<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/" xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/" xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"><channel><title>धक्कादायक! आंबेगावमध्ये कांद्याची काढणी करताना अचानक महिलेचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज </title><atom:link href="https://marathi.abplive.com/lifestyle/feed" rel="self" type="application/rss+xml"/><link>https://marathi.abplive.com/</link><description/><lastBuildDate>Fri, 15 May 2026 17:02:28 +0530</lastBuildDate><language>en-US</language><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><generator>https://marathi.abplive.com</generator><item><title><![CDATA[आपण 'सोडून द्यायला' कधी शिकणार?]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</link><comments>https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155#respond</comments><pubDate>Fri, 15 May 2026 11:04:41 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ अश्विन बापट, एबीपी माझा ]]></dc:creator><category><![CDATA[ महाराष्ट्र ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/lifestyle-daily-routine-blog-by-by-ashwin-bapat-1424155</guid><description><![CDATA[&lt;p&gt;आपण सोडून द्यायला कधी शिकणार? या शीर्षकातला हा प्रश्न खरं तर मी स्वत:ला विचारतोय आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला अनेक अनुभव येत असतात. आनंददायी, दु:खदायी, वेदनादायी, काही बोच देणारे तर काही मन दुखावणारेही असतात. यामध्ये काही पराकोटीचा राग आणणारे असतात तर, काहीवेळा आपण उगाचच एखाद्या गोष्टीचा फार बाऊ करतो किंवा मनाला लावून घेतो, म्हणूनही आपल्याला येत असतात. म्हणूनच हास्यजत्रामधील समीर चौघुलेंच्या लोचन मजनू कॅरेक्टरच्या भाषेत सांगायचं झालं तर राहून राहून यही प्रश्न उरताहै रसिकहो...क्या है...गुस्सा? आणि त्यात अॅड करावंसं वाटतं क्यूँ है यह गुस्सा ? अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर आपण कधी कधी हर्ट होतो, कधी ती प्रचंड मनाला लावून घेतो.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;मग एखादी गोष्ट आपल्याला आधी कळली नाही म्हणून किंवा एखादी गोष्ट आपल्याला नकोय तरीही घडली म्हणून किंवा एखादी गोष्ट आपण न करण्यास सांगितल्यावरही घडली म्हणूनही राग येऊ शकतो. यामध्ये काही वेळा आपल्या मनाविरुद्ध घडल्याची सल असते तर काही वेळा आपला स्वाभिमान (की अहंकार?) दुखावल्याची रुखरूख असते. खरंच इतका ताण घ्यायची आणि द्यायचीही गरज असते का? याचं उत्तर अजिबात नाही असंच आहे. सध्याच्या धकाधकीच्या काळात आठ ते दहा तास आपण किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त तास घरापासून, कुटुंबापासून दूर असतो.या कुटुंबात आईवडील, भावंडं, बायको, मुलं सारेच असतात. ही आपली सपोर्ट सिस्टीम असते. ती आपल्याला कधी कधी आठवड्यात काही वेळ किंवा काही मिनिटंच भेटत असते. म्हणजे सकाळी ८.३० ला स्कूलबस येणाऱ्या मुलांचे सेकंड शिफ्ट करणारे आईवडील त्यांना दिवसाला फक्त ४५ मिनिटं भेटतात. सकाळी साडेसातला तुम्ही उठलात की मुलांची शाळेची तयारी. मुलांची ८.१५ ते ८.३० दरम्यान स्कूल बस येते. मग मुलं शाळेमध्ये. दुपारी साडेतीनच्या सुमारास घरी जेव्हा ही बच्चेकंपनी घरी परतते तेव्हा तुम्ही ऑफिसकडे निघालेले असता. रात्री १२ नंतर तुम्ही घरी परतता तेव्हा मुलं गाढ झोपलेली.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p&gt;ही झाली मुलांबद्दलची कथा तर दुसरीकडे तळहाताच्या फोडांप्रमाणे आपल्याला जपणाऱ्या आईवडीलांनाही त्यांच्या उतारवयात आपण हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. आपल्या मुलांना काय किंवा आईवडिलांना काय इतकंच काय नवरा-बायकोही एकमेकांना पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाहीत. ही जरी आपली अपरिहार्यता असली तरी म्हणूनच जेवढा वेळ आपल्याला कुटुंबासोबत आपल्या माणसांसोबत मिळतो, तो क्वालिटी टाईम आपण खरंच प्रत्येक मिनिट भरभरून जगून केला पाहिजे. त्यातही एकमेकांच्या कुरबुरी काढणं, तू असंच बोललास, ती असंच म्हणाली, हे टाळायला हवं. त्याच वेळी भूतकाळात घडलेल्या काही जखमांच्या खपल्या पुन्हा पुन्हा काढून आपण वर्तमान आणि कदाचित भविष्यावरही का घाव घालायचा बरं? &amp;nbsp;आपला अहंकार, स्वाभिमान इतका टोकदार झालाय की, आपल्याला लगेच राग येतो. &amp;nbsp;हे टाळलंच पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मुलं काय किंवा आईवडील काय....किंवा अगदी नवरा-बायको काय...सर्वच नात्यात एकमेकांकडून हवे असतात दोन आपुलकीचे शब्द. तेव्हाही जर तुम्ही एकमेकांची किंवा बाहेरच्या कुणाची तरी उणीधुणी काढून त्यावर चर्चा किंवा वाद घालत बसलात तर तुमच्या हक्काचा क्वालिटी टाईम तुम्हीच नासवताय. वेळ ही कापरासारखी असते. निसटून जाते. भुर्ऱकन उडून जाते. त्यात मोबाईल नावाच्या यांत्रिक सदस्याची कुटुंबात केव्हा एन्ट्री झाली आणि केव्हा तो फॅमिलीतला एक होऊन केला ते कळलंही नाहीये. या मोबाईलवरही दिवसातला आपला बराच वेळ जातो. म्हणजे कामाबद्दलचे ग्रुप्स आणि मेसेजेस बाजूला ठेवले तरी आपला दिवसाचा स्क्रीन टाईम किती असावा, याचाही आपण विचार कळण्याची वेळ आलीय. या मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मेंदूवर होणारे परिणाम, मानसिक आरोग्यावर होणारे आघात याबद्दल तज्ज्ञ नेहमीच पोटतिडकीने सांगत असतात. या मोबाईलमुळेच जग जवळ आलंय. पण,माणसं लांब जातायत का? प्रत्यक्ष संवादाचं नेटवर्क तुटत चाललंय का? आपण स्वत:ला तटस्थपणे प्रश्न करायला हवेत. म्हणून म्हणतो, आपण झालं गेलं सोडून द्यायला हवं. एकमेकांशी बोलताना प्रत्येकानेच भान ठेवायला हवं. प्रत्येकाचा मान राखायला हवा, हे जरी खरं असलं तरीही तीच तीच गोष्ट मग अगदी १०-१२ वर्षांपूर्वी घडलेली असली तरी तुम्ही उगाळत बसलात तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही गमावून बसता. घरचं वातावरण कलुषित होतं. आयुष्य हातून निसटायला लागतं. त्यापेक्षा 'शो मस्ट गो ऑन' या बाण्याने पुढे जात राहावं. समोरच्याचा एखाद-दुसरा चुकीचा शब्द विसरून जावा किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं. हातात आहेत ते क्षण भरभरून जगावेत. या लेखाच्या शीर्षकातला प्रश्न मला कुणालाही विचारायचा नाहीये. आपण प्रत्येकाने स्वत:च आपल्याला विचारून पाहायचाय. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय ना...सांगा...कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा...&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/15/e4650c89922735bf60496d9f4438696b1778823247034987_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[एक पॅड विघटित व्हायला लागतात 800 वर्ष; या दोन महिलांनी काढला भन्नाट पर्याय; आज कोट्यवधींची उलाढाल, नेमकं काय केलं?]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 19:13:20 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/menstrual-hygiene-day-eco-friendly-sanitary-pads-two-women-built-a-crore-worth-solution-success-story-1424085</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong data-start=&quot;61&quot; data-end=&quot;86&quot; data-is-last-node=&quot;&quot;&gt;Menstrual Hygiene Day: &lt;/strong&gt;दरवर्षी २८ मे रोजी साजरा होणारा मासिक पाळी स्वच्छता दिन ही सुरक्षित, परवडणारी आणि टिकाऊ मासिक पाळी आरोग्य उत्पादने उपलब्ध करून देणे हे भारताच्या सर्वात महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य प्राधान्यांपैकी एक आहे याची आठवण आहे. मेन्स्ट्रुअल हायजीन अलायन्स ऑफ इंडियाच्या मते भारतात दरवर्षी सुमारे १२ अब्ज डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्स तयार होतात. प्रत्येक पॅडला विघटित होण्यासाठी 800 वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो आणि त्यात चार शॉपिंग बॅग्सइतके प्लास्टिक असते. त्यामुळे कचराभूमी, जलस्रोत आणि त्यांच्याजवळ राहणाऱ्या समुदायांवर नकळतपणे भार पडतो.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;पुन्हा वापरता येणारे पॅड्स!&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या पार्श्वभूमीवर जयपूर आणि हैदराबाद येथील दोन उद्योजिका मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही पैलूंवर उपाययोजना करणारे उपाय तयार करत आहेत. या दोघीही 'वॉलमार्ट वृद्धी'च्या पदवीधर आहेत, जो एक पुरवठादार विकास कार्यक्रम आहे आणि त्याने २०१९ मध्ये सुरूवात झाल्यापासून १,१५,००० हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) प्रशिक्षण दिले आहे. 'सॅनिट्री'च्या सह-संस्थापिका इशू सैनी यांनी भारतीय महिलांना एक उत्तम पर्याय देण्याचा निर्धार केला आहे: पुनर्वापरयोग्य, जैवविघटनशील कापडी पॅड्स जे कचऱ्याचे चक्र पूर्णपणे संपुष्टात आणतात. सॅनिटरी उत्पादने 'हर शक्ती सेंटर'मध्ये काम करणाऱ्या महिलांद्वारे हाताने बनवली जातात. हे केंद्र एक कामगार कल्याण उपक्रम आहे. प्रत्येक पॅड दोन वर्षांपर्यंत टिकतो आणि त्याचे पॅकेजिंग पूर्णपणे प्लास्टिकमुक्त आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;वर्षभरात 1 कोटींची उलाढाल&amp;nbsp;&lt;/h2&gt;
