Bigg Boss Marathi Season 5 : आर्याने घरात हिंसा केल्यानंतर बिग बॉसने (Bigg Boss Marathi New Season) तिची घरातून हकालपट्टी केली. त्यामुळे या आठवड्यात आर्याला घरातून बाहेर पडावं लागलं. असं असलं तरीही घरात या आठवड्यातील एलिमिनेशनची प्रक्रिया पार पडली. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी  अभिजीत, वर्षा, निक्की, अंकिता आणि वैभव हे सदस्य नॉमिनेट होते. या सदस्यांनी वैभव चव्हाणचा (Vaibhav Chavan) प्रवास संपला असून तो या आठवड्यात घराबाहेर पडला आहे. 


वैभवला पहिल्या आठवड्यापासून अरबाजची सावली प्रेक्षक म्हणत होते. तसेच रितेश भाऊंनीही त्याला वारंवार स्वत:चा खेळ खेळा असं सांगतही होते. पण तराही प्रेक्षकांना वैभवचा खेळ कधी दिसलाच नसल्याचंही म्हटलं जातंय. त्यामुळे आता वैभवला घराचा निरोप घ्यावा लागला असल्याचं पाहायला मिळतंय.                                                                    


हे सदस्य आतापर्यंत घराबाहेर


दरम्यान आतापर्यंत पुरुषोत्तम दादा पाटील, निखिल दामले, योगिता चव्हाण, इराना रुडाकोव्हा, घन:श्याम दरोडे, आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर पडले आहेत. त्यानंतर आता वैभवनेही घराचा निरोप घेतलाय. 


बिग बॉसने केली आर्याची हकालपट्टी 


निक्कीच्या कानशिलात लगावल्यामुळे आर्याने बिग बॉसच्या मूलभूत नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे बिग बॉसने तिला घराबाहेर काढण्याची शिक्षा दिली.  भाऊच्या धक्क्यावर अंतिम निर्णय घेताना बिग बॉसने म्हटलं की, 'कॅप्टन्सी कार्यातलं फुटेज वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं की, आर्या निक्कीमध्ये धक्काबुक्की झाली. निक्कीचा आर्याला धक्का लागला आणि आर्याने हात उचलला.  आर्याने केलंल कृत्य बिग बॉसच्या मुलभूत नियमांचं उल्लंघन. बिग बॉसच्या घरात या हिंसेचं समर्थन कधीच केलं जाणार नाही', असं म्हणत बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढलं आहे. 






ही बातमी वाचा : 


Prasad Oak : अन् मुख्यमंत्री दीड तासात माझ्या घरी पोहोचले; प्रसाद ओकने सांगितला 'वास्तुशांती'च्या भेटीचा किस्सा