Son Of Sardaar 2 Actress Roshni Walia: 'सन ऑफ सरदार 2'मध्ये (Son Of Sardaar 2) साबाची भूमिका साकारणारी रोशनी वालिया तशी बालपणापासूनच सीरिअल्समध्ये काम करतेय.  रोशनी वालियानं (Roshni Walia) चाईल्ड अॅक्ट्रेस म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. तिनं 'बालिका वधू'मध्ये गंगाच्या बालपणीची भूमिका साकारली. तिनं 'देवों के देव महादेव'मध्ये  सीतेची भूमिका साकारली आणि महाराणा प्रतापमध्ये अजबदे पनवारची भूमिका साकारली. रोशनी वालिया 7 वर्षांची असताना मुंबईत आली. तिची आई सिंगल मदर असून मोठ्या लाडाकोडात तिला वाढवल्याचं रोशनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं. माझी आई नाही, तर मैत्रीण आहे, असं रोशनी वालिया सांगते. तसेच, मी आईशी कधीच खोटं बोलत नाही, असंही रोशनी वालिया सांगते. 

आईशी कधीच खोटं बोलत नाही : रोशनी वालिया 

रोशनी वालिया हॉटरफ्लायच्या 'द मेल फेमिनिस्ट' पॉडकास्टवर होती. ती सांगत होती की, तिच्या आईनं कधीही कठोरपणा दाखवला नाही. रोशनी म्हणाली की, मी माझ्या आईशी कधीच खोटं बोलले नाही. मग ते मुलाला भेटणं असो किंवा त्याला घरी बोलावणं असो. मला वाटतं की, शिस्तीत वाढलेली मुलं जास्त बिघडलेली असतात. रोशनी म्हणाली की, मीच नाहीतर, माझ्या मैत्रिणीही माझ्या आईसोबत खूप एन्जॉय करतात. ते तिला आँटीही म्हणत नाहीत, तर स्वीटी म्हणतात.

"काय करायचंय ते कर, पण प्रोटेक्शन यूज कर..."

रोशनीला विचारलं गेलं की, अशा 3 गोष्टी सांग की, कुणालाच विश्वास बसणार नाही, ज्या तू तुझ्या आईला सांगितल्यात. यावर बोलताना रोशनीनं सांगितलं की, "माझ्या आईनं नेहमी मला सांगितलं की, प्रोटेक्शन यूज कर... काहीही करत असशील तरी प्रोटेक्शन यूज कर... भारतीय घरांमध्ये अजूनही या गोष्टी फार नव्या आहेत... माझ्याही पेक्षा माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलंय... मी तर तेव्हा फार लहान होते. आता मोठी झालीय... तिला नेहमी सांगितलंय..." 

आई सांगते, पार्ट्या कर 

रोशनीनं सांगितलं की, तिची आई स्वतः तिला सांगते की, ती घरी खूप राहते, थोडी बाहेर जात जा... आई म्हणते, 'बाहेर जा, पार्टी कर, मजा कर.' ती विचारते, आज दारू पिऊन आली नाहीस का? रोशनी म्हणाली की, ती पंजाबी आहे म्हणून हे सामान्य आहे.

वयाच्या सातव्या वर्षी पहिली जाहिरात मिळाली

रोशनी म्हणाली की, ती जे काही आहे, ते तिच्या आईमुळे आहे. तिनं आम्हाला फोन घेण्यासाठी तिचं सोनं विकलं. रोशनी सांगते की, ती तिच्या मुलांसाठी अलाहाबादहून मुंबईला शिफ्ट झाली. अलाहाबादमधील 1000 रुपये म्हणजे, मुंबईतील 100 रुपयांच्या बरोबरीचे आहेत. इथे खूप खर्च येतो. 

रोशनी म्हणाली की, तिचे पालक घटस्फोटित आहेत. आई तिच्या मुलींना अलाहाबादहून मुंबईत घेऊन आली आणि तिचं आयुष्य इथेच बदलले. रोशनी सातव्या वर्षी कुटुंबाच्या सुट्टीसाठी मुंबईत आली. त्यानंतर तिनं एका जाहिरातीसाठी ऑडिशन दिलं. ती त्याबद्दल फार सीरिअस नव्हती, पण तिची निवड झाली.