Amitabh Bachchan On Abhishek Bachchan Relationship : बच्चन कुटुंबीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही वृत्तांनुसार आता वेगळे राहत असलेल्या या जोडप्यांचा घटस्फोट होऊ शकतो.  मात्र, या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जुने वक्तव्य चर्चेत आले आहे. 


ऐश्वर्या रायसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी अभिषेक बच्चनचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. एवढेच नाही तर त्याने करिश्मा कपूरसोबत अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतरच्या काही महिन्यातच साखरपुडा मोडला. यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब दु:खी झाले. अमिताभ बच्चन यांनीही आपली व्यथा मांडली होती. 


अमिताभ यांनी मांडली होती व्यथा... 


अमिताभ बच्चन यांनी एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सहभाग घेतला होता. या चॅट शोमध्ये करण जोहरने त्यांना अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याबद्दल विचारले. कुटुंबासाठी हा कठीण काळ होता का? असे करण जोहरने विचारले होते.  यावर उत्तर देताना बिग बी म्हणाले होते - हा खूप नाजूक क्षण होता. नाती निर्माण होत आहेत, तुटत आहेत. हे कोणत्याही तरुण व्यक्तीसाठी कठीण आहे. जर परिस्थिती तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुम्ही वेगळे होणे चांगले आहे, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले. 


करिश्मासमोर ठेवली होती 'ही' अट...


अभिषेक आणि करिश्मा यांचा 2002 मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, हा साखरपुडा काही महिन्यातच मोडला. करिश्मासमोर ठेवलेल्या एका अटीमुळे साखरपुडा मोडला असल्याचे म्हटले जाते. लग्नानंतर करिश्मा कपूरने चित्रपटात काम करणे बंद करावे, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, ही अट मंजूर नसल्याने करिश्माने साखरपुडा मोडला असल्याचे म्हटले जाते. 


अभिषेकसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. करिश्मा पती संजय कपूरपासून विभक्त झाली आहे. ती एकटीच मुलांचे संगोपन करते. तर, दुसरीकडे अभिषेक बच्चननेही  ऐश्वर्या रायशी लग्न केले. अभिषेक-ऐश्वर्याला एक मुलगीही आहे. 


इतर महत्त्वाची बातमी :