Rinku Rajguru Share Kedarnath Experience: नास्तिक असणारी रिंकू राजगुरू 'त्या' एका चमत्कारिक प्रसंगानं पूर्ण बदलली; म्हणाली, 'मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते. पण...'
Rinku Rajguru Share Kedarnath Experience: नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरून अध्यात्माबाबत वक्तव्य केलं आहे. रिंकूनं यावेळी बोलताना सर्वात आधी मी नास्तिक असल्याचंही अगदी स्पष्टपणे सांगून टाकलंय.

Rinku Rajguru Share Kedarnath Experience: 'सैराट' (Sairat) सिनेमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रिंकु राजगुरू (Actress Rinku Rajguru) उत्तम अभिनय आणि साधेपणासाठी ओळखली जाते. रिंकू राजगुरूनं 'सैराट' सिनेमातून अभिनेत्री म्हणून सिनेसृष्टीत पाऊल टाकलं आणि अल्पावधीतच तिनं मनोरंजनविश्वातल्या गुणी अभिनेत्रींच्या यादीत स्थान पटकावलं. ती नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असते. पण, सध्या रिंकू एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे, ते म्हणजे तिनं अध्यात्माबाबत केलेलं वक्तव्य. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरून अध्यात्माबाबत वक्तव्य केलं आहे. रिंकूनं यावेळी बोलताना सर्वात आधी मी नास्तिक असल्याचंही अगदी स्पष्टपणे सांगून टाकलं. त्यासोबतच एकदा केदारनाथला गेली असताना तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेनं तिचं आयुष्य संपूर्ण बदलवून टाकलं, असंही ती म्हणाली. मुलाखतीत पुढे बोलताना रिंकून आपला अनुभवही सांगितलाय.
अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आपला अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रिंकू राजगुरूनं ती केदारनाथला गेली असतानाचा किस्सा सांगितला. त्यावेळी रिंकू राजगुरू म्हणाली की, "मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते. पण आयुष्यात अशा काही घटना घडल्या की, मी अध्यात्माकडे वळले. केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. मग मी उपवास वगैरे करत गेले आणि मला त्याचे काही अनुभवही आले. खरंतर मी आता खूप त्या गोष्टींकडे वळले. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव यामागे वैज्ञानिक कारणंसुद्धा आहेत. पण, एक कुठली तरी शक्ती आहे, जी तुम्हाला खेचते. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हाच आपण त्या गोष्टी करतो किंवा मानायला लागतो. माझ्याबाबतीतही असंच झालं. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आणि मग मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटलं की आता इथेच एक ती आशा आहे आणि शांतता आहे. मला घरात सकाळी देवपूजा, जप करायला आवडतं. त्यामुळे मी स्वत:साठी ते करते".
View this post on Instagram
पुढे बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली की, "मी गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी चालत केदारनाथला गेले होते. खूप थकले होते आणि पायही दुखत होते. दर्शन झाल्यावर मला वाटलं की, परतीच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर मिळावं, कारण दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईट होती. पण दोन-तीन तास वाट बघूनही हेलिकॉप्टर मिळेना. आम्हाला एक माणूस म्हणाला की, हेलिकॉप्टर मिळेल, आम्ही दोन-तीन तास थांबलो. वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की, मला हेलिकॉप्टर मिळूदे. मी माझ्या कुटुंबासह दर्शनाला येईन. नंतर एक माणूस आला आणि म्हणाला की, आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. तेव्हा मी खूप रडत होते... चिडलेले..."
"त्या त्रासात मी देवाला म्हणाले की, 'हा काय देव आहे… काय ऐकतोय का… हेलिकॉप्टर पाहिजे म्हणाले, पण तेही करत नाहीय…' असं बोलत-बोलत पुढे जात होते, तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्यानं हेलिकॉप्टरबद्दल विचारलं. तो म्हणाला फक्त दोनच सीट आहेत. त्यानंतर मी आनंदात पळत पळत जात होते आणि इतक्यात जोरात पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं की, मी आता पुढे कधीच काहीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथेच शिक्षा मिळाली. आता हे कसं झालं काय झालं माहीत नाही. कारण खूप लोक वाट बघत होते आणि त्यापैकी फक्त आम्ही दोघीच त्या हेलिकॉप्टरमधून गेलो. म्हणून माझा विश्वास बसला की, ती एक शक्ती आहे...", असं रिंकूनं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही.. रिंकू राजगुरूने रिलेशनशिपविषयी सांगून टाकलं, सगळेच शॉक
























