रणबीरच्या मते, त्याच्या आई-वडिलांनंतर कतरीनानेच त्याला अतिशय प्रभावित केलं.
कतरीनापासून वेगळे झाल्याने अतिशय दु:ख होतं आहे, कारण ती मला नेहमीच प्रेरणा देणारी व्यक्ती असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.
रणबीरच्या मते, या दोघांच्या संबंधात पसरवण्यात आलेल्या आफवा, तथ्यहीन रिपोर्ट आणि लोकांचा या दोघांच्या नात्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन यांनी यावर परिणाम झाला.