Sai TamhankarOn Marathi Award Functions: मराठी सिनेसृष्टीच्या (Marathi Film Industry) आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणारी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मराठमोळ्या सई ताम्हणकरनं (Marathi Actress
Sai Tamhankar) आजवर अनेक मराठी (Marathi Movie) आणि त्यासोबतच हिंदी सिनेमांमध्ये (Hindi Cinema) काम केलं आहे. ग्लॅमरस आणि बोल्ड अशी सई या ना त्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. सईने मालिकांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिनं थेट सिनेमांमध्ये एन्ट्री घेतली. आजवर तिनं अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण, 2013 मध्ये आलेल्या 'दुनियादारी' या सिनेमानं तिला वेगळी ओळख मिळवून दिली. 

आपल्या आजवरच्या करिअरमध्ये सईनं अनेक सिनेमे केले. त्यासोबतच अनेक विषयांवर सई आपलं मत अगदी निर्भिडपणे आपलं मत मांडताना दिसलीय. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आणखी एका मुद्द्याला हात घातला आहे. तो मुद्दा म्हणजे, मराठी पुरस्कार सोहळ्यांमध्ये अमराठी कलाकारांना आमंत्रित करुन त्यांना दिलं जाणारं प्राधान्य... तसेच अमराठी सेलिब्रिटींच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील दिग्गजांचा अपमान करतोय का? असा प्रश्नही तिनं उपस्थित केला आहे. सई ताम्हणकरनं नुकतीच 'विषय खोल' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना सईनं एकीकडे मराठीचा आग्रह आणि दुसरीकडे अमराठी कलाकारांना प्राधान्य हा मुद्दा परखडपणे मांडला.  

Continues below advertisement

Continues below advertisement

सई ताम्हणकर नेमकं काय म्हणाली? 

सई ताम्हणकर म्हणाली की, "आपण म्हणतो की मराठी बोला, मराठीसाठी आग्रह धरतो, पण, दुसरीकडे अनेकदा आपण पाहतो की, आजकाल पुरस्कार सोहळ्यांना इतर सिनेसृष्टीतील (अमराठी) कलाकारांना आमंत्रित केलं जातं. मात्र, या प्रक्रियेत एक मोठी विसंगती दिसून येते. अमराठी कोणी आर्टिस्ट आले की त्यांना आपण पहिल्या रांगेत बसवतो आणि ज्या ज्येष्ठ कलाकारांनी 30-40 वर्ष काम केलं आहे, त्यांना या भव्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेकदा मागच्या रांगेत स्थान दिले जाते. हे मला अजिबात पटत नाही..."

पुढे बोलताना सई ताम्हणकर म्हणाली की, "मी समजू शकते की, तुमचा टीआरपी आणि फेस वॅल्यू, या सगळ्या गोष्टी समजून जरी घेतल्या तरी शेवटी तुम्ही एक मराठी अवॉर्ड फंक्शन करताय ना? आणि तुम्हीच म्हणता मराठी, मराठी, मराठी... शेवटी आपल्या बोलण्यातच विसंगती आहे. ती विसंगती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपल्यालाच आपण सेलिब्रेट करण्याची हिंमत येणार नाही..."

"टीआरपी वाढवण्यासाठी आणि सोहळ्याला 'ग्लॅमर' प्राप्त करून देण्यासाठी दुसऱ्या फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना अतोनात महत्त्व दिलं जातं. आज मागे बसलेले हेच ज्येष्ठ कलाकार एकेकाळी इतके लोकप्रिय होते की, त्यांच्या सिनेमाची तिकिटे 200-300 रुपयांत ब्लॅकनं विकली जायची. दुसऱ्या इंडस्ट्रीमधून आलेली लोक काहीतरी मोडकतोडक मराठी बोलणार ते आपण सेलिब्रेट करतो... आपण स्वतःला किती सेलिब्रेट करतोय आणि त्यात आपल्याला खरोखर आनंद मिळतोय का? हे पाहणं गरजेचं आहे...", असं सई ताम्हणकर म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Rajpal Yadav Cheque Bounce Case: अमिताभ बच्चनसोबत स्टेजवर येऊ दिलं नाही, माधव अग्रवालांचा इगो दुखावला अन् राजपाल यादवला जेलमध्ये जावं लागलं; नेमकं काय घडलं?