Patanjali: पतंजली वेलनेसकडून असा दावा करण्यात आला आहे की योग, प्राणायाम आणि नैसर्गिक उपचारांमुळे अनेक रुग्णांनी केवळ आरोग्य परत मिळवलं नाही, तर जटिल हृदयविकारांवरही मात केली आहे. कंपनीच्या मते, आयुर्वेदिक उपचारांद्वारे अनेकांना ब्लॉकेजसारख्या गंभीर समस्यांमध्येही यश मिळालं आहे आणि आता ते पूर्णपणे निरोगी जीवन जगत आहेत. (Patanjali News)

Continues below advertisement

ब्लॉकेजवर यश  पतंजलीचा दावा

पतंजलीच्या माहितीनुसार,हरियाणातील भिवानी येथील 47 वर्षीय हरी नारायण यांना हृदयात सहा ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी बायपास सर्जरीची सूचना केली होती. मात्र पतंजली वेलनेस सेंटरमध्ये फक्त 7 दिवसांच्या उपचारानंतर त्यांना 80 टक्के आराम मिळाला आणि ब्लॉकेजही कमी झाली.तसेच उत्तराखंडातील कोटद्वारच्या 31 वर्षीय वीना जखमोला यांना 90 टक्के ब्लॉकेज होते आणि एलोपॅथीमध्ये स्टेंट बसवण्याची शिफारस करण्यात आली होती.

पतंजलीमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांची समस्या पूर्णपणे दूर झाली असून त्या तीन वर्षांपासून निरोगी आहेत. पतंजलीचा आणखी दावा आहे की अहमदाबादच्या 52 वर्षीय जगदीश प्रसाद यादव यांना 2023 मध्ये 95% ब्लॉकेज असल्याचं निदान झालं होतं. डॉक्टरांनी स्टेंट बसवण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांनी पतंजलीत उपचार घेतला आणि आजही ते पूर्णपणे स्वस्थ आहेत.

Continues below advertisement

जीवनशैली आणि नैसर्गिक उपचारांचा परिणाम

पतंजलीच्या म्हणण्यानुसार, योग, प्राणायाम आणि योग्य आहार यामुळे रुग्णांना मोठा फायदा झाला. पुण्यातील रत्नाकर रामदास यांना हृदयविकारामुळे एंजियोग्राफीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र पतंजलीच्या डॉक्टरांनी ती गरज नसल्याचं सांगून नैसर्गिक उपचार सुचवले. फक्त 21 दिवसांतच त्यांना फरक जाणवला आणि ते मागील 12 वर्षांपासून निरोगी आहेत.

तसेच दिल्लीतील 71 वर्षीय मंगल राम यांना हृदयविकारानंतर छल्ला (स्टेंट) बसवण्याची सूचना झाली होती, पण त्यांनी ऑपरेशन नाकारून पतंजलीत उपचार घेतला आणि पूर्ण बरे झाले. भोपालच्या 64 वर्षीय रघु प्रसाद गौ यांना श्वास घेताना त्रास आणि डायबिटीज होती. फक्त 4 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा श्वासोच्छवास सुधारला आणि शुगर लेव्हल सामान्य झाली.

उपचारपद्धती आणि थेरपी

पतंजलीच्या मते,"या रुग्णांच्या उपचारांमध्ये, गरम पाय स्नान, कंबर स्नान, गरम आणि थंड कॉम्प्रेस आणि अनुलोम विलोम, कपाल भाती सारख्या प्राणायामसारख्या उपचारांना प्राधान्य देण्यात आले, ज्यामुळे त्यांना संपूर्ण आरोग्य लाभ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली."

सूचना: या बातमीत व्यक्त केलेले दावे हे पतंजलीचे आहेत. एबीपी नेटवर्क या दाव्यांची पुष्टी करत नाही. वाचकांनी वैद्यकीय निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.