Ayush Sanjeev Breaks Silence on Exit: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनमध्ये बऱ्याच अनेपक्षित गोष्टी घडत आहेत.  पाचव्या आठवड्यात  दोन स्पर्धकांना बाहेर पडावं लागलं.  करण सोनावणे आणि आयुष संजीव  यांचा बिग बॉसच्या घरातला प्रवास संपला.   आजारी असल्याकारणाने आयुषला टास्कमध्ये जास्त सहभाग घेता आला नाही.  त्यामुळे तो बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही. सुरुवातीला आयुषने बिग बॉसच्या घरात उत्तमरित्या टास्क खेळले.  मात्र, नंतर तब्येतीमुळे त्याला जास्त खेळता आलं नाही.  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यानं लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं बिग बॉसच्या घरातील बरेच खुलासे केले होते. 

Continues below advertisement

मुलाखतीत आयुष म्हणाला, 'पहिल्या नॉमिनेशनमध्ये मला एवढं वाटलं नव्हतं.  मात्र, शेवटच्या आठवड्यात जेव्हा मला नॉमिनेट करण्यात आलं, तेव्हा मला जाणवायला लागलं होतं. मला असं वाटू लागलं की, काहीतरी करायचं आहे, पण करुच शकत नाही.  मला खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं.  मी टास्क पूर्ण करु शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो,  या सगळ्याचा विचार केला की कळतं की आपण आता शोमध्ये दिसत नाहीये.  यामुळे  कदाचित प्रेक्षकांचा कल आपल्या बाजूने राहिला नाही", असं आयुष म्हणाला.

"जनता मला कितीवेळा व्होट करणार ना? मी  पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना.. शेवटी काय हा आपल्या नशिबाचा भाग आहे.  बिग बॉसमध्ये जाणं माझ्या  नशिबात होतं.  जे काही तिथे घडलं, ते पण एक नशीब होतं", असं आयुष म्हणाला. "प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकाकात्मक दोन्ही बाजू असतात, याचं देखील असंच आहे", असंही आयुष म्हणाला.  

Continues below advertisement

 

बिग बॉसच्या घरात झालेल्या दुखापतीबद्दल आयुष म्हणाला, 'बिग बॉसच्या घरात मला छोटी दुखापत झाली होती. इंटरनल इन्ज्युरी चुकीच्यावेळी उद्भवली. असं काही घडेल, असं मला वाटत नव्हतं.  एक गोष्ट सतत मनाला खात होती.  ती म्हणजे बाकीचे सगळे पुढे जात होते...", असं आयुष म्हणाला. वेट लॉसबाबत आयुष म्हणाला, "मी आजारी नव्हतो. मला घरात असं वाटलं की, माझं वजन कमी झालं नाही. पण माझं साधारण 7-8 किलो वजन कमी झालं. घरी आल्यानंतर मी जेव्हा पूर्वीचे एपिसोड पाहिले, तेव्हा मला जाणवलं की मी खूप आजारी दिसतो आहे",  असं आयुष म्हणाला.