VIDEO : जेव्हा प्रमोद महाजन यांच्या लेकीने सिनेमात साकारली होती अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका
Bhasma Movie Pramod Mahajan daughter Punam Mahajan : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची मुलीने एका सिनेमात अशोक सराफ यांच्या लेकीची भूमिका साकारली होती.

Bhasma Movie Pramod Mahajan daughter Punam Mahajan : सिनेक्षेत्रात मोठं नाव कमावल्यानंतर किंवा स्वत:ला सिद्ध केल्यानंतर अनेक कलाकारांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो. शिवाय दक्षिणेतील काही राज्यांमध्ये तर सिनेक्षेत्रातील स्टार लोकांभोवती राजकारण फिरलेलं पाहायला मिळतं. सिनेक्षेत्रातून राजकारण आल्यानंतर बऱ्याच कलाकारांना यश देखील मिळालं. ताजं उदाहरण पाहायचं म्हटलं तर अभिनेत्री कंगणा राणावत, जया बच्चन, रवी किशन, हेमा मालिनी यांसारखे नावं घेता येतील. अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत काम करताना पाहायला मिळालाय. शिवाय मराठी सिनेसृष्टीचा विचार केल्यास अभिनेता सयाजी शिंदे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय आहे. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी सिनेक्षेत्रात चांगलं करियर करुन राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र, तुम्हाला आम्ही जरा वेगळी कहाणी सांगणार आहोत. महाराष्ट्रातील भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या लेकीने एका मराठी सिनेमात काम केलं होतं. प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी एका सिनेमात अशोक सराफ यांच्या लेकीची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे पूनम महाजन सध्या भाजपच्या सक्रिय राजकारणात आहेत. त्या खासदार देखील होत्या. मात्र, 2024 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं.
पूनम महाजन यांनी कोणत्या सिनेमात काम केलं होतं?
अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिकेत असलेला Bhasma हा चित्रपट 1994 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात पूनम महाजन यांनी अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या सिनेमाची निर्मिती दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डे यांनी केलं होतं. या सिनेमात Charusheela Sable, Suhas Bhalekar यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
सिनेमाची स्टोरी काय?
शंकर (अशोक सराफ) आपल्या पत्नी आणि मुलांसोबत एका गावात येतो, त्याच्याकडे खाण्यापिण्यासाठी काहीच नसतं. तो गावाच्या स्मशानात राहायला सुरुवात करतो आणि स्वतः "भस्मा" बनवण्याचा निर्णय घेतो. ज्याला लोक "जिवंत भूत" म्हणतात. आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी तो गावभर भीक मागत फिरू लागतो. पण गावकरी त्याचा वारंवार अपमान करतात. त्याला वाटू लागतं की भस्म्याचं आयुष्यच पुरेसं आहे.
मात्र आपल्या पत्नी पारेसोबत मिळून मुलांना खाऊ घालण्यासाठी तो गावकऱ्यांची फसवणूक करण्याचं ठरवतो. तो सांगतो की ग्रहणाच्या रात्री तो मरणाऱ्यांना पुन्हा जिवंत करू शकतो. शंकरला आपल्या मुलांना शिकवायचं असतं, आणि त्यांना भस्मा समाजापासून दूर ठेवायचं असतं. मात्र पारेला वाटतं की तो आपल्या समाजाविरुद्ध जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















