निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
...म्हणून गायक अभिजीत ढसाढसा रडला

प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्यला 26 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
दरम्यान, त्याला अटक केल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. त्याच्या सुटकेसाठी त्याच्या मुलाने जामीन दिला. पण तरुंगातून बाहेर येताच तो ढसाढसा रडला.
यानंतर पोलिसांनी अभिजीतचा फोन बंद करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती प्रीति शर्मा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली.
स्वातीसंदर्भातील त्याच्या ट्वीटवर आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आणि प्रवक्त्या प्रीति शर्मा यांनी अक्षेप घेऊन तक्रार दाखल केली होती.
स्वाती यांनीही मुंबई पोलीस आयुक्तांना ट्वीट करून त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती.
पत्रकार स्वाती चतुर्वेदीसोबत झालेल्या वादामुळे त्याला अटक करण्यात आली होती.
यानंतर पोलिसांनी अभिजीतचा फोन बंद करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती प्रीति शर्मा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली.
यानंतर अश्लीलता तसेच त्यासंबंधित कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
अभिजीतने पत्रकार स्वाती चतुर्वेदी आणि जनता का रिपोर्टर डॉट कॉमचे मुख्य संपादक रिफात जावेद यांच्याविरोधात वादग्रस्त ट्वीट केलं होतं. चेन्नईतील इंजिनिअर तरुणाच्या हत्येमधील आरोपी मुस्लीम असल्याचा दावा अभिजीतने ट्वीटमध्ये केला होता.
त्यानंतर अभिजीत समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा-सुव्यवस्थेत अडथळा आणत असल्याचं ट्वीट चतुर्वेदी यांनी केलं होतं. पण यानंतर अभिजीतने स्वाती चर्तर्वेदींविरोधात अश्लील शब्द वापरुन गरळ ओकली.
प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अभिजीत भट्टाचार्यला 26 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.