Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी सीझन 6' (Bigg Boss Marathi Season 6) आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचलाय. त्यामुळे आता घरात ट्वीस्ट, ट्वीस्ट आणि ट्वीस्टच पाहायला मिळतायत. असाच एक ट्वीस्ट बिग बॉसच्या (Bigg Boss Marathi) घरात पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झालेली राखी सावंत (Rakhi Sawant) एलिमिनेट झाली. त्याचवेळी आता घरातून राखीपाठोपाठ आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचं रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) जाहीर केलेलं. त्यानुसार, घरात एलिमिनेशनचा डाव रंगला आणि घरातली वाईल्ड कार्ड स्पर्धक रेवा कौरासे (Reva Kaurase) घराबाहेर गेली. त्यानंतर घराला या सीझनचे टॉप 5 स्पर्धक मिळाले. पण, फिनाले गाठूनही घरातील सदस्यांमधली भांडणं आणि आरोप-प्रत्यारोप थांबण्याचं नाव घेत नाहीत.
'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन आता लवकरच संपणार आहे. खेळ अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. पण, आता फिनाले गाठूनही घरातील सदस्यांमधली भांडणं आणि मनातील खदखद आता चव्हाट्यावर आलीय. सीझनमधील सर्वात पहिली फायनलिस्ट ठरलेली तन्वी कोलते (Tanvi Kolte) सध्या सर्वांच्या निशाण्यावर आलीय. 'बिग बॉस मराठी सीझन 6'चा खेळ ऐन रंगात आल्यापासूनच तन्वी कोलतेचं जिंकणार असंच काहीचं बोललं जात होतं. तिचा खेळ, तिचं वागणं-बोलणं याचं सारेचजण कौतुक करत होते. पण, रेवा कौरसे घराबाहेर जात असतानाच तन्वी कोलते एक वाक्य बोलली आणि तिनं मिळवलेलं सारं गमावलं की, काय? असंच चित्र निर्माण झालंय.
'बिग बॉस'च्या या सीझनच्या विजेतेपदाची तन्वी कोलते प्रबळ दावेदार मानली जात होती. पण, आता विजेतेपद तिच्या हातून जाऊ शकतं, अशी चर्चा रंगलीय. रेवाच्या एलिमिनेशननंतर तन्वी असं काही बोलून गेली आहे की, नेटकऱ्यांनी तिला विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर केलं आहे.
नेमकं काय घडलं? (Tanvi Kolte Trolled)
'बिग बॉसनं' घरातल्यांना धक्का देत मिड विक इविक्शन टास्क ठेवला. त्यावेळी घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेली रेवा कौरासे एलिमिनेट झाली. पण, रेवा टॉप 5 मध्ये असावी, अशी तन्वीची इच्छा होती. पण, रेवा घराबाहेर पडल्यामुळे तन्वीची इच्छा अपूर्ण राहिली. त्यामुळे रेवा घराबाहेर जात असताना तन्वीनं तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
तन्वी कोलते रेवाबद्दल बोलताना म्हणाली की, "रेवा.. तुझ्यासाठी मला दोन शब्द बोलायचेत. बिग बॉसच्या घरात आली एक बाहुली. ती लेट आली पण, थेट मनात भरली.. टास्क ती एकदम जबरदस्त खेळली... माझ्याबरोबर पडली, उठली, रडली आणि हसली. पण या आठवड्यात ती मला सोडून चालली. आज खोटारडेपणा आणि धक्काबुक्की इथे राहिली... आणि माझ्या चांगल्या मनाची पोरगी थेट घरातून बाहेर चालली..."
तन्वी बोलत असतानाच अनुश्रीकडून जोरदार प्रत्युत्तर
तन्वी रेवाबद्दलच्या भावना व्यक्त करत असतानाच अनुश्री चिडते आणि लगेचच तन्वीला प्रत्युत्तर देते. "आमचं मन नाही चांगलं बरं का. आम्ही मनातूनच घाण आहोत. काहीही बोलते... माणूस घरातून चाललाय तरी हिचं वेगळंच सुरू आहे...", असं अनुश्री म्हणते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