&lt;p&gt;पर्यावरणाच्या दृष्टीने हे गणित खूप महत्त्वाचे आहे: सॅनिट्रीचे पॅड्स वापरायला सुरुवात करणारी एक महिला तिच्या आयुष्यभरात कचऱ्याच्या प्रवाहातून शेकडो डिस्पोजेबल पॅड्स कमी करते. याचा हजारो वापरकर्त्यांपर्यंत गुणाकार केल्यास, त्याचा परिणाम दुर्लक्ष करण्याजोगा राहत नाही. वॉलमार्ट वृद्धीमुळे मार्गदर्शन, बाजारपेठेशी जोडणी आणि सुसंघटित व्यावसायिक पाठिंबा मिळाला. त्याचे परिणाम दिसू लागले आणि सॅनिट्रीने वर्षभरात जवळपास १ कोटी रुपयांची उलाढाल केली. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्याचे श्रेय इशू यांनी याच कार्यक्रमाला दिले.&lt;/p&gt;
&lt;p&gt;ज्या पर्यावरणीय संकटामुळे इशू यांना पुनर्वापर करण्यायोग्य कापडाकडे वळण्याची प्रेरणा मिळाली त्याच संकटामुळे आणखी एका उद्योजिकेला डिस्पोजेबल नॅपकिनच्या मूळ रचनेवरच पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केले.'अपना ग्रीन प्रॉडक्ट्स'च्या संस्थापक अरुणा दारा यांच्या लक्षात आले की, अनेक महिलांसाठी शाश्वततेकडे वळणे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा उपाय ओळखीचा आणि परवडणारा असेल. रातोरात लोकांचे वर्तन कसे बदलावे हा त्यांचा प्रश्न नव्हता. तर डिस्पोजेबल पॅड हीच समस्या कशी राहणार नाही हा प्रश्न होता.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2&gt;हे पॅड्स कसे बनवले?&lt;/h2&gt;
&lt;p&gt;प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिन्सच्या धोक्यांवर एका मैत्रिणीला शोधनिबंध लिहिण्यास मदत करत असताना दारा यांच्या या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे आणि त्यावर कोणताही परवडणारा उपाय उपलब्ध नाही हे आले. त्यांनी कॉर्पोरेट टेलिकॉममधील नोकरी सोडून हैदराबादमध्ये 'अपना ग्रीन'ची स्थापना केली. त्या केळीच्या तंतूंपासून नैसर्गिकरित्या विघटित होणारे जैवविघटनशील नॅपकिन्स विकसित करतात. ते माती किंवा पाण्यात कोणतेही विषारी रसायन सोडत नाहीत. प्रति पॅड केवळ ७ ते ८ रुपये किंमत ठेवून, त्यांनी वाजवी किंमत हे त्यांच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2&gt;दुर्बल घटकातील 300 महिलांना रोजगार&lt;/h2&gt;
&lt;p&gt;हैदराबादभर शाळांमध्ये जनजागृती मोहीम म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता पाच राज्यांमध्ये १३ उत्पादन केंद्रांसह एका मोठ्या उद्योगात विकसित झाला आहे. यात सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील ३०० महिलांना रोजगार मिळाला असून प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणीय उद्देशाचे आर्थिक संधीत रूपांतर केले जात आहे. या उपक्रमाने केंद्र सरकारचा 'प्रज्वला चॅलेंज' पुरस्कार जिंकला आहे. हा पुरस्कार तळागाळातील सामाजिक समस्यांवर मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या उद्योजकांना दिला जातो. अरुणा यांनी वॉलमार्ट वृद्धीच्या माध्यमातून ई-कॉमर्स आणि पुरवठा साखळीसाठी पाठिंबा मिळवला. त्यामुळे त्यांची उत्पादने फ्लिपकार्टवर संपूर्ण भारतात उपलब्ध झाली.&lt;/p&gt;
&lt;p&gt;इशू आणि अरुणा यांनी जे काही उभारले आहे, ते एका व्यवसायापेक्षाही खूप मोठे आहे. हे या गोष्टीचा पुरावा आहे की भारतातील मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या आव्हानाला देशांतर्गत उत्तरे आहेत. ती पर्यावरणीय जबाबदारीवर आधारित आहेत, खऱ्या अर्थाने परवडणाऱ्या दरात तयार केली गेली आहेत आणि दुसऱ्या कोणीतरी कृती करण्याची वाट न पाहता पुढाकार घेणाऱ्या महिलांच्या पुढाकाराने ती उदयास आली आहेत.&lt;/p&gt;
&lt;p&gt;मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त त्यांच्या कथा ही एक प्रेरणा आहे की दैनंदिन आव्हानांवरील काही सर्वात अर्थपूर्ण उपाय दृढनिश्चयी महिलांद्वारे तळागाळापासून तयार केले जात आहेत. या प्रकरणी या महिलांना एक समस्या दिसली आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यास नकार दिला. त्यांनी हे उपाय जयपूरमधील एका कार्यशाळेत हाताने शिवले किंवा हैदराबादमधील एका केंद्रात एकत्र जोडले आहेत.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/d44aa584aad7f04b50ccd1659685233a17787661685251063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Art of Living's 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!]]></title><link>https://marathi.abplive.com/blog/gurudev-sri-sri-ravi-shankar-70th-birthday-and-art-of-living-45th-anniversary-blog-post-1424054</link><comments>https://marathi.abplive.com/blog/gurudev-sri-sri-ravi-shankar-70th-birthday-and-art-of-living-45th-anniversary-blog-post-1424054#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 15:36:57 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ कुमकुम नरेन ]]></dc:creator><category><![CDATA[ धार्मिक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/blog/gurudev-sri-sri-ravi-shankar-70th-birthday-and-art-of-living-45th-anniversary-blog-post-1424054</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Art of Living's 45th Anniversary:&lt;/strong&gt; प्रत्येकाला जीवनात आनंद हवा असतो पण तो मिळवायचा आणि टिकवायचा कसा हे मात्र समजत नाही. त्यासाठी कोणी मार्गदर्शक हवा असतो. माझ्या सुदैवाने तो मला 25 वर्षांपूर्वी लाभला आणि माझे जीवनच बदलून गेले. मी 'जीवन जगण्याची कला' अर्थात 'आर्ट ऑफ लिव्हिंग' शिकले. 2001 साली मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग'चा पहिला कोर्स केला. तो सहा दिवसांचा होता, एकूण 20 तास. पण तो केल्यावर मला जाणवले की वयाच्या 36 व्या वर्षी माझा पुनर्जन्म झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;चार वर्षांचा आजार बरा झाला&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्या कोर्सच्या काळात माझी चार वर्षे साथ देणारी व्याधी अगदी सहज अदृश्य झालीच, पण त्याचबरोबर जीवनाची एक अवर्णनीय अनुभूति आली. आजवर कधीही न अनुभवलेला एक वेगळ्याच उच्च पातळीचा आनंद प्राप्त झाला. 'सुदर्शन क्रिया' केल्यावर स्वतःचे आणि एकूणच या जीवनाचे एक अभूतपूर्व दर्शन झाले. आणि त्यानंतर नियमित साधना आणि गुरुवचनांचा अभ्यास यामुळे सगळे आयुष्यच एका अद्भुत चमत्कारासारखे भासू लागले.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;45-70 उत्सव एक अद्वितीय पर्वणी&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;1981 मध्ये श्री श्री रवि शंकर यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग ची स्थापना केली तेव्हा ते 25 वर्षांचे होते. आता 2026 मध्ये 13 मे रोजी गुरूदेव 70 वर्षांचे होतील आणि संस्था 45 वर्षांची. या केवळ 45 वर्षांत गुरुदेवांच्या ध्येयासक्तीमुळे, दैवी शक्तीमुळे आणि अखंड परिश्रमांमुळे ही संस्था 182 देशांमध्ये पसरलेली जगातील सर्वात मोठी सेवाभावी चळवळ आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;कोट्यावधी लोकांनी गुरुदेवांच्या अतिशय व्यावहारिक आणि परिणामकारक ज्ञानाला आत्मसात करून आपले जीवन सहज, आनंदी आणि अद्भुत बनवले आहे. 'सुदर्शन क्रिया' ही एक अतिशय सहज आणि सुलभ श्वसन प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करून स्वतःचे आणि त्याचबरोबर स्व&amp;zwj;कीयांचे जीवन आनंदोत्सवी बनवले आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;विश्व विकास हेच ध्येय&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण व्यक्ती विकास आणि व्यक्तीच्या अपार क्षमतांची जाणीव करून देणे एवढेच गुरुदेवांचे लक्ष्य नाही. व्यक्ती विकासातून समाज विकास आणि समाज विकासातून विश्व विकास हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी त्यांनी आपल्याला लाभलेल्या दैवी ज्ञानाचा अविरत प्रसार करण्यासाठी ही संस्था जोपासली आणि वाढवली आहे. त्यांचे ज्ञान आणि सेवाकार्य सर्वदूर पोचावे यासाठी जगभरात चाळीस हजाराहून अधिक प्रशिक्षक आणि लाखो स्वयंसेवकांची फौज तयार केली आहे. समाजाच्या स्वास्थ्यासाठी उपयुक्त असे हजारो प्रकल्प जगभर सुरु केले आहेत.&lt;br /&gt;&amp;nbsp; &amp;nbsp;&amp;nbsp;&lt;br /&gt;शिक्षण, पर्यावरण संवर्धन, नद्यांचे पुनरुज्जीवन, नैसर्गिक शेती, कारागृहातील कैद्यांचे मानसिक संगोपन, युद्धावरून परतलेल्या सैनिकांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळणे, इत्यादी अनेक क्षेत्रांमधील आपल्या सर्वांगीण कार्याद्वारे संस्थेने समाजावर टाकलेल्या प्रभावाची आकडेवारी आणि यादी किती करावी तेव्हढी अपुरीच राहणार आहे. तरी ही आकडेवारी &amp;nbsp;&amp;lsquo;शाश्वत समाज विकासासाठी 'व्यक्तीचे सक्षमीकरण' हाच मूलाधार असतो&amp;rsquo;, या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब आहे. गुरूदेव म्हणतात, &amp;ldquo;आनंदी माणसेच आनंदी समाजांची निर्मिती करतात.&amp;rdquo;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;गुरुदेव श्री श्री रवि शंकर पुढे म्हणतात&lt;/strong&gt;: &quot;जेव्हा सर्व काही सुरळीत चालू असते, तेव्हा स्मितहास्य करणे ही काही विशेष गोष्ट नाही; परंतु संघर्ष आणि अराजकतेच्या परिस्थितीतही तुम्ही सहजतेनं मंद स्मित करू शकाल, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने 'जगण्याची कला' (The Art of Living) शिकले आहात.