Pakistani Celebs Instagram Account Ban: भारतातील पाकिस्तानी (India Pakistan Disput) सेलिब्रिटींच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack), भारत सरकारनं (Government of India) कारवाई केली आणि भारतीय युजर्ससाठी मोठ्या पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर बंदी (Pakistani Artists' Instagram Accounts Banned) घालण्यात आली आहे. या यादीत हानिया आमिरपासून (Hania Aamir) ते इम्रान अब्बासपर्यंतच्या (Imran Abbas) सेलिब्रिटींची नावं आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काही दहशतवाद्यांनी तब्बल 28 पर्यटकांना जीवे मारलं. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आणि आम्हाला बदला हवाय अशी मागणी केली जाऊ लागली. तेव्हापासूनच पाकिस्तानविरोधात भारताकडून अनेक कठोर पावलं उचलली जात आहेत. भारत सरकार पाकिस्तानविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधू कराराला स्थगिती, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश, अटारी वाघा बॉर्डर बंद, पाकिस्तानी सिनेमांना बंदी, पाकिस्तानच्या सेलिब्रिटींना बंदी यांसारख्या निर्णयानंतर आता पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आले आहेत.
आता भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहेत, ज्यामुळे सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये मोठी घट झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, हानिया आमिर आणि माहिरा खान यांनीही पहलगाममधील हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. याव्यतिरिक्त फवाद खान याच्या सिनेमावरही भारत सरकारनं बंदी घातली होती
'भारतात अकाऊंट अवेलेबल...'
इन्स्टाग्रामवर या पाकिस्तानी कलाकारांचा युजर आयडी सर्च केला की, 'अकाऊंट भारतात उपलब्ध नाही, असं दिसतं. कारण आम्ही या कंटेंटवर बंदी घालण्याच्या कायदेशीर विनंतीचं पालन केलं आहे, असाही मजकूर दिसतो.
कोणत्या पाकिस्तानी सेलिब्रिटींचे अकाऊंट बॅन?
भारतात ज्या पाकिस्तानी कलाकारांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात लोकप्रिय अभिनेत्री हानिया आमिरचाही समावेश आहे. याशिवाय, रईस चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसलेली माहिरा खान, मॉम चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करणारी सजल अली आणि ऐ दिल है मुश्किलमध्ये दिसलेला इमरान अब्बास यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय अली जफरसह इतर अनेक अकाऊंटही सस्पेंड करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यावर हानिया आमिरची प्रतिक्रिया
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत हानिया आमिरनं इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'अलीकडील घटनांमुळे प्रभावित झालेल्या निष्पाप लोकांसोबत माझी संवेदना आहे. आपण सर्वजण वेदना, दु:ख आणि आशेत एकत्र आहोत. जेव्हा निष्पाप लोक आपले प्राण गमावतात तेव्हा ते दुःख फक्त त्यांचेच नसते, तर ते आपल्या सर्वांनाच जाणवतंय. आपण कुठूनही आलो तरी, दुःखाची भाषा एकच असते. आपण नेहमीच मानवतेची निवड केली पाहिजे.
याआधी भारत सरकारनं 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल देखील ब्लॉक केले होते. यामध्ये जिओ न्यूज, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि एआरवाय न्यूजसह अनेक पाकिस्तानी मीडिया साइट्स आणि चॅनेलचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पहलगाम हल्ल्यावर अलका कुबल यांचं रोखठोक भाष्य, म्हणाल्या, मोदी सरकार चांगलाच निर्णय घेईल पण...