Nagraj manjule on Sairat part 2 Interview: 2016 साली रिलीज झालेल्या 'सैराट' (Sairat) या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश:  भुरळ घातली.  या सिनेमाने केवळ महाराष्ट्र नाही तर, भारत आणि विदेशातही डंका गाजवला (Entertainment). हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी सिनेमा ठरला.  आजही हा सिनेमा आवर्जून पाहिला जातो.  या सिनेमातील पात्रांना विशेष पसंती मिळाली. विशेष म्हणजे 'आर्ची आणि परशा' ही जोडी तुफान गाजली.   रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.  या सिनेमातून समाजातील कटू सत्य आणि हॅपी एन्डिंग नसणारी प्रेम कथा दाखवण्यात आली होती.  दरम्यान, 'सैराट' या सिनेमाचा रिमेक 'सैराट 2' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार का?  असे प्रश्न प्रेक्षक आणि चाहत्यांकडून उपस्थित केले जात आहे. दरम्यान, याच प्रश्नावर 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

'सैराट 2'बाबत नागराज मंजळेंचं मोठं वक्तव्य (Will Sairat 2 release) 

 नागराज मंजुळे सध्या 'खाशाबा' आणि 'फ्रेम' या दोन्ही सिनेमांमुळे चर्चेत आहे. 'खाशाबा'  हा सिनेमा 2027 रोजी  रिलीज होणार आहे. तर, 'फ्रेम' हा सिनेमा 10 जुलै रोजी रिलीज होणार आहे.  या सिनेमाच्या प्रमोशन निमित्त नागराज मंजुळे यांनी  'स्क्रीन'ला मुलाखत दिली होती.  या सिनेमात त्यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगितलं. यावेळी त्यांनी 'सैराट'चा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं.

'सैराट' या सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर 'सैराट' या सिनेमाच्या सिक्वेलच्या प्रतिक्षेत प्रेक्षकवर्ग आहे. 'सैराट'  या सिनेमाचा सिक्वेल येणार का? या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले, 'सैराट' या सिनेमाची स्टोरी लिहित असताना माझ्या मनात असा विचार आला होता  की,  सिनेमातून जसं प्रेमाचं जग दाखवलं जातं, ते खरंतर वास्तवापेक्षा थोडं वेगळं असतं. प्रेमात असताना खऱ्या आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो', असं नागराज मंजुळे म्हणाले.

Continues below advertisement

'मला यात ड्रामा आणण्याची गरज वाटली नाही.  या कारणास्तव मी वास्तव दाखवणारी गोष्ट दाखवली. खरंतर  या सिनेमाकडे कधीच  एक आव्हान म्हणून पाहिलेलं नाही.  या सिनेमातून जे मला  प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा होता, ते मी केलं', असं नागराज मंजुळे म्हणाले. 'बऱ्याच लव्ह स्टोरीमध्ये हॅपी एन्डिंग दाखवली जाते. परंतु, खऱ्या आयुष्यात दुर्लक्ष केलं जातं. वास्तव मांडणं हाच माझा खरा दृष्टीकोन होता', असंही नागराज यांनी मुलाखतीत स्पष्ट केलं.

'धडक 2'नंतर 'सैराट 2' येणार का? या प्रश्नावर नागराज मंजुळे म्हणाले, ''धडक'नंतर 'सैराट'  या सिनेमाचाही सिक्वेल आला पाहिजे, असं काही नाही. पण, जर चांगली स्टोरी असेल तर, 'सैराट 2' येईल', असं नागराज मंजुळे मुलाखतीत म्हणाले. 'आज अनेक जण 'फँड्री' या सिनेमाच्या सिक्वेलबाबतीत अनेक जण विचारतात. पण सध्या यावर कोणताही विचार केलेला नाही', असंही नागराज मंजुळेंनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, बजेट वसूल कमाई, 14 दिवसांत किती कोटींचा आकडा गाठला?