&quot;&lt;br /&gt;सध्याचा काळ वाढता जागतिक तणाव, वैयक्तिक आणि सामाजिक संघर्ष आणि तीव्र अशांततेचा आहे. अशा वेळी शांततेचा संदेश पूर्वीपेक्षाही अधिक स्पष्टपणे ऐकला जाणे नितांत गरजेचे आहे. म्हणूनच, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या वर्षीच्या आनंद उत्सवांना एक नवा अर्थ प्राप्त झाला आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शांतता आणि सामायिक मानवतेचा संदेश&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हे उत्सव आशा, शांतता आणि सामायिक मानवतेचा संदेश घेऊन आले आहेत. स्वतःशीच संघर्ष करणाऱ्या मानवतेला खऱ्या अर्थाने सामर्थ्य प्रदान करण्याची क्षमता केवळ अध्यात्मामध्येच आहे. लोकांमध्ये पुन्हा सुबुद्धी आणि आपलेपणाची भावना अध्यात्मच जागृत करू शकते. केवळ स्वतःच्या हिताचा विचार करण्याऐवजी इतरांची सेवा करण्यास तत्पर असणारे सर्वसमावेशी हृदय केवळ अध्यात्मानेच शक्य आहे. आणि 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या ४५ व्या वर्षांच्या उत्सवाचा हाच नेमका गाभा आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गेल्या 45&amp;nbsp; वर्षांत 'दी आर्ट ऑफ लिव्हिंग'ने पर्यावरण संवर्धन, आपत्ती निवारण, आघातांमुळे येणाऱ्या तणावापासून मुक्ती, सर्व दूर सर्वांगीण शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील असंख्य समाजसेवा उपक्रमांद्वारे जगभरातील कोट्यावधी लोकांची सेवा केली आहे. इतकेच नव्हे तर प्रभावी आणि विज्ञाननिष्ठ श्वसनतंत्रे व ध्यानसाधनेच्या माध्यमातून 80 कोटींहून अधिक लोकांना त्यांच्या अंतर्मनातील आनंद आणि शांतीशी जोडण्यास मदत केली आहे. परिणामी, आज हे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानकारक आणि निरोगी आयुष्य जगत आहेत.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारतामध्ये अतिशय दुर्गम ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये संस्थेतर्फे 1327 मोफत शाळा चालवल्या जातात. या शिक्षणाद्वारे १.२० लाखांहून अधिक मुलांपर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोचतो. देशातील 75 हून अधिक नद्या आणि जलस्रोतांच्या संस्थेच्या वतीने केलेल्या पुनरुज्जीवनामुळे जवळपास साडेतीन कोटी लोकांना लाभ झाला आहे. 'प्रिझन स्मार्ट' उपक्रमाद्वारे पुनर्वसन झालेले हजारो कैदी असोत, किंवा नैसर्गिक शेती पद्धतींद्वारे प्रशिक्षित केलेले लाखो शेतकरी असोत, अशा सामान्य लोकांनीच या संस्थेचे कार्य प्रामुख्याने पुढे नेले आहे. हे यामुळेच शक्य झाले कारण त्यांनी काहीतरी असाधारण करण्याची तयारी दाखवली.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;'आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रोजेक्ट्स' विभाग सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणसंबंधी आव्हानांवर सर्वांगीण उपाय देऊ करतो. आमचे कार्य स्थानिक समुदायांशी असलेल्या भक्कम भागीदारीमध्ये रुजलेले आहे. त्याचबरोबर विविध कॉर्पोरेशन्स, शासकीय कार्यालये, अशासकीय संस्था (NGOs), विकास संस्था आणि सामाजिक प्रतिष्ठाने यांच्या सहयोगातून ते अधिक बळकट झाले आहे. आमचा दृष्टीकोन अखिल भारतात विस्तारलेला आहे त्यायोगे आम्ही सहयोगात्मक दृष्टिकोन, क्षमता-वृद्धीचे प्रभावी कार्यक्रम आणि विस्तारक्षम कार्यप्रणालींच्या माध्यमातून समाजावर सशक्त आही सकारात्मक प्रभाव पडणारे उपक्रम राबवतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;पण हे झाले समाजासाठी राबवलेले प्रकल्प. याशिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे विविध कोर्स करून आपले जीवन अतिशय समृद्ध, सशक्त आणि आनंदी केलेल्या करोडो लोकांनी या अद्भुत ज्ञानाच्या आधारे आपल्या सभोवतालचे वातावरण अधिक सकारात्मक व्हावे यासाठी सतत कार्य चालू ठेवले आहे. सध्याच्या सामाजिक वातावरणात अशा सकारात्मकतेची नितांत आवश्यकता आहे. गुरूदेव म्हणतात, &amp;ldquo;या ज्ञानाद्वारे तुम्हाला जीवन अधिक आनंदी झाल्याचे जाणवले असेल तर मग या ज्ञानज्योतीने आपल्या भोवतालच्या किमान दहा दिव्यांना तरी प्रज्वलित करा. असे करत राहाल तर हा ज्ञानप्रकाश हळू हळू सर्वदूर पसरेल आणि दुःखाच्या अंधाराचा संपूर्ण विनाश होईल.&amp;rdquo;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जगभरात 182 देशांमध्ये प्रसार&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;स्वतः गुरूदेव या वयातही जगभर भ्रमण करून हा आनंदाचा ज्ञानसंदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवू पाहतात. संस्थेतर्फे चालवलेल्या सेवाप्रकल्पांचा आढावा घेतात आणि त्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतात. जगभरात १८२ देशांमध्ये सर्व पातळींवरील लोकांमध्ये त्यांच्या प्रेमाची छाया पाहता येते. मला तरी सध्याच्या जगात त्यांच्याएवढा सर्वप्रिय आणखी कुणी दिसत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;गुरुदेवांना &amp;ldquo;शांतीचा देवदूत&amp;rdquo; असे संबोधले जाते. कोलम्बियापासुन ते श्रीलंका, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि काश्मीर आदि अनेक भागातील गृहयुद्धे थांबवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न सर्वाना माहित आहेत. युनो पासून ते दावोस पर्यंत; जगातल्या अनेक शिक्षण संस्थांपासून ते युद्धग्रस्त प्रदेशातील पीडीतांपर्यंत सर्व ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रण असते आणि ते तिथे जाऊन देतात. त्याचबरोबर एका गावातल्या शेतकऱ्यापासून ते एखाद्या देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांच्या दुःखांचे आणि अडचणींचे निवारणही करतात.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;रोज हजारो लोक त्यांचे दर्शन घेऊन तृप्त आणि आनंदी कसे होतात हे अनुभवायचे असेल तर त्यांच्या दैनंदिन सत्संगामध्ये जाऊन बसावे. आधुनिक सोशल मिडीयाच्या माध्यमातूनदेखील गुरूदेव sw लोकांना नेमके योग्य मार्गदर्शन करून त्यांचे दुःख निवारण कसे काय करतात, हा अभ्यासाचा विषय आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जीवन समृद्ध होणार अनुभव&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आर्ट ऑफ लिव्हिंगध्ये आल्यापासून आधी गुरूदेवांचा शिष्य आणि मग त्यांच्या ज्ञानाला लोकांपर्यंत पोचवण्याचे त्यांचे एक साधन (हॅपीनेस प्रोग्राम प्रशिक्षक) या नात्यांनी माझे जीवन समृद्ध केले आहे. त्यांच्या ज्ञानाच्या मदतीने जीवनातील सर्व अडचणी सोप्या झाल्यात, सर्व दुःखे सुसह्य झालीत आणि सर्व संकटे आपसूकच विरून गेली आहेत. आनंदाची उच्च पातळी अनुभवता आली आहे. रोजचे अद्भुत चमत्कार आता अनुभवात येत नाहीत, कारण गुरुदेवांच्या आशीर्वादाने हे पूर्ण जीवनच एक चमत्कार बनून राहिले आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मी गुरूदेवांची ऋणी आहे, असे मला अजिबात वाटत नाही. कारण मी आणि गुरूदेव वेगळे कुठे आहोत?&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/03a7adddf75294ab416963627a3dc2a41778756799821381_original.jpeg" width="220"/></item><item><title><![CDATA[Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer: आधीच पाचवेळा कॅन्सरवर मात, आता पुन्हा बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीला जीवघेण्या आजाराचं निदान; पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला...]]></title><link>https://marathi.abplive.com/entertainment/sharib-hashmi-wife-nasreen-hashmi-diagnos-six-times-with-cancer-change-face-after-surgery-shared-experience-1423985</link><comments>https://marathi.abplive.com/entertainment/sharib-hashmi-wife-nasreen-hashmi-diagnos-six-times-with-cancer-change-face-after-surgery-shared-experience-1423985#respond</comments><pubDate>Thu, 14 May 2026 07:36:26 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क ]]></dc:creator><category><![CDATA[ करमणूक ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/entertainment/sharib-hashmi-wife-nasreen-hashmi-diagnos-six-times-with-cancer-change-face-after-surgery-shared-experience-1423985</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Sharib Hashmi Wife Diagnos Six Times Cancer:&lt;/strong&gt; 'द फॅमिली मॅन' (The Family Man) वेब सीरिजमध्ये जेवढी अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी साकारलेला श्रीकांत तिवारी गाजला, त्याच्या बरोबरीनंच आणखी एक पात्र गाजलेलं ते म्हणजे, 'जेके तळपदे'. बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) शरीब हाश्मी (Sharib Hashmi) यानं 'द फॅमिली मॅन' (The Family Man Web Series) सीरिजमध्ये 'जेके तळपदे' ही भूमिका साकारुन सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. यापूर्वीही शरीब हाश्मी यानं फिल्म इंडस्ट्रीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्यात. पण, तुम्हाला माहितीय का? मनोज वाजपेयींसोबत 'द फॅमिली मॅन' वेब सीरिजमध्ये जरी शरीब हाश्मीनं सहाय्यक भूमिका साकारली असली, तरीसुद्धा खऱ्या आयुष्यात मात्र तो एक आदर्श 'फॅमिली मॅन' आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नुकत्याच एका पॉडकास्टला शरीब हाश्मी आणि त्याची पत्नी नसरिन हाश्मी (Nasreen Hashmi) यांनी मुलाखत दिली. Hauterrfly सोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना या जोडप्यानं त्यांच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. अभिनेच्याच्या पत्नीला आतापर्यंत पाच वेळा तोंडाच्या कर्करोगाचं (Oral Cancer) निदान झालेलं. 