Benefits of Amla Seeds: साधारणपणे आवळ्याचा गर वापरल्यानंतर त्याच्या बिया कचरा समजून फेकून दिल्या जातात. मात्र, पतंजलि वैज्ञानिकांनी याच ‘बेकार’ समजल्या जाणाऱ्या बियांवर संशोधन करून सिद्ध केले आहे की या बिया आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. या इनोवेशनला आता जागतिक स्तरावर मान्यता मिळत असल्याचा दावा कंपनीने केला असून, हे प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाच्या उत्तम संयोगाचे उदाहरण असल्याचे सांगितले आहे.
हरिद्वार (उत्तराखंड) येथील पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूटने आवळ्याच्या फेकून दिल्या जाणाऱ्या बियांमध्ये दडलेला आरोग्याचा खजिना शोधून काढला आहे. या बियांमध्ये क्वेरसेटिन, एलाजिक अॅसिड, फ्लेवोनॉइड्स आणि ओमेगा-3 सारखे आरोग्यदायी घटक मोठ्या प्रमाणात असल्याचे संशोधनात समोर आले आहे.
Patanjali: संशोधनात काय आढळले?
कंपनीने सांगितले, “पतंजलि R&D टीमने शोधून काढले की आवळा बियांमध्ये असे औषधी गुणधर्म आहेत, ज्यांचा वापर आजवर मुख्य प्रवाहातील आयुर्वेदात होत नव्हता. केमिकल प्रोफाइलिंगच्या माध्यमातून या बियांमध्ये क्वेरसेटिन, एलाजिक अॅसिड, फ्लेवोनॉइड्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि टॅनिन असल्याचे स्पष्ट झाले.”
पतंजलिचा दावा आहे की हे सर्व घटक वैज्ञानिकदृष्ट्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. यामध्ये एंटी-एजिंग, एंटी-इंफ्लेमेटरी आणि हृदय रक्षण करणारे गुणधर्म आढळतात. हे संशोधन उच्च रक्तदाब, त्वचा समस्या, डायबिटीज आणि कमी रोगप्रतिकारशक्ती अशा आजारांवरही उपयुक्त ठरू शकते.
'या' राज्यांमध्ये बियांची खरेदी सुरू
पतंजलिने सांगितले, “शेतकऱ्यांना थेट लाभ” देताना झालेल्या या शोधाचा सर्वात मोठा सामाजिक परिणाम म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ मॉडेल, जे प्रत्यक्षातही उतरले. इतके दिवस जे बी कचरा समजून टाकले जात होते, ते आता शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बनले आहेत.
पतंजलिने उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील शेतकऱ्यांकडून आवळा बिया खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अतिरिक्त कमाई वाढत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. तसेच हर्बल उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होत आहे.
जागतिक व्यासपीठावर मान्यता
कंपनीने सांगितले की पतंजलिच्या या संशोधनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. आयुष मंत्रालय आणि एशियन ट्रेडिशनल मेडिसिन बोर्ड यांनी या संशोधनाला मान्यता दिली आहे. तर युरोप, मलेशिया आणि थायलंड येथील रिसर्च पेपर्समध्येही पतंजलिच्या निष्कर्षांचा उल्लेख केला गेला आहे.
या संशोधनाच्या आधारे पतंजलिने आवळा सीड ऑइल कॅप्सूल, स्किनकेअर फॉर्म्युलेशन आणि इम्युनिटी बूस्टर अशी अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत, याची मागणी आता परदेशातही झपाट्याने वाढत आहे.
