Dhanashri Kadgaonkar Stuck Mumbai Pune Expressway Traffic: आठवडाभरापासून मुंबईसह (Mumbai Rains) संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain Updates) पावसानं धुमाकूळ घातलाय. राज्यभरात अनेक भागांत मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) भीषण पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक ठिकाणी तर जनजीवन विस्कळीत झालंय. पण, सोमवारी तर पावसानं सर्वांचीच झोप उडवली. रायगड, चिपळुणात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तर, मुंबईसह उपनगरांत सखल भागांत पाणी साचलेलं. तर, मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुण्याचा (Pune Rain) संपर्क तुटला. पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुद्धा पूर्णपणे ठप्प झाली आणि अनेकजण घाटातच अडकून पडले. खरं तर मुंबई-पुणे प्रवास (Mumbai-Pune Expressway) सुखकर होण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक 2 च्या प्रवेशद्वारावर सोमवारी पहाटे अचानक दरड कोसळल्यानं संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आलेली. जवळपास १०० टन ढिगारा पुलावर पडला होता. त्यामुळे अनेकजण अडकून पडलेले. त्यात एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीसुद्धा होती. तब्बल 9 तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मराठी अभिनेत्री (Marathi Actress) शूटसाठी मुंबईला पोहोचली. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्यासोबत एक पोस्टही लिहिलीय.  

Continues below advertisement

मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर नेमकं काय म्हणाली? (Dhanashri Kadgaonkar Stuck In Mumbai Pune Expressway Traffic)

मराठी अभिनेत्री धनश्री काडगांवकर म्हणाली की, "माझ्यासाठी, मी नेहमीच दुसऱ्या बाजूला असायचे, जसे की मुसळधार पाऊस, एखादा अपघात किंवा भूस्खलनामुळे द्रुतगती मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीच्या बातम्या पाहणं... पण काल ​​[6 जुलै 2026] मी स्वतः त्याचाच एक भाग होते... अशा प्रकारे 9 तास अडकून पडणं खूपच थकवणारं आणि निराशाजनक होतं..."

Continues below advertisement

पुढे बोलताना धनश्री काडगांवकर म्हणाली की, "मला मासिक पाळी आली होती, बाथरूमला जायची तीव्र इच्छा होती पण जाता येत नव्हतं... फूड कोर्टवर उतरायचं होतं आणि काहीतरी घ्यायचं होतं पण जमलं नाही...गुडघाभर पाणी साचलेलं, कुठे ओलं व्हा... आजारपण आत्ता परवडणारं नव्हतं , कारण खूप शूट लागलं होतं..."

"माझा ड्रायव्हर मला बोलत होता... मॅडम आपण परत पुण्याला जाऊयात. पण, आम्ही कलाकार नेहमी कमिटमेंट पाळतो... टेलिकास्ट अडकला होता म्हणून, शेवटी मी हळुहळू का होईना पण सेटवर पोहोचले. निसर्गापुढे कोणाचं काहीच चालत नाही पण देवापुढं इतकीच प्रार्थना की, कोणाचं जगणं मुश्किल होईल इतकं मोठं आणि भयानक काही होऊ देऊ नकोस...", असं धनश्रीने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिक महाराष्ट्रातल्या रसिकांच्या मनातला ताईत बनली. राणादा, अंजली या जोडीवर रसिकांनी अमाप प्रेम केलं. म्हणून ते टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर होते. आज जरी मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी, या मालिकेला आणि त्यातल्या कलाकारांना प्रेक्षक विसरलेले नाहीत. राणादा आणि अंजली बाईंवर प्रेक्षकांनी प्रेम केलंच, पण त्यासोबत मालिकेत आणखी एक जोडी होती, राज आणि नंदिनीची.  नंदिनीचा कावेबाज स्वभावही रसिकांना आवडला. म्हणून नंदिनी राणादाच्या वहिनीसाहेब म्हणून लोकप्रिय झाली. आता धनश्री वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करतेय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pravin Tarde Targets Trollers Over Shah Rukh Khan: 'मी किती हिंदुत्ववादी आहे, हे मला कुणी शिकवू नये...'; शाहरुखवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडेंचं सणसणीत उत्तर, सलमान खानचा उल्लेख करत म्हणाले...