2018 मध्ये जेव्हा तिला पहिल्यांदा आजाराचं निदान झालं, तेव्हापासून ती या आजाराशी लढा देत आहे. यावर बोलताना अभिनेत्यानं सांगितलं की, &quot;नसरीनचा कर्करोग यापूर्वीच पाच वेळा पुन्हा उद्भवला आहे आणि आता तो सहाव्यांदा परतला आहे. यावेळी, तो बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशा कठीण काळात, मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात.&quot;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शरीब हाश्मी पुढे बोलताना म्हणाला की, &quot;नसरीनच्या धैर्यामुळे संपूर्ण कुटुंबालाच बळ मिळालंय. तिनं नेहमीच या परिस्थितीचा अत्यंत धैर्यानं सामना केलाय... ती इतक्या निकरानं लढा देतेय की, तिच्या सोबतीनं आम्ही सर्वजणही लढवय्ये बनलोत.&quot;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;शरीब हाश्मीची पत्नीला खंबीर साथ (Sharib Hashmi On Wife Nasreen Hashmi)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;अभिनेत्याची पत्नी नसरीन हिनंही सांगितलंय की, रुग्णालयातील प्रत्येक व्हिजिट आणि प्रत्येक शस्त्रक्रियेच्या वेळी शरीब हाश्मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय. नसरिन हाश्मी म्हणाली की, &quot;तो कितीही व्यस्त असला किंवा शूटिंगमध्ये कितीही मग्न असला, तरीही तो कसाबसा वेळ काढून रुग्णालयात पोहोचायचाच... मला रुग्णालयात दाखल केल्याच्या क्षणापासून ते मला डिस्चार्ज मिळेपर्यंत, तो हातात आपली बॅग घेऊन तिथेच बसून राहायचा आणि तिथून दुसरीकडे कुठेही जायला नकार द्यायचा...&quot;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नसरिननं पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा शरीबला तिच्या आजाराबद्दल पहिल्यांदा समजलं, तेव्हा तो पूर्णपणे कोलमडून गेलेला. शरीबनं सांगितलं की, &quot;तिच्यावर आतापर्यंत पाच वेळा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हा आजार पाच वेळा पुन्हा बळावला आहे. आता, सहाव्यांदा हा आजार पुन्हा परतला आहे. यावेळी तर तो तिच्या संपूर्ण शरीरात पसरला आहे. मात्र हे सुद्धा संकट नक्कीच टळून जाईल, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत...&quot;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;img src=&quot;https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/37fe36f69a2a4a23f14e905f994ce343177872379729488_original.jpeg&quot; width=&quot;239&quot; height=&quot;290&quot; /&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;नसरीनने कर्करोगाशी सुरू असलेल्या आपल्या दीर्घकालीन लढ्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या भावनिक आणि आर्थिक परिणामांबद्दलही मनमोकळेपणानं भाष्य केलंय. ती म्हणाली की, &quot;हा प्रवास आणि उपचारांची प्रक्रिया अत्यंत प्रदीर्घ काळ चालणारी आहे... ती मुळीच सोपी नाही. दर दीड वर्षांनी कर्करोग पुन्हा उद्भवतो आणि प्रत्येक वेळी, उपचारांसाठी मोठा खर्च येतो. वैद्यकीय खर्चाचा हा संपूर्ण बोजा आमच्यावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण करतो...&quot;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&quot;पाच शस्त्रक्रियांनी माझा चेहराच बदलून टाकला...&quot;&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;शारीब हाश्मीचं कौतुक करताना नसरीन म्हणाली की, &quot;त्यानं माझ्या उपचारांचा संपूर्ण खर्च कोणाकडूनही एक रुपयाही उसना न घेता उचलला आहे. माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत मोलाची आहे...&quot; नसरीन पुढे बोलताना म्हणाली की, &quot;हे सर्व काही अगदीच सोपं होतं, असं मी अजिबात म्हणणार नाही. असे काही दिवस असतात, जेव्हा सर्व काही अत्यंत कठीण वाटतं. एक स्त्री म्हणून चेहऱ्याच्या पाच शस्त्रक्रियांतून जाणं, आपला चेहरा इतका बदलताना पाहणं आणि बोलण्यासाठीही संघर्ष करणं... यामुळे मनाला खोलवर वेदना होतात. कधीकधी मी माझे जुने फोटो पाहते आणि विचार करते, &quot;मी पूर्वी किती सुंदर दिसायचे, आणि आता मी किती वेगळी दिसते!&quot;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;महत्त्वाच्या इतर बातम्या :&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/entertainment/bollywood-actress-mauni-roy-divorce-after-4-years-accuses-husband-of-betrayal-shares-emotional-post-for-special-someone-1423921&quot;&gt;Mauni Roy Divorce: लग्नाच्या 4 वर्षांनी मोडला बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार, नवऱ्यानं फसवल्याचं समोर; आता खास व्यक्तीसाठी पोस्ट करत म्हणाली...&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/14/6acb98139a2f22a6519829b8f4661b09177872435941388_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Vitrified or Glazed Vitrified Tiles: फुल-बॉडी विट्रिफाइड कि ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स? दोघांमध्ये काय आहे फरक, तुमच्या घरासाठी कोणती सर्वोत्तम? वाचा सविस्तर]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/full-body-vitrified-or-glazed-vitrified-tiles-know-difference-which-one-is-best-in-marathi-news-1423888</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/full-body-vitrified-or-glazed-vitrified-tiles-know-difference-which-one-is-best-in-marathi-news-1423888#respond</comments><pubDate>Wed, 13 May 2026 12:33:48 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ विशाल देवकर ]]></dc:creator><category><![CDATA[ लाईफस्टाईल ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/full-body-vitrified-or-glazed-vitrified-tiles-know-difference-which-one-is-best-in-marathi-news-1423888</guid><description><![CDATA[&lt;p id=&quot;tw-target-text&quot; class=&quot;tw-data-text tw-text-large tw-ta&quot; style=&quot;text-align: justify;&quot; tabindex=&quot;-1&quot; role=&quot;text&quot; data-placeholder=&quot;Translation&quot; aria-label=&quot;Translated text: Full-body vitrified or glazed vitrified tiles?&quot; data-ved=&quot;2ahUKEwjq0dLF1rWUAxWZxTgGHSPbEVkQ3ewLegQIExAV&quot;&gt;&lt;span class=&quot;Y2IQFc&quot; lang=&quot;en&quot;&gt;&lt;strong&gt;Full Body Vitrified or Glazed Vitrified Tiles:&lt;/strong&gt; &lt;/span&gt;घरे, कार्यालये &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;असो&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;कि&lt;/span&gt; मोठ्या व्यावसायिक &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;प्रकल्प&lt;/span&gt;, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;सगळ्या&lt;/span&gt;मध्ये टाइल्सचा वापर &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;केला&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;जातोच&lt;/span&gt;, &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;मात्र&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;हा&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;वापर&lt;/span&gt; केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर मजबुती आणि दीर्घकाळ टिकण्यासाठीही केला जातो. बाजारात अनेक प्रकारच्या टाइल्स उपलब्ध असल्या तरी, ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स (&lt;span class=&quot;Y2IQFc&quot; lang=&quot;en&quot;&gt;Glazed Vitrified Tiles)&lt;/span&gt; आणि फुल-बॉडी विट्रिफाइड टाइल्स सर्वाधिक वापरल्या जातात. त्या दिसायला सारख्या वाटत असल्या तरी, त्यांच्यामध्ये लक्षणीय फरक आहेत. येथे, तुम्ही दोन्ही प्रकारच्या टाइल्सबद्दल अधिक जाणून घेऊ शकता आणि त्यांतील फरक समजू शकता.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स म्हणजे काय? (&lt;span class=&quot;Y2IQFc&quot; lang=&quot;en&quot;&gt;Glazed Vitrified Tiles)&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स चिकणमाती, सिलिका, क्वार्ट्ज आणि फेल्डस्पार यांसारख्या पदार्थांपासून बनवल्या जातात. या टाइल्स उच्च दाबाखाली आणि अंदाजे 1200&amp;deg;C तापमानावर भाजल्या जातात. विट्रिफिकेशन नावाची ही प्रक्रिया त्यांना मजबूत आणि कमी जल-प्रतिरोधक बनवते. या टाइल्सचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर डिझाइन केलेल्या ग्लेजचा थर दिलेला असतो. संगमरवर, लाकूड किंवा दगडासारखा देखावा तयार करण्यासाठी डिजिटल प्रिंटिंगचा वापर केला जाऊ शकतो. यामुळेच या टाइल्स घरांमध्ये आणि आधुनिक इंटिरियर्समध्ये इतक्या लोकप्रिय आहेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;फुल-बॉडी टाइल्स म्हणजे काय? (&lt;span class=&quot;Y2IQFc&quot; lang=&quot;en&quot;&gt;Full Body Vitrified)&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फुल-बॉडी टाईल्स हा विट्रिफाइड टाईल्सचाच एक प्रकार आहे, परंतु त्यांचा रंग आणि डिझाइन संपूर्ण टाईलमध्ये एकसारखे असते. याचा अर्थ असा की, जरी एखादी टाईल कापली गेली किंवा झिजली, तरीही आतील आणि बाहेरील रंग सारखाच राहतो. या टाईल्सच्या निर्मितीदरम्यान, रंग थेट कच्च्या मालामध्ये मिसळला जातो. यामुळे त्या अधिक टिकाऊ आणि मजबूत बनतात. जास्त वर्दळ असलेल्या ठिकाणी त्यांचा अधिक वापर केला जातो.