Jai Jai Swami Samarth Colours Marathi Serial: कलर्स मराठीवरील (Colours Marathi) 'जय जय स्वामी समर्थ, नवा अध्याय - प्रारब्धाचा शिल्पकार ब्रह्मांडनायक' मालिकेत सध्या गौरीच्या आयुष्यातील भावनिक आणि संघर्षमय प्रवास उलगडताना दिसत आहे. स्वामींच्या कृपेनं मिळालेलं घर आणि मुलगी यमुना हेच गौरीचं सर्वस्व आहे. तिच्यासाठी हे घर केवळ वास्तू नसून स्वामींचा आशीर्वाद आणि तिच्या आयुष्यभराच्या कष्टांची साक्ष आहे. मात्र, आता याच घरावर संकटाची सावली पडू लागली आहे.                                                                                                       

Continues below advertisement

मौक्याच्या जागी असलेल्या गौरीच्या घरावर डोळा ठेवणारा यशवंत, ते मिळवण्यासाठी नवनवे डाव आखताना दिसत आहे. पैशांचे आमिष, दरारा, दमदाटी, जोर जबरदस्ती हे सगळे पैतरे त्याने वापरायला सुरुवात केली आहे. तरीही नकार मिळाल्यावर यशवंत वेगळाच कट आखतो आणि गौरीच्या मुलीचे यमुनाचे अपहरण करतो. दुसरीकडे मुलीच्या जीवाची चिंता आणि स्वतःच्या गंभीर आजारामुळे व्याकूळ झालेली गौरी आता प्रॉब्लेम्सच्या कोंडीत सापडते. घर की मुलगी असा पर्याय यशवंत गौरीसमोर ठेवतो. याने तिच्या घरावर आणि स्वप्नांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच गौरी स्वामींच्या चरणी धाव घेते आणि आपल्या घराचं तसेच मुलीच्या भविष्याचं रक्षण करण्यासाठी त्यांना आर्त साद घालते.                                                   

गौरीच्या विश्वासाची परीक्षा घेणाऱ्या या संकटातून तिला मार्ग मिळणार का? स्वामींचा आशीर्वाद रुपी घर आणि स्वतःच्या मुलीचा जीव गौरी वाचवू शकेल का? यशवंतचा डाव यशस्वी होणार की स्वामी आपल्या भक्ताच्या प्रारब्धाची लेखनी बदलणार? या प्रश्नांची उत्कंठावर्धक उत्तरं 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत पाहायला मिळतील. 

Continues below advertisement

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor Ramayana Clash With Rajinikanth Jailer 2: 4000 कोटींच्या 'रामायण'ची 'थलाइवा'शी टक्कर? दिवाळी 2026 ला बॉक्स ऑफिसवर 'महाक्लॅश', चाहत्यांची उत्सुकता शिगेला, तर निर्मात्यांना घाम फुटला

ABP Majha च्या बातम्या LIVE