Vishal Dadlani on Sonam Wangchuk: शिक्षणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. 20 जूननंतर जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचा आंदोलनात ते सहभागी झाले होते. नीट परीक्षेच्या सरकारच्या भोंगळ कारभाराविरोधात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी आता चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांसह सेलिब्रेटी, राजकीय नेते, स्टॅन्ड अप कॉमेडियन्स, गायक मनोरंजन सृष्टीतील दिग्गज लोक सोनम वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचा आवाहन करत आहेत.

Continues below advertisement

दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारच्या निष्क्रियतेबाबत चिंता व्यक्त केली असून सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहे. दरम्यान, नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, झीनत अमान, स्वरा भास्कर, अनुराग कश्यप ,अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, हेमंत ढोमे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दर्शवलाय. दरम्यान, बॉलीवूडचा लोकप्रिय गायक विशाल दादलानी (Vishal Dadlani) यांनीही सोनम वांगचुक यांच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. अमेरिका दौऱ्यावर असल्यामुळे आंदोलनात येऊ शकलो नसल्याचं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना उपोषण थांबवण्याचा आवाहन केलं. हा व्हिडिओ सोनम वांगचुक यांच्यापर्यंत पोहोचवा असंही त्यांनी म्हटलं. विशाल दादलानी यांच्या या व्हिडिओची सध्या चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले विशाल दादलानी?

बॉलीवूड गायक विशाल दादलानी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांनी तिथून एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपले instagram अकाउंट ला शेअर केलाय. ते म्हणाले 'मी हा व्हिडिओ त्या सर्वांसाठी बनवतोय जे सध्या जंतर-मंतरवर आपल्या देशासाठी लढत आहे.मी सध्या तुमच्यासोबत नाही कारण मी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.पण माझं मन तिथेच आहे आणि हे तुम्हाला माहित आहे. .कृपया हा व्हिडिओ सोनम वांगचुकजींपर्यंत पोहोचवा.आणि त्यांना सांगा की मी त्यांच्यासोबत तिथे उपस्थित राहू शकत नाही याबद्दल मला माफ करा.जर मी भारतात असलो असतो तर मी नक्की तिथेच असतो.'

Continues below advertisement

विशाल पुढे म्हणाले 'तुम्ही लोक एक चांगला लढा देत आहात. माझी एकच इच्छा आहे की त्यांना काहीही होऊ नये.मी त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करतो.मी सरकारला विनंती करतो की त्यांनी त्यांचं म्हणणे ऐकून घ्यावे.त्यांच्या हक्काबाबत कोणीही युक्तिवाद करत नाही.हा सरकार बदलण्याचा प्रश्न नाही, तर विद्यार्थ्यांच्या हक्काचा, त्यांच्या भविष्याचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे.मी सरकारला विनंती करतो की कृपया त्यांनी लोकांचा आवाज ऐकावा.