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;दोन प्रकारच्या टाईल्समधील मुख्य फरक: (&lt;span class=&quot;Y2IQFc&quot; lang=&quot;en&quot;&gt;Full Body Vitrified or Glazed Vitrified Tiles difference)&lt;/span&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;1. डिझाइन आणि रंग&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फुल-बॉडी टाईल्स, म्हणजेच GVT/PGVT टाईल्सवर, डिझाइन फक्त पृष्ठभागावर असते. फुल-बॉडी टाईल्समध्ये, रंग आणि नमुना संपूर्ण टाईलमध्ये एकसारखा राहतो.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;2. दीर्घकाळ एकसारखे दिसतात&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;ग्लेज्ड टाईल्स जास्त झिजल्यास त्यांच्या पृष्ठभागावरील डिझाइन नाहीसे होऊ शकते. फुल-बॉडी टाईल्स दीर्घकाळ एकसारखे दिसतात कारण त्यांचा रंग संपूर्ण टाईलमध्ये असतो.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;3. टिकाऊपणा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;फुल-बॉडी टाईल्स ओरखडे, झीज आणि जास्त दाब चांगल्या प्रकारे सहन करतात, तर GVT टाईल्स अधिक मजबूत असतात, परंतु त्या डिझाइन आणि फिनिशिंगवर अधिक लक्ष केंद्रित करतात.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;4. उपयोग&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जीव्हीटी टाइल्स घरे, बेडरूम, स्वयंपाकघर आणि भिंतींसाठी आदर्श आहेत. फुल-बॉडी टाइल्स विमानतळ, मॉल्स, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि मोठ्या व्यावसायिक क्षेत्रांसाठी योग्य आहेत.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कोणती टाइल कुठे लावावी?&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जर तुम्हाला तुमच्या घरासाठी एक स्टायलिश आणि आधुनिक लुक हवा असेल, तर ग्लेज्ड विट्रिफाइड टाइल्स हा एक चांगला पर्याय आहे. त्या कमी बजेटमध्ये महागड्या संगमरवर आणि लाकडासारखा लुक देतात. तथापि, जर त्या भागात जास्त वर्दळ असेल आणि टाइल्स टिकाऊ असणे आवश्यक असेल, तर फुल-बॉडी टाइल्स हा एक चांगला पर्याय आहे.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;PlaygroundEditorTheme__paragraph&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;इतर&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;महत्वाच्या&lt;/span&gt; &lt;span class=&quot;transliteration&quot;&gt;बातम्या&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul&gt;
&lt;li class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-risk-of-heart-disease-rising-due-to-changing-lifestyles-lack-of-awareness-regarding-bypass-surgery-marathi-news-1420433&quot;&gt;Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/strong&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/13/6e5216bdb1b6997e573e568f16b40bcd1778655726708892_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[हायपरटेन्शन कमी करण्यासाठी मीठ कमी करणे नव्हे, ‘ही’ गोष्ट महत्त्वाची; डॉक्टर सांगतात..]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/hypertension-control-tips-reducing-salt-doesnt-always-work-doctor-suggest-what-you-should-do-instead-health-tips-1423803</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/hypertension-control-tips-reducing-salt-doesnt-always-work-doctor-suggest-what-you-should-do-instead-health-tips-1423803#respond</comments><pubDate>Tue, 12 May 2026 16:56:33 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ abp majha web team ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/hypertension-control-tips-reducing-salt-doesnt-always-work-doctor-suggest-what-you-should-do-instead-health-tips-1423803</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Health:&lt;/strong&gt; भारतातील उच्च रक्तदाबामागील एक प्रमुख कारण म्हणजे आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयी. या सवयी आणि आपल्या चवीबद्दलच्या अपेक्षा, ज्या आपण लहानपणीच शिकतो. त्यामुळे ही समस्या आणखी गंभीर होते. जागतिक आरोग्य संघटना प्रौढांना दररोज 2000 मिग्रॅ पेक्षा कमी सोडियमचे म्हणजे 5&amp;nbsp; ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करण्याची शिफारस करते. &amp;nbsp;भारतातील सर्वोत्तम उपलब्ध राष्ट्रीय अंदाजानुसार रोजचे सरासरी मिठाचे सेवन ८.० ग्रॅम आहे आणि अनेक समुदाय त्याहूनही अधिक सेवन करतात असे सर्वेक्षणांमधून दिसून येते. मग मोठ्या प्रमाणावर &amp;ldquo;मीठ कमी खा&amp;rdquo; हा सल्ला रक्तदाब कमी करण्यात अयशस्वी का ठरतो? डॉ. एराम राव आणि डॉ. जमुना प्रकाश यांनी याची कारणे सांगितली आहेत. दरवर्षी 17 मे रोजी &amp;lsquo;जागतिक उच्च रक्तदाब दिन&amp;rsquo; (World Hypertension Day) साजरा केला जातो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;भारताची खाण्याची पद्धत समजून घेणे&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संशोधन आणि मॉडेलिंग अभ्यासांमधून सातत्याने असे दिसून येते की, शहरी भागांमध्ये पॅकेज्ड आणि घराबाहेर खाण्याचे प्रमाण वाढत असतानाही, ऐतिहासिकदृष्ट्या ८०% पेक्षा जास्त मिठाचे सेवन रोजच्या स्वयंपाकात किंवा जेवताना घातलेल्या मिठातूनच बोते. हे महत्त्वाचे आहे कारण यामुळे काय प्रभावी ठरते यात बदल होतो. ज्या ठिकाणी पॅकेज्ड खाद्यपदार्थांमुळे सेवन वाढते, तिथे पदार्थांमध्ये सुधारणा केल्यास जलद गतीने मोठे फायदे मिळू शकतात. भारतात पदार्थांमध्ये बदल करणे उपयुक्त ठरू शकते, तरीही कौटुंबिक वर्तनालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. जेव्हा खाण्याचा मुख्य स्रोत ऐच्छिक असतो, तेव्हा केवळ सल्ला पुरेसा ठरत नाही, विशेषतः जेव्हा लोक वेगवेगळ्या वयोगटांतील आणि आवडीनिवडी असलेल्या कुटुंबांसाठी स्वयंपाक करत असतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जागरूकता आपल्या अपेक्षेपेक्षा कमी आहे.&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;सार्वजनिक आरोग्य मोहिमा अनेकदा असे गृहीत धरतात की लोकांना धोका समजतो आणि आठवण करून दिल्यास ते त्यानुसार वागतील. परंतु पुरावे याच्या उलट सांगतात. एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे आढळून आले की एक तृतीयांशपेक्षा कमी प्रौढांना हे माहीत होते की दररोज जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते. ज्ञानाची पातळी असमान असेल, तर 'मीठ कमी करा' असा साधा संदेश दूरचा, ऐच्छिक किंवा अगदी असंबद्ध वाटू शकतो. बदलामागील कारणावर पूर्णपणे विश्वास ठेवला जात नाही किंवा ते समजत नाही, तेव्हा वर्तणुकीतील बदल टिकवून ठेवणे कठीण होते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;मिठाबद्दलच्या बहुतेक चर्चांमध्ये चव हा एक महत्त्वाचा दुवा दुर्लक्षित राहतो. सल्ला सहसा काय कमी करायचे यावर लक्ष केंद्रित करतो. अन्न रुचकर ठेवण्यासाठी त्यात काय घालायचे यावर तो क्वचितच भाष्य करतो. मीठामुळे अन्नाची ओळख पटते आणि त्वरित समाधान मिळते. अचानक मीठ कमी केल्याने अन्न बेचव वाटू शकते आणि लोक अनेकदा नकळतपणे, जेवताना किंवा स्वयंपाक करताना मीठ परत घालून त्याची भरपाई करतात. त्यामुळेच सोडियम कमी करण्याचा पुढचा टप्पा चवीला प्राधान्य देणारा असायला हवा. हळूहळू आणि सातत्याने सोडियम कमी करताना अन्न स्वीकारार्ह ठेवणे हे उद्दिष्ट असले पाहिजे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;त्याऐवजी आपण काय करू शकतो?&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;१) भारताच्या वास्तवाला अनुरूप अशी सोडियमची रणनीती तयार करा.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक असंसर्गजन्य रोग कृती योजनेनुसार, भारताचे २०३० पर्यंत लोकसंख्येच्या सोडियम सेवनात ३०% कपात करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वयंपाकघरे, संस्था आणि बाजारपेठ या सर्व स्तरांवर काम करणाऱ्या एका एकत्रित योजनेची आवश्यकता आहे. पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये सुधारणा आणि ग्राहकांना अधिक स्पष्ट संकेत देण्यासोबतच, घरोघरी जाऊन संवाद साधणे आणि लोकांना आज वापरता येतील अशी साधने वापरणे आवश्यक आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;२) जिथे जेवण प्रमाणित आहे तिथून सुरुवात करा: &lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संस्था,शाळा, वसतिगृहे, उपहारगृहे आणि सरकारी अन्न कार्यक्रमांची एक विशेष भूमिका आहे कारण ते मोठ्या प्रमाणावर लोकांच्या आवडीनिवडी घडवतात. या ठिकाणी हळूहळू कपात केल्यास कोणालाही वेगळे न वाटता &quot;सामान्य&quot; स्थिती पुन्हा प्रस्थापित होऊ शकते. तसेच यामुळे कुटुंबांना प्रत्येक जेवणागणिक मिठासाठी संघर्ष करावा लागत नाही.