दिग्दर्शकाला संपूर्ण सिनेमात किंग खानला स्कर्टमध्ये दाखवायचं होतं, शाहरुख प्रतिक्रिया देताना म्हणाला होता की...
Shah Rukh Khan : दिग्दर्शकाला संपूर्ण सिनेमात किंग खानला स्कर्टमध्ये दाखवायचं होतं, शाहरुख प्रतिक्रिया देताना म्हणाला होता की...

Shah Rukh Khan : अभिनेता शाहरुख खान याने शून्यातून येऊन स्वत:ला सिद्ध करणाचं काम करुन दाखवलं होतं. 90 च्या दशकापासून आजपर्यंत शाहरुखने अनेक हिट सिनेमे केले. रोमँटिक, अॅक्शन आणि कॉमेडी सर्व प्रकारच्या सिनेमांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका केल्या. मात्र, गेल्या काही वर्षात त्याचे सिनेमे फ्लॉप होत होते. मात्र, 2024 साली आलेल्या पठाण, जवान आणि डंकी या सिनेमांनी शाहरुखने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली. शाहरुखच्या या सिनेमांना पुन्हा एकदा मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, शाहरुख पुन्हा एकदा एका किस्स्यामुळे चर्चेत आलाय.
जेव्हा शाहरुखला संपूर्ण सिनेमात स्कर्ट घालावी लागणार होती
अभिनेता शाहरुख खान म्हणाला, "काही वर्षांपूर्वी, मी घरी बसलो होतो, आणि करण जोहर माझ्या घरी एक स्टोरी घेऊन आला. मी स्टोरीचे नाव सांगणार नाही, पण मला संपूर्ण चित्रपटात स्कर्ट घालणे आवश्यक होते. खरंतर, तोच एकमेव वेळ होता जेव्हा मला मागे हटायचे होते. मला वाटलं, असं काही होणार नाही यार." शाहरुख पुढे म्हणाला, "हा त्या जुन्या चित्रपटांपैकी एक होता ज्यामध्ये पुरुष स्कर्ट घालायचे. पण 'पुरुष' स्कर्ट घालायचे. माझ्यासारखा माणूस नाही!"
शाहरुख खानने पुढे सांगितले की तो त्याच्या चित्रपटांच्या अपयशाला किती गांभीर्याने घेतो आणि त्याने कबूल केले की इंडस्ट्रीमध्ये अनेक दशकं काम केल्यानंतरही त्याचा त्याच्यावर परिणाम होतो. तो म्हणाला, "जेव्हा जेव्हा मी अपयशी ठरतो तेव्हा मला दुप्पट अपराधी वाटते. कारण मला वाटते की मी इतक्या लोकांना निराश केले आहे. जगभरातील लोकांना निराश केल्याबद्दल मला वाईट वाटते."
शाहरुख पुढे म्हणाला की, मला माहित आहे की, जगभरातील चाहते गेल्या 35 वर्षांपासून त्याचे चित्रपट आनंद आणि मनोरंजनासाठी पाहत आहेत. जेव्हा एखादा चित्रपट यशस्वी होत नाही तेव्हा मला असे वाटते की मी माझ्या चाहत्यांच्या विश्वासाचा अनादर केला आहे."
किंग खान पुढे म्हणाला, "सिनेम फ्लॉप झाल्यानंतर मग माझ्याकडे एक पद्धत आहे. मी दोन दिवस बाथरूममध्ये रडतो आणि दुःखी आणि नैराश्यग्रस्त असतो, पण बस्स. मला कधीच वाटले नाही की 'मी आता हरलो आहे'. जेव्हा मी अपयशी ठरतो तेव्हा मला दुःख आणि राग यासारख्या भावना येतात, पण मी कधीही हार मानत नाही. मी पराभवाला माझ्यावर मात करू देत नाही. मी हरतो, मी पडतो, पण नंतर मी परत उडी मारतो. मला वाईट वाटतंय, पण मी कधीही हार मानत नाही."
इतर महत्त्वाच्या बातम्या
चित्रा वाघ यांच्यानंतर आता रुपाली चाकणकर आक्रमक, उल्लू ॲपवरील अश्लिल 'हाऊस अरेस्ट'वर बंदीची मागणी!























