साताऱ्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडच्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिंग झालंय?
Bollywood movies have been shoot in Wai taluka of Satara : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बॉलिवूडमधील अनेक सिनेमांचं शूटिंग झालंय. पण साताऱ्यातील वाई तालुका हा शूटिंगसाठी खास मानला जातो.

Bollywood movies have been shoot in Wai taluka of Satara : महाराष्ट्राचा ग्रामीण अतिशय निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. आजवर बॉलिवूडचे अनेक सिनेमे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शूट करण्यात आले आहेत. निसर्ग म्हटलं की सातारा आलाच...याच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात अनेक सिनेमांचं शूटिंग होतं. आज आपण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बॉलिवूडमधल्या कोण कोणत्या सिनेमांचं शूटिगं झालंय? हे जाणून घेऊयात..
वाईमध्ये 'जिस देश में गंगा रहता है', 'स्वदेस', 'गंगाजल', 'ओमकारा', 'दबंग', 'दबंग २', 'इश्किया', 'सिंघम', 'बोल बच्चन', 'जिला गाजियाबाद' अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला ‘छावा’ या चित्रपटामुळे वाईतील शूटिंग स्पॉट चर्चेत आले होते. विक्की कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत छावा या चित्रपटापूर्वीही अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणं वाईमध्ये झाले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी महाराष्ट्रातील वाई हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण मानले जाते. येथील निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांनाही ही जागा खूपच आवडते. वाईमध्ये केवळ हिंदी नव्हे तर मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिका देखील शूट केल्या जातात.
सलमान खानचा प्रसिद्ध 'हुड हुड दबंग' हे गाणंही वाईमधील एका प्रसिद्ध मंदिराजवळ शूट करण्यात आलं होतं. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'चेन्नई एक्सप्रेस'मधील काही दृश्यांचं चित्रीकरणसुद्धा वाईमध्येच झाले आहे. दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यातील संघर्षाचं दृश्य देखील इथेच चित्रित करण्यात आलं होतं.

किंग खान (शाहरुख खान) याचा 2004 मध्ये आलेला 'स्वदेस' हा चित्रपट देखील वाईमध्येच शूट करण्यात आला होता. एका मीडिया रिपोर्टनुसार, 'स्वदेस' चित्रपटाच्या 'ये तारा वो तारा' या गाण्याचं चित्रीकरण करण्यासाठी संपूर्ण टीम सात महिने वाईमध्येच थांबली होती. या चित्रपटातील प्रसिद्ध 'पंचायत सीन' देखील वाईमध्येच चित्रित केला गेला होता.

तसेच शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'आर... राजकुमार' चित्रपटातील 'मत मारी' हे गाणेही याच ठिकाणी शूट करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार, वाईच्या भाजी मार्केटमध्ये 'मत मारी' गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं होतं, जिथे विक्रेत्यांनी आपले स्टॉल लावले होते. या दृश्यांमध्ये जूनियर कलाकार रविवारच्या खरेदीसाठी आलेल्या सामान्य नागरिकांची नक्कल करत होते. या जोडीसोबत त्यांची टीम आणि दिग्दर्शक प्रभुदेवा देखील होते.

वाईमध्ये अनेक सुंदर मंदिरे आहेत. पर्यटक येथे फोटोशूटसाठी मोठ्या संख्येने येतात. ब्राह्मणशाही घाटाजवळ चार प्रसिद्ध मंदिरे आहेत – चक्रेश्वर, चिम्नेश्वर, कौंतेश्वर (हरिहरेश्वर) आणि कालेश्वर. गोवर्धन संस्था घाटावर कृष्ण मंदिर आहे, तर त्याच्या जवळच विठ्ठल आणि गणपतीची मंदिरेही आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या
'तिच्या कुंडलीत बालमृत्यूचा योग होता..', दिव्या भारतीच्या आईने केला होता धक्कादायक खुलासा VIDEO
