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;३) कमी-सोडियमयुक्त पदार्थांना वास्तववादी बनवणारी चव वाढवणारी साधने उपलब्ध करून देणे.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक असे साधन ज्यावर अधिक शांतपणे आणि पुराव्यांवर आधारित चर्चा होणे आवश्यक आहे, ते म्हणजे एमएसजी. सामान्य मीठामध्ये ३९% सोडियम असते, तर एमएसजीमध्ये अंदाजे १२% सोडियम असते आणि त्यामुळे समाधानकारक चव येते. कमी प्रमाणात मीठासोबत वापरल्यास एमएसजीमुळे पदार्थांचा रुचकरपणा टिकून राहतो आणि ग्राहकांची पसंती कमी न करता सोडियममध्ये ४०% पर्यंत कपात करणे शक्य होते, असे दिसून आले आहे. खरे तर सीएसआयआर- सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने केलेल्या अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे की, मीठ आणि एमएसजीचे अनुकूलित मिश्रण वापरून व्हेज बिर्याणी, डाळ सांबार, पनीर करी, मुरुकू, शेव, आलू भुजिया, खारवलेला ब्रेड, बन आणि बिस्किटे यांसारख्या सामान्यतः खाल्ल्या जाणाऱ्या भारतीय पदार्थांमधील सोडियममध्ये सुमारे २२-३२% कपात करता येते आणि तरीही पदार्थांची चव व एकूण स्वीकारार्हता टिकून राहते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जबाबदारीने वापरल्यास हे स्वयंपाकी आणि अन्न उत्पादकांना सोडियम कमी करताना चव टिकवून ठेवण्यासाठी एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देते. ज्या देशात ऐच्छिक मीठाचा वापर इतका प्रचलित आहे तिथे अशी साधने असा बदल घडवून आणण्यास मदत करू शकतात. हा बदल केवळ सल्ल्याने घडवून आणणे कठीण जाते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;४) आपल्या सोडियमविषयक संदेशाचा पुनर्विचार करणे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&amp;ldquo;मीठ कमी खा&amp;rdquo; या संदेशापेक्षा &amp;ldquo;हळूहळू कमी करा आणि चव टिकवून ठेवा&amp;rdquo; हा संदेश अधिक सुयोग्य आहे. आपण लोकांना मीठाचे प्रमाण हळूहळू कसे कमी करावे, अधिक घालण्यापूर्वी चव कशी घ्यावी आणि पदार्थांमधील घटक व स्वयंपाकाच्या पद्धतींमधून मिळणाऱ्या चवदारपणावर कसे अवलंबून राहावे, हे दाखवून दिले पाहिजे. व्यावहारिक मार्गदर्शनाची पुनरावृत्ती होण्याची, ते इतरांना सांगण्याची आणि ते टिकून राहण्याची अधिक शक्यता असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;५) सोडियम कमी करताना भारताच्या आयोडाइज्ड मिठाच्या यशाचे रक्षण करणे&amp;nbsp;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सोडियम कपात देशाच्या आयोडीनयुक्त मीठ कार्यक्रमाशी सुसंगत असली पाहिजे. राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रमाच्या (एनजीसीपी) आकडेवारीनुसार २०२०-२१ मध्ये ९४.३% भारतीय कुटुंबे पुरेसे आयोडीनयुक्त मीठ वापरत होती. समन्वित नियोजन आणि स्पष्ट सार्वजनिक मार्गदर्शनाद्वारे आयोडीनची पुरेशी पातळी कायम राखत एकूण मीठाचे सेवन कमी करणे हे धोरणात्मक उद्दिष्ट असले पाहिजे. उच्च रक्तदाब प्रतिबंधासाठी सोडियम कपातीच्या आपल्या दृष्टिकोनात बदल आवश्यक आहे. आपल्याला केवळ &quot;मीठ कमी करा&quot; या सल्ल्याच्या पलीकडे जाऊन एक अशी रणनीती तयार करण्याची गरज आहे, ज्यामुळे आरोग्यदायी पर्याय स्वीकारणे सोपे होईल. याचा अर्थ असा की, हळूहळू कपात करण्यास मदत करणारी यंत्रणा, आदर्श घालून देणाऱ्या संस्था आणि अन्नाची चव टिकवून ठेवणारे उपाय देणे आवश्यक आहे. याद्वारे सोडियम कपात ही केवळ वर्षातून एकदा दिली जाणारी आठवण न राहता एक सातत्यपूर्ण उपाय ठरू शकते.&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/12/91816f89d13ef908bd8b1fcccf69ce3f17785851801131063_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Eye Cancer : डोळ्यात सतत वेदना किंवा धूसर दिसतंय? दुर्लक्ष करू नका, असू शकतात कॅन्सरचे संकेत]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/health/eye-cancer-symptoms-blurry-vision-eye-pain-risk-factors-retinoblastoma-marathi-news-1423696</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/health/eye-cancer-symptoms-blurry-vision-eye-pain-risk-factors-retinoblastoma-marathi-news-1423696#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 23:05:40 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा ब्युरो ]]></dc:creator><category><![CDATA[ आरोग्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/health/eye-cancer-symptoms-blurry-vision-eye-pain-risk-factors-retinoblastoma-marathi-news-1423696</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Retinoblastoma Symptoms :&lt;/strong&gt; डोळ्यांत सतत वेदना होणे, धूसर दिसणे किंवा अचानक दृष्टी कमी झाल्यास अनेकजण त्याकडे साध्या थकव्याचे किंवा नंबर वाढल्याचे लक्षण म्हणून पाहतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, काही वेळा ही लक्षणे डोळ्यांच्या कर्करोगाची म्हणजेच Eye Cancer ची सुरुवात असू शकते. हा आजार तुलनेने दुर्मिळ असला तरी वेळेत निदान न झाल्यास दृष्टी आणि जीव दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळ्यांबाबत माहिती देणाऱ्या Centre for Sight या संस्थेनुसार, डोळ्यांतील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्यास Eye Cancer होऊ शकतो. हा कर्करोग रेटिना, आयरिस किंवा यूव्हिया अशा डोळ्यांच्या विविध भागांमध्ये विकसित होऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यात आजार ओळखल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात आणि दृष्टी वाचवण्याची शक्यता वाढते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Intraocular Melanoma : प्रौढांमध्ये आढळणारा सर्वाधिक सामान्य Eye Cancer&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;प्रौढांमध्ये सर्वाधिक आढळणारा Eye Cancer म्हणजे Intraocular Melanoma. या आजारात धूसर दिसणे, पुतळीवर काळे डाग दिसणे, पुतळीच्या आकारात बदल होणे किंवा दृष्टीक्षेत्र कमी होणे अशी लक्षणे दिसू शकतात.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Retinoblastoma : लहान मुलांमध्ये आढळणारा धोकादायक कर्करोग&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Retinoblastoma हा डोळ्यांचा कर्करोग मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळतो. मुलांच्या डोळ्यात पांढरा प्रतिबिंब दिसणे, डोळे तिरळे होणे किंवा दृष्टी कमी होणे ही त्याची महत्त्वाची लक्षणे असू शकतात. वेळेत उपचार झाल्यास मुलांची दृष्टी आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवता येऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Symptoms: कोणती लक्षणे गंभीर इशारा देतात?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या मते खालील लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये:&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;सतत धूसर दिसणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;सरळ रेषा वाकड्या दिसणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;पुतळीचा आकार किंवा रंग बदलणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;दृष्टीक्षेत्र कमी होणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;डोळ्याभोवती सूज किंवा गाठ येणे&lt;/li&gt;
&lt;li&gt;सतत लालसरपणा&lt;/li&gt;
&lt;li&gt;एका डोळ्यात अचानक दृष्टी कमी होणे&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Eye Pain: डोळ्यांत वेदना नेहमीच असतात का?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;Eye Cancer च्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा वेदना जाणवत नाहीत. त्यामुळे लक्षणे सौम्य वाटल्याने अनेकजण तपासणी उशिरा करतात. म्हणूनच नियमित नेत्रतपासणी हा या आजाराचे लवकर निदान करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Risk Factors: कोणत्या कारणांमुळे वाढतो धोका?&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;संशोधनानुसार खालील घटक Eye Cancer चा धोका वाढवू शकतात:&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;कुटुंबात कर्करोगाचा इतिहास&lt;/li&gt;
&lt;li&gt;हलक्या रंगाचे डोळे&lt;/li&gt;
&lt;li&gt;वाढते वय&lt;/li&gt;
&lt;li&gt;अतिनील किरणांचा (UV Rays) दीर्घकाळ संपर्क&lt;/li&gt;
&lt;li&gt;धूम्रपान&lt;/li&gt;
&lt;li&gt;मद्यपान&lt;/li&gt;
&lt;li&gt;रसायनांच्या संपर्कात काम करणे&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Prevention and Diagnosis: वेळेवर तपासणीच सर्वात मोठं संरक्षण&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;डोळ्यांमध्ये सतत त्रास होत असल्यास किंवा दृष्टीत कोणताही अनपेक्षित बदल जाणवत असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रारंभीच्या अवस्थेत निदान झाल्यास लेसर, रेडिएशन किंवा शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करून दृष्टी वाचवण्याची शक्यता अधिक असते.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Disclaimer: ही माहिती संशोधन अभ्यास आणि तज्ञांच्या मतावर आधारित आहे. याला वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय मानू नका. कोणताही नवीन उपचार सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;ही बातमी वाचा:&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;ul style=&quot;text-align: justify;&quot;&gt;
