Arijit Singh On Gerua Song Controversy : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरिजित सिंह (Arijit Singh) सध्या चर्चेत आहे. अर्जितने 'कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022' (Kolkata International Film Festival) मध्ये शाहरुखच्या (Shah Rukh Khan) 'दिलवाले' (Dilwale) या सिनेमातील 'रंग दे गेरुआ' (Rang De Gerua) हे सुपरहिट गाणं गायलं होतं. पण या गाण्यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका झाली आणि त्याची पुढची कॉन्सर्टदेखील रद्द करण्यात आली. आता अरिजितने या 'गेरुआ' वादावर भाष्य केलं आहे. 


अरिजित सिंहची 18 फेब्रुवारीला कोलकाता येथे एक कॉन्सर्ट पार पडली. या कॉन्सर्टदरम्यान त्याने 'गेरुआ' वादावर मौन सोडलं. अरिजित म्हणाला,"फक्त एका रंगावरुन इतका वाद का? भगवा रंग हा संन्याशी लोकांचा रंग आहे. स्वामी विवेकानंद यांचा रंग आहे. त्यांनी जर पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली असती तर त्यावरुन काही वाद झाला असता का?"






अरिजित सिंहला उत्तर देत आमदार तापस रॉय म्हणाले की, "भगव्या रंगावर टीका करत नाही. हा रंग तिरंग्याचा एक भाग आहे. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करु नये". कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावत ज्यावेळी अरिजितने 'गेरुआ' हे गाणं गायलं त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील तिथे उपस्थित होत्या. त्यानंतर अरिजितची पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली होती. त्यावेळी भाजपने आरोप केला होता की, ममताचं सरकार भगव्या रंगाला घाबरल्याने पुढची कॉन्सर्ट रद्द करण्यात आली आहे. त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने कॉन्सर्ट रद्द करण्यात आल्याचे ममता यांनी सांगितले. अरिजीत सिंगच्या कॉन्सर्टवरून आता भाजप आणि तृणमूल काँग्रस या दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाला झाला होता.


अरिजित सिंहने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 'मर्डर 2' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने सिनेविश्वात पदार्पण केलं. तर 'आशिकी 2' या सिनेमातील त्याची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि तो रातोरात स्टार झाला. 'फिर भी तुमको चाहूंगा', 'पछताओगे', 'पल', 'खैरियत', 'सोच ना सके', 'इलाही', 'हमारी अधुरी कहानी' या त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Happy Birthday Arijit Singh: घरातूनच मिळाला संगीताचा वारसा, अनेकदा नकार पचवूनही अरिजितने गाजवलं संगीत विश्व!