Indrayani Colours Marathi Serial Track: इंदू खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश कसा करणार? सानिका-सरकार कसं करणार आव्हानं पार? 'महाशिवरात्री'निमित्त विशेष भाग!
Indrayani Colours Marathi Serial Track: इंद्रायणी खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश कशी करणार? सरकार सानिकाच्या हाताला यश येणार? 'महाशिवरात्री'निमित्त कलर्स मराठीवर विशेष भाग...

Indrayani Colours Marathi Serial Track: 'इंद्रायणी' मालिकेत महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कथानकात नवं वळण येणार आहे. इंद्रायणीचे काका-काकू खरे नसून ते फसवे असल्याचं समजताच ते इंदूला धमकी देतात की, जर तिनं हे सत्य कोणालाही सांगितलं तर अदूच्या जीवाला धोका होईल. यामुळे इंद्रायणी संभ्रमात पडते आणि या परिस्थितीत इंद्रायणी गपचूप गोपाळ समोर सत्य आणण्याची योजना आखते. महाशिवरात्रीचा दिवस उगवतो. इंदूला काका-काकूंकडून महाशिवरात्रीच्या कीर्तनाची परवानगी मिळते. कीर्तनाच्या वेळी ती 'पुत्रणा मावशीचे कीर्तन' सादर करत असताना गोपाळला काका-काकू खरे नसल्याचे संकेत देते. आता यामुळे इंद्रायणी खोट्या काका-काकूंचा पर्दाफाश कशी करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
View this post on Instagram
लय आवडतेस तू मला मालिकेत सरकार - सानिकाचा कळशी गावातील गावकऱ्यांसोबतच लढा सुरुच आहे. साहेबरावांनी साखर कारखाना बंद केल्यानंतर कळशीगाव बेरोजगारीसाठी सानिका आणि सरकारला जबाबदार धरतं. मात्र, या विरोधातही सानिका हार मानत नाही. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ती एक नवा मार्ग शोधते आणि तो म्हणजे 'चहाचा गूळ' तयार करण्याचा. मात्र, गावकरी तिच्या कल्पनेला अशक्य मानून तिची खिल्ली उडवतात. सानिका आव्हान स्वीकारून स्वतः गूळ बनवून दाखवण्याचा निर्धार करते.
दरम्यान, सरकारदेखील महादेवाची कृपा मिळवण्यासाठी कठोर व्रत करताना दिसणार आहे. सानिकाच्या अथक प्रयत्नांना यश मिळावे, म्हणून सरकार प्राचीन महादेव मंदिरातील शिवलिंगावर 101 वेळा नदीचे पाणी वाहण्याचा संकल्प करतो. एकीकडे सानिका गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि बेरोजगारी मिटवण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे सरकार तिला यश मिळावे यासाठी झुंजतो आहे. एकाला यश पाहिजे, तर दुसऱ्याला देवाचा आशीर्वाद. आता बघूया पुढे मालिकेत काय घडणार? महादेवाच्या आशीर्वादाने सानिका - सरकार कसे हे आव्हानं पार करणार.
यावर बोलताना तन्मय जक्का म्हणाला, "हा सीन चित्रीत करताना खूप आव्हानात्मक अनुभव होता. रणरणत्या उन्हात आम्ही हा सिन शूट केला... जवळपास 3-4 तास लागले, तीव्र उन्हामुळे चटके तर लागतच होते पण पाय खरंच पोळले होते आणि 101 फेऱ्या पूर्ण केल्यासारखं वाटलं. पण त्यानिमित्तानं महादेवाची सेवा करण्याची संधी मिळाली, हे विशेष वाटतं. दरम्यान, उष्णतेमुळे थोडं कठीण झालं पण टीमनं त्वरित काळजी घेतली. अशा सीनसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा असतो, कारण शारीरिक आणि मानसिक तग धरावा लागतो,"
दरम्यान, कलर्स मराठीवरील (Colours Marathi) इंद्रायणी (Indrayani) आणि लय आवडतेस तू मला (Lai Avadtes Tu Mala) मालिकांचे महाशिवरात्री विशेष भाग 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