&lt;li&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-rising-risk-of-asthma-and-skin-disorders-due-to-heat-and-pollution-read-expert-advice-health-news-in-marathi-1423242&quot;&gt;&lt;strong&gt;Health Tips : उष्णता आणि प्रदूषणामुळे दमा आणि त्वचारोगांचा वाढतो धोका; वाचा तज्ज्ञांचा सल्ला&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;/li&gt;
&lt;/ul&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/10/e82beca11714d667165c95a5517d78b81778413584462937_original.png" width="220"/></item><item><title><![CDATA[Women Health: कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी, महिलांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी! कर्करोगाचा धोका वाढतोय, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त...]]></title><link>https://marathi.abplive.com/lifestyle/women/women-health-lifestyle-marathi-news-women-neglect-their-health-due-to-busy-lifestyles-risk-of-cancer-experts-express-concern-1423628</link><comments>https://marathi.abplive.com/lifestyle/women/women-health-lifestyle-marathi-news-women-neglect-their-health-due-to-busy-lifestyles-risk-of-cancer-experts-express-concern-1423628#respond</comments><pubDate>Mon, 11 May 2026 12:54:27 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ महिला ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/lifestyle/women/women-health-lifestyle-marathi-news-women-neglect-their-health-due-to-busy-lifestyles-risk-of-cancer-experts-express-concern-1423628</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Women Health&lt;/strong&gt;: महिलावर्ग अनेकदा लाज वाटते म्हणून.. किंवा अपराधीपणाच्या भावनेमुळे, भीतीमुळे आपल्या आरोग्यासंबंधीत समस्यांबद्दल मोकळेपणाने चर्चा करत नाहीत, खुला संवाद साधणे टाळतात. एखादी समस्या आढळल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात आणि आपल्याला होणारा त्रास निमूटपणे सहन करत राहतात. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिला करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. यामुळे गंभीर आजारांसह कर्करोगाचा धोका वाढू शकतो. याबाबत आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केलीय. तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अखिला रेड्डी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे, जाणून घ्या...&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;घरातील प्रत्येक महिलेला 'याची' जाणीव झालीच पाहिजे...(Women Health)&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नियमित तपासण्या टाळणे, लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आणि उपचारास विलंब करणे ही एक गंभीर बाब असून, यामुळे अनेक आजार बळावतात. विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून याबाबत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक महिलेला व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल साधताना आपल्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होते याची जाणीव झाली पाहिजे. योग्य वेळी निदान झाल्यास बऱ्याच कर्करोगांवर यशस्वी उपचार शक्य आहेत.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;'अशा' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सामान्यतः 25 ते 65 वयोगटातील महिलांमध्ये स्तन कर्करोग आढळून येतो. स्तनात गाठ, स्तनांच्या आकारात बदल किंवा स्तनाग्रातून स्त्राव अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. गर्भाशय मुखाच्या कर्करोगात असामान्य रक्तस्राव दिसून येऊ शकतो. अंडाशयाच्या कर्करोगाची लक्षणे सुरुवातीला ओळखणे कठीण असते, मात्र पोट फुगणे, पोटदुखी किंवा लवकर पोट भरल्यासारखे वाटणे या अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. गर्भाशयाच्या कर्करोगात अनियमित रक्तस्त्राव किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारा रक्तस्राव गंभीर असू शकतो. महिलांनी असामान्य वेदना, रक्तस्राव किंवा अचानक वजन कमी होणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मॅमोग्राफी, पॅप स्मीअर आणि पेल्विक तपासणी यांसारख्या नियमित तपासण्या करणे आवश्यक आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव कमी करण्यासाठी योगा व ध्यान यांचा अवलंब करावा तसेच धूम्रपान व मद्यपानाचे सेवन टाळावे&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी...&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तज्ज्ञ सांगतात... कितीही व्यस्त जीवनशैली असली तरी महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी पुरेसा वेळ काढणे गरजेचे आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास कर्करोगावरही मात करता येते आणि निरोगी जीवन जगता येऊ शकते.&lt;/p&gt;
&lt;p class=&quot;pf0&quot;&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;&lt;span class=&quot;cf1&quot;&gt;हेही वाचा :&lt;/span&gt;&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;h3 class=&quot;abp-article-title&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/lifestyle/health/health-tips-risk-of-heart-disease-rising-due-to-changing-lifestyles-lack-of-awareness-regarding-bypass-surgery-marathi-news-1420433&quot;&gt;Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका; बायपास शस्त्रक्रियेबाबत जागरूकतेचा अभाव&amp;nbsp;&lt;/a&gt;&lt;/h3&gt;
&lt;p&gt;&lt;em&gt;&lt;strong&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/11/9bdc21ee23e9ef40b0c245c3cf04b3e11778484242792381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[Mother's Day 2026 Wishes: आईच्या चरणी वसते चारधाम! मातृदिनानिमित्त मराठमोळ्या हटके शुभेच्छा देऊन आईला द्या सरप्राईझ, चेहऱ्यावर फुलवा गोड हसू..]]></title><link>https://marathi.abplive.com/astro/mothers-day-2026-wishes-in-marathi-happy-mothers-day-marathi-news-surprise-your-mother-with-these-marathi-style-greetings-on-mothers-day-and-put-a-sweet-smile-on-her-face-1423443</link><comments>https://marathi.abplive.com/astro/mothers-day-2026-wishes-in-marathi-happy-mothers-day-marathi-news-surprise-your-mother-with-these-marathi-style-greetings-on-mothers-day-and-put-a-sweet-smile-on-her-face-1423443#respond</comments><pubDate>Sun, 10 May 2026 07:06:23 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ एबीपी माझा वेब टीम ]]></dc:creator><category><![CDATA[ भविष्य ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/astro/mothers-day-2026-wishes-in-marathi-happy-mothers-day-marathi-news-surprise-your-mother-with-these-marathi-style-greetings-on-mothers-day-and-put-a-sweet-smile-on-her-face-1423443</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Mother's Day 2025 Wishes In Marathi&lt;/strong&gt;: आई नेहमी सुखी राहावी, हीच राहील इच्छा....मातृदिन हा प्रेम, माया, त्याग आणि निस्वार्थ सेवेला वंदन करणारा एक विशेष दिवस आहे. आई ही आपल्यासाठी पहिली गुरू, पहिली मैत्रीण आणि पहिला आधार असते. तिच्या मायेची उब, तिच्या शब्दांतली शक्ती आणि तिच्या हातांनी मिळणाऱ्या आशीर्वादाची सर कोणालाही नाही. आज, 10 मे 2026 रोजी 'मातृदिन' साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी, तुमच्या आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी काही खास संदेश खूप महत्वाचे आहेत. जे तुम्ही तुमच्या आईला पाठवून हा विशेष दिन साजरा करू शकता...हे मराठमोळे संदेश पाठवून तुमच्या आईला सरप्राईझ द्या. तिच्या चेहऱ्यावर हसू फुलवा...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आईच्या चरणी वसते चारधाम,&lt;br /&gt;आईचं नाव घेताच लागतो चिंतेला पूर्णविराम.&lt;br /&gt;जिंकलो मी, तू दिलीस मायेंची थाप,&lt;br /&gt;आई तुझ्या प्रेमाला नाही मोजमाप.&lt;br /&gt;माझ्या प्रेमळ आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आई म्हणजे माया, आई म्हणजे छाया,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तिच्या कुशीतच सापडते खरी सुखमाया&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुला मातृदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा आई.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आई आहे म्हणूनच आहे जीवन रंगीबेरंगी,&lt;br /&gt;तिच्या मायेची गोडी आहे सर्वांहून मोठी अनंती.&lt;br /&gt;दुःखात सुद्धा ती असते आनंदाचा किरण,&lt;br /&gt;आईच्या शब्दात असतो सुखाचा दरवळणं.&lt;br /&gt;मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;थकून आलो घरी तेव्हा तुझ्या कुशीत मिळतो विसावा,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईच्या कर्तृत्वाचा साजरा करणारा फक्त एकच दिवस नसावा.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुझ्यामुळे आई, होते आनंदाचे आगमन,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईच्या कीर्तीचा साजरा करूया सण.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई.&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;आईचं हसू म्हणजे आयुष्याचा साज,&lt;br /&gt;तिच्याशिवाय अधुरं वाटतं प्रत्येक आज.&lt;br /&gt;आईविना जीवन असते नीरस,&lt;br /&gt;आनंदाने साजरा करू मातृत्वाचा दिवस.&lt;br /&gt;मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;निस्वार्थपणे आई करते बाळावर माया,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आयुष्यभर असते तिची आपल्यावर छाया.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;अश्या या प्रेमळ आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;प्रार्थना आहे सदा हसत राहावी आपली माऊली,&lt;br /&gt;आहे जिची आपल्यावर प्रेमाची सावली.&lt;br /&gt;आई म्हणजे आनंदाचं झाड,&lt;br /&gt;जिचं सावलीतच मिळतो सुखाचा गंध-वाद.&lt;br /&gt;तेच लागली लेकराला की अश्रू तिचे ओघळतात,&lt;br /&gt;तेव्हा तिच्यात ३३ कोटी देव झळकतात.&lt;br /&gt;माझ्या आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आई असते आपली जीवाभावाची सखी,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;उदास असेल ती, की होते दुखी। मिळो कितीही प्रेम जगाकडून,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईच्या मायेची सर कशालाच नाही कुणा ठिकाणून.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;हसरा चेहरा बघून तिचा, होतो मनाला हर्ष,&lt;br /&gt;तिचं प्रेम करते मनाला स्पर्श.&lt;br /&gt;तिच्या स्पर्शाने मिटतात साऱ्या व्यथा,&lt;br /&gt;आई म्हणजे देवतेची प्रचीती.&lt;br /&gt;अश्या माझ्या निर्मळ आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;आई जाणवते फुलांच्या सुगंधासारखी,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;त्या गंधाने मन होते बेधुंद जशी.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईची आठवण म्हणजे हृदयाचा उत्सव,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जिच्यासोबत प्रत्येक क्षण बनतो सोनेरी पर्व।&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;br /&gt;आई नेहमी सुखी राहावी, हीच राहील इच्छा,&lt;br /&gt;तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;सुखी जीवनाचं रहस्य&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईच्या चेहऱ्यावर उमलणारं हास्य!&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आई हीच खरी संपत्ती,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जिच्यामुळे मिळते आपुलकीची ओलसर सत्ती।&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तिचं न बोलता समजणं म्हणजे प्रेमाचं खरं रूप,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईच्या मूक आशीर्वादानेच घडतो जीवनाचा स्वरूप।&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;जिच्या कृपेने मिळालं हे जीवन,&lt;br /&gt;त्या माऊलीला या मातृदिनाच्या निमित्य शतदा नमन।&lt;br /&gt;आई म्हणजे जीवनाची गोड साद,&lt;br /&gt;तिच्या प्रेमात दडलाय सुखाचा उगमवाद.&lt;br /&gt;मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;तुझ्या आशीर्वादाने घेतो मी यशाची उंच भरारी,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तू देवी आहेस, नाहीस सामान्य नारी.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;माझ्या जीवनातल्या अनमोल व्यक्तीस मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कष्टाने जमतं तुला नातं जपणं,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मन सुखावतं तुझं खळखळून हसणं.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;माझ्या जीवनातल्या अनमोल व्यक्तीला माझ्या कळून मातृदिनाच्या अनमोल शुभेच्छा..&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;आईचा स्पर्श जसा फुलांचा गंध,&lt;br /&gt;तिच्या मायेपुढे साऱ्या जगाचा मंद.&lt;br /&gt;या मातृदिनी तुला मी नमन करते...&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;जीवनाच्या वाटेवर मायेची साथ, आई असते आपली खरी ओळख, खरी बात.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आईच्या कुशीत मिळतो विसावा,&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तिच्या हास्याने उजळतो दाराचा उजेड सारा.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तुला मातृदिन निमित्त हार्दिक शुभेच्छा आई...&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;तिचं प्रेम निरपेक्ष, तिचं हसणं खास,&lt;br /&gt;आईशिवाय अपूर्ण वाटतो प्रत्येक श्वास.&amp;nbsp;&lt;br /&gt;माझ्या जीवनातील विशेष व्यक्ती म्हणजे माझी आई&amp;nbsp;&lt;br /&gt;तिला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा....&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;हेही वाचा&lt;/strong&gt;&lt;/p&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a href=&quot;https://marathi.abplive.com/astro/horoscope-today-10-may-2026-sunday-aajche-rashi-bhavishya-astrological-prediction-12-zodiac-signs-astrological-marathi-news-1423440&quot;&gt;Horoscope Today 10 May 2026: आज मातृदिनचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने आयुष्यात मोठे वळण, आजचे सविस्तर राशीभविष्य&lt;/a&gt;&lt;/h4&gt;
&lt;h4 class=&quot;abp-article-title&quot; style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;&lt;em&gt;(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;/h4&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/10/83cb6718f48d74c73d0d5c694eed42ef1778376960174381_original.jpg" width="220"/></item><item><title><![CDATA[धक्कादायक! आंबेगावमध्ये कांद्याची काढणी करताना अचानक महिलेचा मृत्यू, उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज ]]></title><link>https://marathi.abplive.com/news/pune/pune-heat-news-heatstroke-woman-dies-suddenly-while-harvesting-onions-in-ambegaon-death-suspected-to-be-due-to-heatstroke-1423399</link><comments>https://marathi.abplive.com/news/pune/pune-heat-news-heatstroke-woman-dies-suddenly-while-harvesting-onions-in-ambegaon-death-suspected-to-be-due-to-heatstroke-1423399#respond</comments><pubDate>Sat, 9 May 2026 17:04:46 +0530 </pubDate><dc:creator><![CDATA[ नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड ]]></dc:creator><category><![CDATA[ पुणे ]]></category><guid isPermaLink="true">https://marathi.abplive.com/news/pune/pune-heat-news-heatstroke-woman-dies-suddenly-while-harvesting-onions-in-ambegaon-death-suspected-to-be-due-to-heatstroke-1423399</guid><description><![CDATA[&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;Pune Heat News :&lt;/strong&gt; राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्याच्या बहुतांश भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी उष्माघातामुळं मृत्यू झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घडली आहे. एका महिलेचा मृत्यू झाला आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.&amp;nbsp;&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;a title=&quot;पुणे&quot; href=&quot;https://marathi.abplive.com/news/pune&quot; data-type=&quot;interlinkingkeywords&quot;&gt;पुणे&lt;/a&gt; जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघाताने महिलेचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. शेतात कांदे काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नकुशा बाळू सुपे, वय 33 वर्षे, या मूळच्या खेड तालुक्यातील वाडा-सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या सध्या कांदा काढणीच्या कामानिमित्त आमोंडी येथे आल्या होत्या. कांदा काढणी करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. यानंतर सोबतच्या कामगारांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर सदर महिलेला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.&lt;/p&gt;
&lt;h2 style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&lt;strong&gt;नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, प्रशासनाकडून आवाहन&lt;/strong&gt;&lt;/h2&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;या अचानक घडलेल्या घटनेमुळे सुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हात काम करणाऱ्यांनी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.&lt;/p&gt;
&lt;p style=&quot;text-align: justify;&quot;&gt;&amp;nbsp;&lt;/p&gt;]]></description><slash:comments>0</slash:comments><media:thumbnail url="https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2026/05/09/165222c247b5de64d5c354ea738a4a121778325281417339_original.JPG" width="220"/></item></channel></rss>